Wednesday, December 25, 2024

ख्रिसमस दिवशीच वासुदेव यांची आठवण काढून धर्म संस्कृती संकटात सांगणाऱ्यावर सुदर्शन अक्कीसागर संतापले

ख्रिसमस दिवशीच वासुदेव यांची आठवण काढून धर्म संस्कृती संकटात सांगणाऱ्यावर सुदर्शन अक्कीसागर संतापले 

श्री. सुदर्शन अक्कीसागर यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,

'वासुदेव, पिंगळा, पोतराज आदि. भटके समाजाचे सामाजिक प्रश्न आणि तसे समस्या/हाल वर्षभर कुणास आठवत नाही व तसे प्रयत्न ज्यांच्याकडून होताना दिसत नाही अशां काहींना मात्र ख्रिसमस दिवशी आपली धर्म-संस्कृती नेमकी आठवून धर्म संस्कृती खतरे में है, असे सांगताना ते दिसत आहेत. खरेच कमाल आहे अशांची.....

आपले गड-किल्ले, महादेवाची जुनी प्राचीन मंदिरे, आणि महापुरुषांचे आठवणी असलेले स्मृतीस्थळ दुर्लक्षित आणि भग्न अवस्थेत असताना उदा. पुणे येथील होळकर राजघराणेतील समाधीस्थळ आदि. असे सर्व काही असताना येथे नवीन मंदिरे व तसे स्मारक कशासाठी हवे आहे? 

हिंदु समाजाचा खरा उद्धार होणे असेल तर धर्माच्या नावाने चालेला बाजार व भंपकपणाहि बाजूस केला पाहिजे. आणि हे केवळ आपल्या हिंदु समाजातच नव्हे तर सर्वच धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांना त्यांना सांगावेसे वाटते.

आणि होय मी सुद्धा हिंदूच. पण कुणाचे तरी राजकीय अजेंडाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेवून जाणारा आणि आपली बुद्धी सोडून कसा हि नाचणारा मी अंधभक्त नाहीच, अशा शब्दांत त्यांनी ढोंगी लोकांवर हल्लाबोल केला आहे.

जय हिंद ~ जय भारत !

हर_हर_महादेव...

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...