Saturday, October 18, 2025

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी 

मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे . राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आगामी महानगरपालीका निवडणूकीच्या अनुषगांने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर महापालीकेच्या निवडणूका संदर्भात तातडीच्या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकरसो यांच्या आदेशानुसार आझाद मैदान मुंबई येथील पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. बैठकीसाठी राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य प्रदेश सरचिटणीस अजितदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तौसीफ शेख, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, राज्य कार्यकारणी सदस्य विठ्ठल यमकर उपस्थित होते. 

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक कामाचा आढावा घेतल्यानंतर निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी चर्चा करण्यात आली. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात कामाला लागावे असे आवाहन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

बैठकीसाठी मुंबई प्रदेश खजिनदार महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष रामधारी पाल, अल्पसंख्याक आघाडी मुंबई सचिव इकबाल अन्सारी, ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख जीवाराम बघेल, कोकण उपाध्यक्ष रमेश कारंडे, पालघर नेते रामदरश पाल, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष संतोष यादव, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल यादव, मुंबई महिला आघाडी सचिव कविता झवेरी, कुर्ला विधानसभा अजित लाडे, मिरा भाईंदर अध्यक्ष संजय मकवाना, उत्तर मुंबई जिल्हा सचिव सुरेश जयस्वार, उत्तर भारतीय वार्ड अध्यक्ष मानखुर्द ओमप्रकाश यादव, ईशान्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष विजय जयस्वार, चेंबूर तालुकाध्यक्ष अभय धारपवार, अंधेरी पूर्व माजी अध्यक्ष लक्ष्मण लेंगरे, अंधेरी माजी तालुकाध्यक्ष बिरदेव सरगर, मानखुर्द वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष मोहन करडे, माजी जिल्हाध्यक्ष ललन पाल, उत्तर मुंबई व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष अली मोहम्मद शेख, मुंबई महिला आघाडी सचिव रीमा मोहिते, बदलापूर शहर युवक आघाडी अध्यक्ष अजय चौगुले व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 


राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

मुंबई : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडले. मुंबई मराठी पत्रकार संघात रासपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेवते बोलत होते. यावेळी रासपचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील, ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.


श्री. शेवते पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यावर सरकारनिर्मित बाजारभावाचे आणि नैसर्गिक अतिवृष्टीचे संकट असे दुहेरी संकट असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा करू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला, बीड, नांदेड, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, सातारा, जालना, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिवसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अक्षरशा शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना, राज्य सरकारने तुटपुंजी मदत करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. उद्योगपतीना हजारो कोटींचे पॅकेज देऊन घसघशीत मदत करता आणि जगाचा पोशिंदा, राष्ट्राचा अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता, हे राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही. तटपुंजी मदतीच्या नावाखाली दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत ठणकावले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीके मातीमोल झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा पिकाचे भाव कोसळले आहेत. कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नाही. अतिवृष्टीने कोसळलेल्या शेतकऱ्यांना उभे करायचे सोडून, धनदांडग्या भांडवलदारांचे लाड केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. श्री. शेवते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मदत केली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे.

बोगस शिक्षक भरती अंगलट; मालेगावात तीन शिक्षण अधिकारी निलंबित

बोगस शिक्षक भरती अंगलट; मालेगावात तीन शिक्षण अधिकारी निलंबित


मालेगाव शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात गाजलेल्या येथील बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अखेर शिक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले.

निलंबित अधिकऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे, तत्कालीन वेतन अधीक्षक सुधीर पगार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

या तिन्ही अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती. ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिल्याने त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत हे अधिकारी निलंबित राहणार आहेत. सदर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत घेतलेल्या भरती प्रक्रियेत अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मालेगाव येथील मालेगाव हायस्कूल व महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेच्या या. ना. जाधव विद्यालयात अकरा बोगस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. या घोटाळ्याप्रकरणी पवारवाडी व छावणी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पथकाकडून तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण पाटील, सुधीर पगार व उदय देवरे यांना यापूर्वीच अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडी व न्यायालयीन कोठडीदेखील सुनावण्यात आली होती. आता शासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

माणमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंतांना संधी देणार : इंजि. दादासाहेब दोरगे

माणमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंतांना संधी देणार : इंजि. दादासाहेब दोरगे 

मुंबई (१५/१०/२५) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे, मत रासपचे सातारा जिल्हाउपाध्यक्ष इंजि. दादासाहेब दोरगे यांनी व्यक्त केले. श्री. दोरगे हे यशवंत नायक'शी बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रस्थापित पक्षांच्या वळचणीला गेलेल्या लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन केले.


श्री. दोरगे पुढे म्हणाले, माण तालुक्यात गावगाड्याच्या विकासाशी निगडीत अनेक मोठ्या समस्यांचा डोंगर आहे. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. अतिवृष्टीने छोटे मोठे व्यावसायिक, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. सोलापूर, सांगलीच्या मार्केटमध्ये कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नसल्याने माण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत. अनेक शासकीय कार्यालयात खासगी लोकांची सुळसुळ असून, अनेक शासकीय योजनांचा लाभ गरजू पर्यंत मिळत नाही. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे, असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे. गावटगे मार्फत लोकांची दिशाभूल सुरू आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  महादेवजी जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून म्हसवड नगरपालिका, दहिवडी नगरपंचायत, माण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊ. जनतेचे प्रश्न हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरू, असे श्री. दोरगे यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar Official  Dadaso Dorage #zpelection #mhaswad #nagarpalika #satara #manpanchayatsamiti

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

सातारा दि.16: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.

चव्हाण कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

सासपडे सारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार बाहेर आहेत ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.

