Sunday, December 29, 2024

धनगर समाजाचे आमदार नाहीत म्हणून तक्रार करणारे आज एक आमदाराला मंत्रीपद मीळालं नाही म्हणून तक्रार करतांय.

 “धनगर समाजाचे आमदार नाहीत म्हणून तक्रार करणारे आज एक आमदाराला मंत्रीपद मीळालं नाही म्हणून तक्रार करतांय.छगन भुजबळ साहेबांसारख्या ७ वेळा आमदार दोन वेळा विधानपरीषद महापौर मुंबई,नगरसेवक कायम सत्तेत असलेल्या जेष्ठ अनुभवी ओबीसी नेत्याला मंत्रीमंडळात डावलंल गेलं म्हणून आज ओबीसी समाज आक्रमक होतोय. 

आज त्या त्यागी नेतृत्वाच्या वाक्यांची आठवण होतेय. *”माझा पक्ष छोटा असेल पण मी त्याचा मालक आहे.”माझी झोपडी आहे ईतरांचे महाल आहेत पण मी माझा झोपडीचा मालक आहे.*

ना तीकाटासाठी भीक,आलो निवडून तर ना मंत्रीपदासाठी भीक,ना कुणाच्या सतरंज्या उचलायच्या ना पदाचा मोह.

*होय पदाचा मोह या त्यागी माणसाला असता तर २०१४ ला बारामतीत आणी दुसर्यांदा २०२४ ला परभणीतच हा माणूस भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढला असता. पण”लढेल तर माझाच पक्षाच्या चिन्हावर पडलो तरी चालेल,असे ठणकावून सांगायला स्वभीमानासाठी पद ओवाळून टाकावे लागते.*

हा स्वाभीमान फक्त एकट्या महादेव जानकरांचा नाही हा स्वभीमान त्यांच्या मागे असणार्या लाखों विस्थापीत,वंचीत,उपेक्षीत घटकांचा आहे त्यांच प्रतीनिधीत्व करत असतांना कधीच आपल्या तत्वांशी तडजोड या माणसाने केली नाही.

स्वर्गीय गोपीनाथ राव गेल्यानंतर त्यांच्या लेकीच्या वाट्याला आलेला संघर्ष आणी आता पराभव समोर दिसू लागताच ओबीसी कार्ड खेळून विजयी 

झाल्यावर त्याच गोपीनाथरावांच्या घरात सरळ थेट २ मंत्रीपद यावरून गरज असेल तेव्हा वापरा ही भाजपची निती भाजपमधील धनगर नेत्यांनी  देखील ओळखायला हवी होती. खरच फडणविसांचे तुमच्यावर प्रेम होते की फक्त आगोदरच्या धनगर नेत्यांचे बळ कमी व्हावे कींवा पंख छाटावे. धनगर मतांच विभाजन व्हावं म्हणून तुमचा वापर सुरू होता हे तुम्ही ओळखायला हवं होतं.

भुजबळ साहेबांना तर आयुष्यभर संघर्ष पुरला मात्र त्यांनी देखील पुन्हा प्रस्थापीतांच्याच गोटात राहून ओबीसी ना न्याय देण्याची भुमीका नेहमी स्वीकारली पण तिथेही डोईजड झाले की छाटले पंख हे त्यांच्यासाठी आता नविन नाही कॅांग्रेस असो वा भाजपा ओबीसी व ईतर उपेक्षीत वंचीतांच्या वाट्याला कायम हाच न्याय आला आहे.

*महादेव जानकर एकदा बोलले होते स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडेंनी व भुजबळ साहेबांनी पक्ष काढला असता स्वतः चा तर मी ही नसती उठाठेव करत बसलो नसतो त्यांच्याबरोबर काम केलं असतं.*

आज हे वाक्य भुजबळ साहेबांनाही आठवत असेल आणी त्यांच्या मागे असणर्या त्यांच्या समर्थकांना देखील.

मात्र आज खर्या अर्थाने महादेवराव जानकरांचा विचार कीती व्यापक कीती दुरदृष्टीचा आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.तिकीटासाठी रडणार्यांच्या नंतर मंत्रीपदासाठी रडणारे देखील बघायला मीळाले पण आमचा नेता आज ही स्वाभीमानाने म्हणतो *” वि आर नॅाट डीमांडर वि आर कमांडर.,”आम्ही भीक मागणारे नाहीत,लढवून मीळवनारे आहोत.*

आज या झोपडीच महत्व महालात राहणार्यांना आणी महालात राहण्याच स्वप्न पाहणार्यांना देखील समजल असेलच.

वंचित,उपेक्षीत,विस्थापितांच्या न्याय हक्कांसाठी त्यांना राजपाट मीळवून देण्यासाठी निर्माण झालेला हा पक्ष फक्त या घटकांपुरता आता मर्यादीत राहीलेला नही प्रस्थापीत घटकांतले देखील वंचीत,अन्यायग्रस्त,उपेक्षीत घटक आज महादेवराव जानकर साहेबांच्या  मागे ठाम पणे उभे आहेत.

मीर्झापूर (उत्तर प्रदेश) मध्ये लोकसभा लढवली तरी निवडून येऊ शकतो, असे म्हणनार्या महादेव जानकरांनी २८ नगरसेवक बडोदा गुजरात येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आणले आहेत.तेलंगणा,बिहार,झारखंड,राजस्थान म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशव्यापी सुरू असलेली ही चळवळ एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाला ३ रा राष्ट्रीय सर्वात मोठा पक्षा बनवल्या शिवाय राहणार नाही.

धिरज पाटील 

नाशीक

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...