Monday, October 13, 2025

महादेव जानकर यांच्या पक्षास मजबुत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज सत्ताधारी बनू शकत नाही : सिद्धपा अक्कीसागर

महादेव जानकर यांच्या पक्षास मजबुत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज सत्ताधारी बनू शकत नाही : सिद्धपा अक्कीसागर 

हैदराबाद (११/१०/२५) : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि कार्यकर्त्यास मजबूत केल्याशिवाय राष्ट्रीय समाज्याच्या हाती सत्ता येणार नाही. सत्ता नसेल तर समाजाच्या समस्या सुटणार नाहीत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धपा अक्कीसागर यांनी केले. श्री. अक्कीसागर तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आर्टस कॉलेज महबूबानगर, हैदराबाद येथे तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्ष बैठकीचे आयोजन केले होते.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, जोपर्यंत बुद्धिजीवी वर्ग आपल्या उपेक्षित समाजवर्गासाठी मदत करणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समाजाच्या समस्या सुटणार नाहीत. बुद्धिजीवी वर्गाने पुढे येऊन समाज ऋण फेडण्याची आवश्यकता आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी तन मन धनाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू इच्छितो. तेलंगणा राज्यात सत्ता ताब्यात घेण्यासाठी गावा गावात बूथ पर्यंत पक्षाचे राजकीय संघटन मजबूत केले पाहिजे.

यावेळी तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रमाकांत करगतला, प्रदेश उपाध्यक्ष रमेश दोडामणी, प्राचार्य राम शेफर्ड, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पांडू कोंनगला, रमेश कुरमा, रासेफचे मदनेश्वर शुरनर, सूर्यकांत गुंडाळे व अन्य उपस्थित होते.

Saturday, October 11, 2025

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये; सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली 

पत्रकार परिषदेत बोलताना काशिनाथ शेवते, बाजूस ज्ञानेश्वर सलगर, तोसीफ शेख 

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

मुंबई : राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फसवे सरकार आहे. खोटी आश्वासने देऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडले. मुंबई मराठी पत्रकार संघात रासपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेवते बोलत होते. यावेळी रासपचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, राज्य सरचिटणीस अजित पाटील, ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.

     श्री. शेवते पत्रकार परिषदेत म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यावर सरकारनिर्मित बाजारभावाचे आणि नैसर्गिक अतिवृष्टीचे संकट असे दुहेरी संकट असताना राज्य सरकारने शेतकऱ्याची थट्टा करू नये. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने अकोला, बीड, नांदेड, नाशिक, अहिल्यानगर, परभणी, हिंगोली, सातारा, जालना, सोलापूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, लातूर, धाराशिवसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. अक्षरशा शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना, राज्य सरकारने तुटपुंजी मदत करून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. उद्योगपतीना हजारो कोटींचे पॅकेज देऊन घसघशीत मदत करता आणि जगाचा पोशिंदा, राष्ट्राचा अन्नदाता शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देता, हे राष्ट्रीय समाज पक्ष खपवून घेणार नाही. तटपुंजी मदतीच्या नावाखाली दिवाळी भेट म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत ठणकावले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीके मातीमोल झाली. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा पिकाचे भाव कोसळले आहेत. कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नाही. अतिवृष्टीने कोसळलेल्या शेतकऱ्यांना उभे करायचे सोडून, धनदांडग्या भांडवलदारांचे लाड केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला. श्री. शेवते पुढे म्हणाले, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे मदत केली पाहिजे. छोटे मोठे व्यावसायिक आहेत, त्यांना मदत केली पाहिजे.

Sunday, September 28, 2025

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये एकरी मदत करा : महादेव जानकर 



मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा; नांदेड, हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातून जानकरांची मागणी

नांदेड : राज्य सरकारने मुंबई पुण्यातील प्रोजेक्ट थांबवून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी घेतली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  आज (दिनांक २८ ) सकाळ पासून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. तोसीफ शेख, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.  

महादेव जानकर साहेब यांनी कंधार तालुक्यातील तेलुर व कवठा, मुखेड तालुक्यातील चिवळी आणि लोहा तालुक्यातील गोळेगाव भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पत्रकार परिषदेत श्री. जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना एकरी ₹५०,००० रुपयेची मदतीची घोषणा करावी, माती वाहून गेलेल्या क्षेत्रांना विशेष भरीव मदत द्यावी, मराठवाड्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी ठाम मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

नांदेड जिल्हा दौरा करून हिंगोली जिल्हा दौऱ्याकडे रवाना झाले. महादेव जानकर यांनी गिरगांव जि. हिंगोली येथे पूरग्रस्त व अतिवृष्टी भागाची भेट घेतली. अनेक गावात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना, शासनाचे महसूल कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने महादेव जानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Thursday, September 18, 2025

शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना

शेतकरी संघटनांच्या संघर्ष समितीची स्थापना

कर्जमाफी व शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन

छत्रपती संभाजीनगर (२५/८/२०२५) :  छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठक संपन्न झाली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन, शेतकरी कर्जमाफी आणि MSP च्या भावावर २०% हमीभाव याबाबत शासनाने निर्णय घेण्यास करत असलेले विलंब आणि त्याचा शेतकरी व त्याच्या कुटुंबावर होणारे परिणाम यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून, त्याला न्याय मिळून देण्यासाठी आज ही बैठक संपन्न झाली. याबैठकीत प्रमुख विषयावर चर्चा करुन खालील निर्णय घेण्यात आले.

१) दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई मध्ये आंदोलन करण्यात येणार २) राज्यात विभागनिहाय संयुक्त परिषद घेण्यात येणार ३) शेती प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात येणार ४) शेतकरी-शेतमजूर हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे ५) कर्जमुक्ती,सर्व प्रकारच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी भाव, बोगस खते व बियाणे प्रश्न, शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करणे, सर्व कृषीनिविष्ठा GST मुक्त करणे आणि गाव एकक धरून शेतकरी हिताची पीकविमायोजना व खते बियाणे तपासणीसाठी गावावर टेस्टिंग लॅब स्थापन करणे  ई. प्रमुख मागण्यासह निर्णय घेऊन लढा देण्याचा निर्णय झाला. 

वरील प्रमुख निर्णयासह हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला असून, आजच्या बैठकीला विजय जावंधिया, बच्चू कडू, महादेव जानकर, डॉ. अजित नवले, कैलास पाटील, अनिल घनवट, प्रकाश पोहरे, विठ्ठलराजे पवार, प्रशांत डिक्कर, विजय कुंभार, काशिनाथ जाधव व इतर शेतकरी संघटना नेते या बैठकीस उपस्थित होते. तसेच  राजू शेट्टी आणि राजेश टोपे हे ऑनलाइन द्वारे बैठकीस उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मोर्चा काढणार : महादेव जानकर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मोर्चा काढणार : महादेव जानकर 

पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बाजूस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तोसीफ शेख, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सूरज ठाकूर

यवतमाळ (९/९/२५) : शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या धोरणावरून राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे यवतमाळ येथे आले असता जाहीर केले. 

श्री. जानकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये '२०२४ मध्ये भाजपचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारने शेतकर्‍यांसाठी काहीच केले नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रव्युहामध्ये अडकला असून, शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, विदर्भातील शेतकर्‍यांना ऊसाप्रमाणे एफआरपी दयावी, व शेतकर्‍यांच्या इतर मागण्यांकरीता मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना श्री. जानकर म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांनी शासकीय योजनेचा लाभ घेवून शेतीसोबत पुरक व्यवसाय करण्यावर भर दिला पाहिजे. शेतकर्‍यांच्या मुलांनी शेतीचे अद्यावत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, त्याशिवाय फायद्याची शेती केली जावू शकणार नाही. मी मंत्री असताना दुधाला सर्वाधिक दर मिळवून दिले होते, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सत्ताधार्‍याकडून आपल्याला जाती जातीमध्ये भांडविले जात आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सरकारने दयावे, कुणाच्याही आरक्षणाच्या हक्काला आमचा विरोध नाही. ज्या जातीची जेवढी जन संख्या असेल, तेवढया प्रमाणात त्यांना त्यांचा हक्क मिळायला पाहिजे. त्यासाठी कायदे तयार करण्याचे अधिकार संसदेला आहेत, त्यांनी ते करावेत असे स्पष्ट मत महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

महादेव जानकर यांचा उत्तर प्रदेश दौरा

महादेव जानकर यांचा उत्तर प्रदेश दौरा

लखनऊ - उत्तर प्रदेश (३१/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे लखनऊ उत्तर प्रदेश दौऱ्यावर अतिथिगृह येथे पोहचल्यावर राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे लखनऊ जिल्हाध्यक्ष पारस पांडे, जिल्हा उपाध्यक्ष बृजेश विक्रम पासी, बीकेटी विधानसभा मंडल अध्यक्ष अमर सिंह आणि भारतीय मजदूर किसान यूनियनचे राजू पाल, लखनऊ मंडल अध्यक्ष सरवन पाल उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढवण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ग्वाल्हेर येथे राष्ट्रीय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : येथे ग्वाल्हेरचे रहिवाशी आणि महादेव जानकर यांचे खंदे समर्थक, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते जीवाराम बघेल यांच्या नेतृत्वात जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्वाल्हेर येथे पक्ष वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या देशभरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून या कार्यालयास भेट देऊन पुढील कार्यास शुभेच्छ्या देण्यात आल्या. यावेळी मध्य प्रदेश, महाराष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

माण तालुक्यात रासपची गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाची मोहीम

माण तालुक्यात रासपची गणेश उत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाची मोहीम

दहिवडी (१/९/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरद दडस यांच्या नेतृत्वात यावर्षीचा गणेश उत्सव हा पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेत साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. दिनांक 30 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी माण तालुक्यातील गणेश मंडळास वृक्षारोपणासाठी रोपे भेट देण्यात आली. खुटबाव, मोही, ठोंबरेवाडी, शिंगणापूर, थदाळे, वावरहिरे, डंगिरेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, राजवडी या गावातील गणेश मंडळांना वृक्ष वाटप करण्यात आले. यापूर्वी शरद दडस यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद येथील शाळांना विद्यार्थ्यांना शालेपयोगी वही, पेन सारखे साहित्य वाटप केले होते. आताही त्यांनी गणेश उत्सवात पर्यावरण संवर्धनाची मोहीम हाती घेऊन चांगला उपक्रम राबवला आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कालिदास गाढवे यांनी व्यक्त केले. 

यावेळी रासपचे माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, युवक तालुका अध्यक्ष तात्याराम दडस, प्रवचनकार प्रतीक भोसले, किशोर जगदाळे, लखन खुस्पे, गणेश दडस, आयुष्य दडस, विकास पवार, गौरव साळुंखे, मधुकर अवघडे, ओंकार चौगुले, आकाश मेनकुदळे, अजिंक्य शिंगाडे, तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गणेश मंडळांनी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास तीन वर्षानंतर त्यांना प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देऊ, असे शरद दडस यांनी जाहीर केले. वृक्षाची लागवड करणे हे शाश्वत काम आहे, त्यामुळे सर्वांना ऑक्सिजन मिळतो. पर्यावरणाचे रक्षण होऊन ममाण तालुक्यासारख्या प्रजन्यछायेच्या भागात वृक्ष लागवडीमुळे पावसाचे देखील प्रमाण वाढू शकते.

महादेव जानकर यांच्यापेक्षा देवालाही मी मोठे मानत नाही : एस एल अक्कीसागर

महादेव जानकर यांच्यापेक्षा देवालाही मी मोठे मानत नाही : एस एल अक्कीसागर

ग्वाल्हेर : राष्ट्रीय समाज पक्षाचा 22 वा वर्धापनदिन ग्वाल्हेर येथे पार पडला. वर्धन दीन कार्यक्रमात रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले, 22 वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पार्टीला जन्म कुणी दिला असेल तर, त्यांचं नाव आहे महादेव जानकर, यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यामुळे मी त्यांना मानतो. त्यांच्यापेक्षा देवालाही, माता पिता यांना मी मोठे मानत नाही. आज राष्ट्रीय समाज्याच्या हाती देशाची सत्ता देण्यासाठी झगडत आहेत. टिळक म्हणाले होते, स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना स्वराज मिळाले. आमचे शेतकरी, कष्टकरी, पशुपालक, व्यावसायिक अशा असली भारतीय जनतेला स्वराज मिळाले नाही, त्यांच्या हातात सत्तेची चावी देण्यासाठी ही पार्टी बनवली आहे. इथे लिहिले आहे, राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा !राष्ट्र बने बलशाली यही सूत्र हमारा!! आज प्रस्थापित लोक देशात सगळीकडे जाती धर्म भाषेवरून भेदभाव केला जात आहेत आणि याच भेदभावातून राज्य करत आहेत. हे कायमचे थांबवण्यासाठी ''राष्ट्र, समाज' सर्वांना सामावून घेणारी सर्वात सुपर विचारधारा असणारी राष्ट्रीय समाज पार्टी महादेव जानकर यांनी बनवली आहे. जोपर्यंत शेतकरी शेतमजूर स्वतःचे सरकार बनवणार नाही देशाचे राज्याचे भले होणार नाही. आज महादेव जानकर लढत आहेत, झिजत आहेत, आमचे चंद्रगुप्त मौर्य आहेत. आपल्याला राष्ट्रीय समाजाच्या विचाराचा भारत घडवायचा आहे, त्य आपले स्वराज आपल्याला आणायचे आहे. ते आता कोणी रोखू शकणार नाही.

Friday, September 12, 2025

राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला : काशिनाथ शेवते

राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला : काशिनाथ शेवते 

भिवडीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राजे उमाजी नाईक यांना अभिवादन


पुरंदर (७/९/२५) : देशाच्या इतिहासात भिवडी येथे पहिली जयंती साजरी करून, राजे उमाजी नाईक यांचा खरा इतिहास महादेव जानकर यांनी उजेडात आणला असे प्रतिपादन, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे अभिवादन करण्यात आले.


श्री. शेवते म्हणाले, उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती महादेव जानकर यांनी साजरी केली. सुरुवातीच्या काळात येथे घाणीचे साम्राज्य होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी येथील ऊर्जास्थळाची स्वच्छता केली. हे ठिकाण जागृत केले. राजे उमाजी नाईक यांची प्रेरणा घेऊनच राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकाळ सुरू झाला. राजे उमाजी नाईक जयंतीच्या निमित्ताने रामोशी समाजात जागृती निर्माण होत आहे. आज शासन जयंती उत्सव साजरा करतेय, हाच आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. उपेक्षित समाजाचे महानायक प्रकाशझोतात आणण्याचे काम महादेव जानकर यांनी केलेले आहे.  यापुढेदेखील राजे उमाजी नाईक यांचे काम महाराष्ट्रभर व्यापक पद्धतीने पुढे नेऊ. 

रासपचे सरचिटणीस अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते यांनी राजे उमाजी नाईक यांचा विजय असो ! राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो !! अशा घोषणा दिल्या. यावेळी राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुनिताताई किरवे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, पुणे शहर संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष परमेश्वर बुर्ले, पुणे शहर अध्यक्ष संतोष शिंदे, माण तालुका अध्यक्ष शिवाजीराव बरकडे, तात्याराम दडस,रासेफचे महावीर सरक आदी उपस्थित होते.

Saturday, August 30, 2025

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

गुलाब पुकळे यांचे निधन ! गजी नृत्याचा कलाकार हरपला

श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुकळेवाडीतील गजी नृत्याचा कलाकार हरपला. काही दिवसांपूर्वी त्यांचा कनिष्ठ चिरंजीव लक्ष्मण पुकळे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर श्री. गुलाब दाजी पुकळे यांचे मुंबईत रूममध्ये केलेले बाहारदार गजी नृत्य पाहून अनेकजण भारावले. त्यांच्याबद्दल अनेकांनी त्यावर भरभरून चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. मीही त्यावर माझे मत व्यक्त केले. 

गुलाब पुकळे यांचा खरा परिचय झाला, तो रेठरे कारखाना परिसरात मेंढरामागे. कारण त्याच दरम्यान कधीतरी त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव दाजी हा परागंदा झाला होता. त्याचा खूप शोध घेतला गेला, पण तो अद्याप मिळाला नाही.

गुलाब पुकळे यांना अफाट बुद्धीमत्ता लाभली होती. त्यांना बोलता येत नसले तरी, अगदी लहान मुलाला देखील चटकन समजेल, अशा सोप्या भाषेत एखादी गोष्ट सांगण्यात ते तरबेज होते. गावगाड्यातील सर्वांना ते ओळखायचे. लहान थोर सर्वांची माहिती त्यांना असायची. प्राण्यांबद्दल त्यांना आपुलकी होती.  चुकीची गोष्ट आपण करत असू तर त्यांच्या पद्धतीने ते आपल्याला सावध करायचे. गुलाब पुकळे यांच्याबद्दल श्रद्धांजली लेख लिहावा यासाठी प्रा. आनंद पुकळे सर यांचे फोनवर बोलणे झाले. त्यांनीही गुलाब पुकळे यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पुकळेवाडी ग्रामस्थ यांच्याकडून हळहळव्यक्त होत आहे. गुलाब पुकळे  यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांच्या स्मृतीस भावपुर्ण श्रद्धांजली..!

💐

Friday, August 22, 2025

गेवराईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शिबिर; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

गेवराईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शिबिर; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 



गेवराई (१५/८/२५) : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे मार्गदर्शन शिबिर व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. नव उद्योजक कार्यकर्त्यांना सन्मानित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्ष हा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धर्तीवर चालत आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे. जानकर साहेबांच्या विचारानुसार आम्ही नऊ उद्योजकांना सन्मानित केले आहे. समाजामध्ये अनेक तरुण उद्योजक झाले पाहिजेत, अनेक तरुण क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, अनेक तरुण आमदार खासदार झाले पाहिजेत ही शिकवण जानकर साहेबाची आहे .

जानकर साहेबांकडे दूरदृष्टी आहे आणि समाजात येणारे संकट त्यांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्य तरुणास प्रेरित करून स्वतःच्या पायावर उभा रहा असे सांगत आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने उतरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण संघटन बांधणी चांगल्या प्रकारे झाली आहे. अनेक तरुण राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून उभा राहण्यास तयार आहेत आणि काम करण्यासही तयार आहेत.

मार्गदर्शन शिबिरास प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे, मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर, बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, लोकसभा अध्यक्ष विक्रम सोनसळे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष भगवान माने, साईनाथ विग्ने, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष काशीद परशुराम,युवक जिल्हाध्यक्ष केदार मधुकर, शिवाजी चांगण आदी उपस्थित होते. अविनाश काकडे (तालुकाध्यक्ष), बालाजी सातपुते (तालुका अध्यक्ष), अशोक हप्ते (विधानसभाध्यक्ष), कृष्णा धापसे (युवकाध्यक्ष), शंकर गायकवाड (चकलांबा सर्कल प्रमुख) यांना नियुक्ती देण्यात आली.

शेतकरी हक्क परिषदेत रासपचे अजित पाटील म्हणाले, रामाचं नव्हे तर बळीचं राज्य हवे

शेतकरी हक्क परिषदेत रासपचे अजित पाटील म्हणाले, रामाचं नव्हे तर बळीचं राज्य हवे


पुणे (८/८/२५) : रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील यांनी शेतकरी हक्क परिषदेत मांडले. स्वाभिमानी शेतकरी संघटचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील, भारतीय किसान सभेचे अजित नवले, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती.

परिषदेतल्या पहिल्या सत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस श्री. अजित पाटील बोलताना म्हणाले, "आपले युवक दिवसभर शेतात राबत असले तरी त्यांच्या उत्पन्नाची स्थिती समाधानकारक नाही. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यांकडे वळणे गरजेचे आहे. दूध उत्पादन, रेशीम शेती, मधमाशी पालन यांसारख्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही." श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या कर्जप्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. CIBIL स्कोअरच्या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. "कर्ज देताना या अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे."

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पाटील म्हणाले, "राज्यात लोकशाही जिवंत नाही, विरोधी पक्षनेता निवडलेला नाही, हे दुर्दैवी आहे." "स्वयंसहाय्यता गट फक्त बचत करण्यापुरते नकोत, तर त्यातून व्यवसायवृद्धी व्हावी. महिलांना मार्केटिंग आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण मिळावे, त्यामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा होईल. रामाचं नव्हे, तर बळीचं राज्य हवे.

खासगीकरणाने आरक्षण धोक्यात, खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे : महादेव जानकर

खासगीकरणाने आरक्षण धोक्यात, खासगी क्षेत्रात आरक्षण मिळाले पाहिजे : महादेव जानकर 

पणजी (७/८/२५) : खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे खाजगी क्षेत्रात देखील आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशनात बोलताना केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे अधिवेशन पणजी येथे पार पडले. मंचावर प्राचार्य बबनराव तायडे, महासचिव सचिन राजूरकर व देशभरातील प्रमुख ओबीसी पक्षाचे नेते, अन्य मंत्री उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले, ओबीसी समाज मोठा असला तरी त्यांच्याकडे थिंक टँक किती आहे, याचा विचार केला पाहिजे. ज्या लोकांनी सामाजिक आर्थिक मागास ठेवले तेच लोक पुढे पुढे करत आहेत. सामाजिक आर्थिक राजकीय प्रगती करायची असेल तर थिंक टॅंक लोकांची संख्या वाढली पाहिजे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसीला जागृत करण्याचे काम करत आहे. त्यांना दिशा दाखवली पाहिजे. दशा आणि दिशा सांगितली पाहिजे. ओबीसीनी सहारा घ्यावा, पण कुणाचा बेसहारा नको. ओबीसींनी मुख्यमंत्री आणि मंत्र्याकडे धावत जाणारी मानसिकता बदलली पाहिजे. ६२ टक्के ओबीसींना प्रत्येक क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे. लोकसंख्येच्या हिशाबाने ओबीसींसाठी तमिळनाडू राज्य चांगले आहे. आम्ही आमच्या राज्यात भीक मागणारे आहोत. मागणारा समाज राजा कधी बनत नाही. आम्हाला राजा बनवायचे असेल तर आमचे संघटन चांगलं बनवलं पाहिजे. इथे दोन राजकीय पक्षांचा बोलबाला आहे काँग्रेस आणि भाजप. तुमचे काही नाही, हे बदला. डोके ही त्यांचे आणि पायही त्यांचे. ओबीसींची प्रगती कशी होईल, याचा विचार करावा. ज्यांचे मत कमी ते राज करतात आणि ज्यांचे मत जास्त ते भीक मागतात. 

ओबीसींनो, जोपर्यंत तुमचा पक्ष बनणार नाही, तोपर्यंत ओबीसी बेदखलच राहणार. देशाचा पंतप्रधान ओबीसी नेत्यांकडे आला पाहिजे, असे संघटन व्हावे. आरएसएसचे स्टेजवर एक माणूस असतो आणि आमच्या स्टेजवर हजारो माणसं आणि समोर कोणी नसतं हा बदल केला पाहिजे. ओबीसींसाठी महाज्योती बनवताना कॅबिनेट मंत्री होतो. मात्र ओबीसीला बजेट मिळत नाही. दुग्ध विकासमंत्री असताना ओबीसी मुलांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी डेअरीच्या जागा दिल्या. मात्र बाकीच्या मंत्र्यांनी काय दिले याचा विचार केला पाहिजे.  खासगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ओबीसीला खासगीकरणात देखील आरक्षण पाहिजे. देशात ओबीसींचा एकही उद्योजक नाही. सुप्रीम कोर्टात एक ही  जज नाही,  प्रशासनात एकही चीफ सेक्रेटरी नाही. तुमचा कोणी अधिकारी नाही. ओबीसीनी राजकारण केले पाहिजे, पण कोणाचा चमचा बनून नाही.

उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात

उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात 

उमरगा (२८/७/२५) : सोमवारी उमरगा लोहारा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक उत्साहात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नियोजनार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष माननीय अश्रुबा कोळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.  येणाऱ्या सर्वच्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवन्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसचे जिल्हा परिषद गट निहाय पक्ष निरीक्षक नेमण्यात आले. संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सुधाकर पाटील यांची तर जिल्हा संपर्कप्रमुखपदी भागवत मदने, उमरगा तालुका उपाध्यक्षपदी महादेव सुर्यवंशी, शहर अध्यक्षपदी सागर कागे यांची निवड करण्यात आली. बैठक अतिशय उत्साहात पार पडली. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष यशाच शिखर गाठल्यशिवाय रहाणार नाही, हे या बैठकीत दिसुन आले. बैठकीसाठी मळगी ग्रामपंचायतचे सरपंच राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी गावडे बुवा, जिल्हाध्यक्ष सचिन देवकते, अशोक पानढवळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुहासिनी पाटील, उमरगा तालुका अध्यक्ष सहादेव यमगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे : महादेव जानकर

मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे : महादेव जानकर 

पुणे (१ ऑगस्ट २०२५) : मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलताना केले. मातंग समाज तर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते, महादेव जानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री. जानकर आपल्या भाषणात म्हणाले, आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने मातंग समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं मी अभिनंदन करतो. आण्णाभाऊ साठे आपल्यासाठी भरपूर काय करून गेले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या समाजाची काय प्रगती झाली आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे. डीजे वाजवून धागड धिंगाना घालून समाजाचं भलं होत नाही, समाजाचं भलं करायचं असेल तर काय केलं पाहिजे याचं चिंतन झालं पाहिजे. मुक्ता साळवे यांनी लिहिलेले पत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे. आज आम्ही महात्मा फुलेचे वारसदार समजतो पण महात्मा फुले यांची खरी जिवंत कहाणी कोणी ठेवली असेल तर त्याच नाव आहे लहुजी वस्ताद साळवे. मातंग समाजाचे बहुजन समाजावर उपकार आहेत. ज्यावेळी या देशातली व्यवस्था महात्मा फुलेंना संपवण्यासाठी निघाली होती, त्यावेळी मातंग समाजाचा एक महात्मा फुलेंच्या पाठीमागे खंबीरपणे होते. आज मातंग समाजाची भागीदारी कुठे आहे? आयएएस, आयपीएस, मंत्री नाहीत. आमचे गणेश लोंढे यांची मुलगी पाहील न्यायाधीश झाली, ती समाजाची भूषण आहे. मातंग समाजाच्या मुलाने मेल्यानंतर जागा मिळावी अशी मागणी केली, पण मातंग समाजाने राज्य करणारी जागा पाहिजे, असे मागावे. मातंग समाजाने राज्यकर्ते बनावे. कुणाचे चमचे बनून, एक दोन मंत्री बनून भला होणार नाही. समाजातले शिक्षण वाढवावे लागेल. मुला मुलींसाठी होस्टेल बनवावी लागतील. मातंग समाजाची मुले अधिकारी झाली पाहिजेत, यासाठी समाजातील विचारवंतानी विचार केला पाहिजे. एक मुलगी जज बनवून चालणार नाही, सुप्रीम कोर्टाचा देखील जज बनला पाहिजे. ज्यांची मते कमी आहेत, ते आमच्यावर राज्य करतात. ज्यांची मते जास्त आहेत ते भीक मागत फिरतात, हे बदलले पाहिजे. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, लोकशाहीच्या शासन, प्रशासन, न्यायालय, पत्रकारिता या चारही स्तंभात मातंग समाजाची भागीदारी नाही. देशाच्या व्यवस्थेला हादरवणाऱ्या माणसाला लहुजी  वस्ताद यांनी साथ दिली होती, आणि त्यांचे स्मारक बनवण्यासाठी आमच्या पोरांना लढा उभा राहू लागतो? बापजाद्यांसाठी त्यांना दहा मिनिटात पाहिजे ते मिळतं, यासाठी आम्ही राज्यकर्ते बनले पाहिजे. आपल्या समाजातील चमचे लोक तिथे आहेत, म्हणून समाजाचे वाटोळे झालेला आहे. आता एका सरांनी सांगितले संविधान बदललं, सत्तेत बसलेले संविधान बदलायला बसलेत, त्यात त्यांचं नुकसान नाही, आपले नुकसान आहे. पण आम्ही त्यांना बदलू देणार नाही, यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय. मागून हक्क मिळत नाही ते हिसकावून घ्यायचे ताकद ठेवावी लागेल. आण्णाभाऊ साठे ना वंदन करण्यासाठी मुख्यमंत्रीच इथे आला पाहिजे. मातंग समाजाची संख्या खूप आहे, सकाळपासून तरुण पोरं पेठेत फिरत आहेत. यात उद्योजक झाले पाहिजेत. बिल्डर झाले पाहिजेत. उच्चभ्रू सोसायटीत राहिला पाहिजे. आम्ही विधानसभेला मातंग समाजाला 22 तिकीट दिले पैसेही दिले. आताचे सरकार हक्क आणि अधिकार चोरणारे सरकार आहे. मातंग समाजातील धनवान लोकांनी गरीब मुला-मुलींना आयएएस आणि आयपीएससाठी दत्तक घ्यावे. आम्ही मेंढर राखायची आणि तुम्ही केरसुणी शिवायच्या ही व्यवस्था बदलायची असेल तर एक मुलगी कलेक्टर करा, एक मुलगा मंत्री करा. एकाला उद्योगपती करा. आज मी जजचा सत्कार केलेला आहे, पुढच्या वेळी चार-पाच कलेक्टरचा सत्कार करायची संधी मिळावी. आपल्यातले हेवेदावे जाळून टाका. व्यसनापासून बाजूला राहून उच्च प्रतीचं शिक्षण घ्यावे लागेल.

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली

करैरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जागरुकता रॅली 

शिवपुरी (२०/७/२५) : सर्वसामान्यांना पिळवणूक करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत मध्यप्रदेशातील करेरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. सर्वांना एक शिक्षण, मोफत आरोग्य सेवा, शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत पुरवावीत, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये आदी मागण्यावरून राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती रॅली काढली. राम राजा गार्डन येथे रॅलीची सांगता सभा झाली.  यावेळी पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमाची चर्चा, काँग्रेस भाजप पक्षात नाराज असलेल्या लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला. ग्वाल्हेर येथे होणाऱ्या अधिवेशनसाठी प्रभारी म्हणून प्रदेश प्रधान महासचिव अशोक बघेल, सहप्रभारी कु. अर्चना राठोड, डी. एस. चौहान, मोहरसिंह केवट यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. काँग्रेसचे नगरसेवक सरवन आदिवासी, चंदेल खान, प्रजापती यांनी महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय समाज पक्ष प्रवेश केला. 

जनजागृती रॅलीत सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. करैरा येथील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या रॅलीत मध्यप्रदेश राज्य प्रदेश प्रभारी प्राण सिंह पाल, प्रदेशाध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश सचिव बादामसिंह, रणवीर चौहान, सोनू पुरोहित, शिवपुरी जिल्हाध्यक्ष मोहब्बतसिंह पाल, रामकृष्ण विश्वकर्मा, भूपेंद्र गुप्ता, रामगोपाल जाटव, के. पी परिहार, रामपाल, करेरा शहराध्यक्ष डॉक्टर मुकेश कोहली, कुसुम जोशी, अवंतीबाई लोधी, राजकुमारी वर्षा पाल, मीराबाई कोहली, सुनिता पाल, राणी साहू, कमलेश वाल्मीक, सत्यम आदिवासी, मानसिंह पाल, देवीलाल जाधव, मुकेश पाल, धर्मेंद्र कुशवाहा यांच्यासह शिवपुरी, अशोक नगर, ग्वालियर, दतिया, भिंड, मुरेना येथील पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती नाही : महादेव जानकर

कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती नाही : महादेव जानकर 

मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा 

मुंबई (२४/७/२५) : कोणाशीही युती होईल, मात्र भाजप बरोबर युती होणार नाही. भाजप ही समाजात विष पेरणारी पार्टी आहे. संविधान संपवण्याचे काम करत असल्याने, मतधारक जनतेने सावध राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. श्री. जानकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ : ३० वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा विभागीय मेळावा वैभवनगर शैक्षणिक सभागृह, चेंबूर मुंबई येथे पार पडला. या मेळाव्यात पक्ष शिस्त, मुंबई महानगरपालिका निवडणूक, देश व राज्यातील चालले राजकारण आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका याबद्दल  रासपा राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. फुलेपीठावर राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश सचिव इकबाल अन्सारी, मुंबई प्रदेश खजिनदार महावीर (आण्णा) वाघमोडे, मुंबई कामगार आघाडी नेते तुकाराम पाटील, महिला आघाडी मुंबई प्रदेश सचिव सौ. स्वाती जमदाडे, सौ. विद्याताई दुधाळ आदी विराजमान होते. मानखुर्द तालुका अध्यक्ष समीर खान, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव महेश बोडके यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अन्य पदाधिकारी, हितचिंतक, रासपप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात अनेक मान्यवरांनी महादेव जानकर यांची भेट घेतली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची कामगिरी पाहून पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचे निर्देश दिले. अनेक पदाधिकारी पक्षात पदावर असूनही पक्षाचे सक्रीय सभासद नोंदणी, प्राथमिक सभासद नोंदणी केली नसल्याकडे लक्ष वेधले. पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता, इतर पक्षाशी सलगी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर ठेवू नये, अशा कडक सूचना दिल्या. पद घेऊन काम शून्य, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद देऊ नयेत, कारण हे पदाधिकारी स्वतःची, पक्षाची, नेतृत्वाची फसवणूक करत असल्याची, ही गंभीर बाब स्वतः पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितली. प्रत्येक महिन्याला मीटिंग घेऊन, कोणते काम केले, किती संघटन वाढवले याचा आढावा घेऊन अहवाल  पक्ष कार्यालयाकडे पाठवून द्यावा. 

पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण स्वतः ठामपणे उभे राहून ताकद देवू, असा विश्वास श्री. जानकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व भाषिक, सर्व प्रांतीय, सर्व जात धर्मियांना राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे मोकळे आहेत. पद मोठे आणि काम नाही, अशा पदाधिकाऱ्यांना श्री. जानकर यांनी सुनावले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांनी करावी. कोणावरही अवलंबून न राहता वॉर्ड अध्यक्षपासून संघटन बांधणी करावी. महिला आघाडीचे संघटन मजबूत करावे.

राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन ग्वाल्हेर येथे आयोजित : अशोककुमार बघेल

राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन ग्वाल्हेर येथे आयोजित : अशोककुमार बघेल

पत्रकार परिषदेत बोलताना मध्य प्रदेश प्रधान सचिव अशोककुमार बघेल, बाजूस अर्चनासिंह राठोड, रणवीरसिंग चौहान.

राष्ट्रीय अधिवेशनास देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार 

भिंड (१३/८/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचा २२ वा वर्धापन दिन २९ ऑगस्ट २०२५ रोजी ग्वाल्हेर येथे मानस भवन फुलबाग येथे आयोजित केला आहे, देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी, जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे मध्य प्रदेश महासचिव अशोककुमार बघेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जगदीश मेरीज गार्डन येथे राष्ट्रीय समाज पक्षाने पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी ग्वाल्हेर लोकसभा रासप उमेदवार इंजी. अर्चनासिंह राठोड, लोकसभा प्रभारी रणवीर सिंह चौहान, कॅप्टन राजेश्वर यादव, प्रदीपसिंह बघेल, राकेश सिंह बघेल, पुरुषोत्तम बघेल, छोटू बघेल, बंटी बघेल उपस्थित होते.

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंड येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे अभिवादन करण्यात आले. श्री. बघेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन देखील पार पडणार आहे. देशभरातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे. हर हर महादेव - घर घर महादेव नारा देऊन कार्यकर्ता लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहचवत आहेत. महादेव जानकर यांच्या नेतृत्वात शेतकरी, कामगार, शोषित, युवक, सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. ग्वाल्हेर क्रांतिकारकांची भूमी आहे. सर्व नागरिकांनी पक्ष वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कु. अर्चना सिंह राठोड म्हणाल्या, मत चोरी होणे ही लोकशाहीची हत्या आहे. उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मत कार्डला आधार कार्ड लिंक करावे.

ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे : महादेव जानकर

ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांनी माझ्यासोबत यावे : महादेव जानकर 

 पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, मंचावर डावीकडून बाळासाहेब कोकरे, प्रा. मनोज निगडकर, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, सुनीता किरवे.

पुणे (१/८/२५) : ज्यांना सत्तेच्या विरोधात संघर्ष करायचा आहे, त्यांनीच माझ्यासोबत यावे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुणे येथे केले. श्री. जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा आयोजित कमिन्स हॉल, पत्रकार भवन, नवी पेठ येथे पदाधिकारी व कार्यकर्ती संवाद बैठकीत बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. श्री. जानकर यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसह रासपाचे नेते स्व. सुनील दादा बंडगर यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रीय समाज पक्षाने भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मदत केली, मात्र सत्तेतवर आल्यानंतर त्याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवली नाही. आता भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना केले.

श्री. जानकर पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष कोणासोबत युती करणार नाही. स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवायची आहे. पुणे शहर अध्यक्षांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत सर्व वॉर्ड अध्यक्षांची नियुक्ती करावी. पुणे जिल्ह्यात दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षासाठी अनुकूल आहे, मात्र तिथेही म्हणावे तसे संघटन नाही. एखादा तालुका राहिला तरी चालेल, मात्र जिथे आपण राहतो तिथे तरी पक्षाचे संघटन उभे केले पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केवळ समाजमाध्यमावर फोटो टाकण्याचे काम न करता आपला पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसे जातील, यासाठी प्रयत्न करावे. आगामी महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक बूथवर एक कार्यकर्ता असला पाहिजे, असे नियोजन करा. पक्षाचा जो पदाधिकारी काम करणार नाही त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष सोडून जाणाऱ्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली आहे, हे तुम्ही पाहता. उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात, याचा विचार करायला पाहिजे.

यावेळी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रा. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस अजित पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्रीमती सुनिताताई किरवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक लक्ष्मण ठोंबरे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे व राष्ट्रीय समाज पक्ष, पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, July 19, 2025

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर

राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार, सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही : महादेव जानकर 

मुंबई : नाव गरीबांचे घ्यायचे आणि काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे, राज्यातील सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नाही, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्य सरकारला फटकारले. श्री. महादेव जानकर यांनी प्रसारमाध्यमांशी आपली भूमिका स्पष्ट केली.

श्री. मराठीच्या मुद्द्यावरून जानकर म्हणाले, आपल्याला सर्व भाषा आल्या पाहिजेत, या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. जगात फिरण्यासाठी इंग्लिश आले पाहिजे. देशाचे राजकारण करण्यासाठी, दिल्लीवर सत्ता करायची असेल तर आपल्याला हिंदी आली पाहिजे. प्राथमिक शिक्षण नंतर हिंदी आणि इंग्रजी भाषा अभ्यासक्रमात असावी. न्यायालयात सर्व निवाडे मराठीतून नाहीत तर इंग्लिश मधून आहेत. जागतिक स्पर्धेत आपली मुले टिकली पाहिजेत, ही रासपची भूमिका आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जानकर म्हणाले, शेतकऱ्यांना दिलेला वादा सरकारने पुरा करावा. मोठमोठ्या उद्योगपतींना बिल्डरला पैसे द्यायला आहेत. शेतकऱ्याला द्यायला नाहीत. हे सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. नाव घ्यायचे गरीबांचे, काम श्रीमंतांचे करायचे हे सरकारचे धोरण आहे. यावर जनतेने विचार करावा. एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थी परेशान आहेत. कंत्राटदारांचे पैसे दिलेले नाहीत. सर्वांना परेशान करून ठेवलेले आहे, वरून दाखवतात सर्व चांगले चालले आहे, पण असे काही नाही. आम्ही बांधावर फिरणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे जनतेत फार आक्रोश निर्माण झालेला आहे. जनतेच्या असंतोषाला वाट करून देणे आमचे काम आहे. शेतकरी शक्तिपीठ नको, म्हणतात तर ते कॅबिनेटमध्ये पास केला, हे कितपत अन्याय करणार आहेत. मनी, मिडिया आणि माफिया यांच्या जोरावर चालले आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेले सरकार जास्त काळ टिकत नसते. महाराष्ट्र ही फुले, शाहू, आंबेडकर यांची भूमी आहे. निश्चितपणे उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाहीत. विद्यमान सरकारच्या विरोधात लढणार आहे.

रासपच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांची सदिच्छा भेट

रासपच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांची सदिच्छा भेट


पुणे (२/७/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक इंजिनिअर बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी येथील पक्षाच्या प्रदेश मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा झाली, तसेच आगामी संघटनात्मक कार्यक्रमांची रूपरेषा देखील ठरविण्यात आली.

या भेटीमुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, राष्ट्रीय संघटक म्हणून लेंगरे मामा यांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे पक्षाच्या भविष्यकालीन वाटचालीस निश्चितच लाभदायक ठरणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोकरे, राज्य सरचिटणीस अजित पाटील, लक्ष्मण ठोंबरे, कालिदास गाढवे, एड. संजय माने - पाटील उपस्थित होते.

मध्य प्रदेश रासप प्रधानसचिपदी अशोक सिंह बघेल यांची नियुक्ती

मध्य प्रदेश रासप प्रधानसचिपदी अशोक सिंह बघेल यांची नियुक्ती 

भोपाळ (१६/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष मध्य प्रदेश राज्य प्रधान सचिवपदी अशोकसिंह बघेल यांची नियुक्ती केल्याचे, यशवंत नायकशी प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले. अशोक सिंह बघेल हे भिंड जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करण्यापूर्वी श्री. बघेल हे आर्थिक समानता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात ते सक्रीय होते. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सिंह बघेल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश अध्यक्ष श्रीलाल बघेल, प्रदेश उपाध्यक्ष डी. एस. चौहान, प्रदेश सचिव मोहर सिंह केवट, बादाम सिंह बघेल, ग्वाल्हेर लोकसभा प्रभारी रणवीरसिंह चौहान, मिठ्ठनलाल वंशकार, रामकृष्ण विश्वकर्मा, हकिमसिंह रावत, मोहब्बत सिंह पाल, सोनू पुरोहित, प्रकाशसिंह बघेल, केपी  परिहार, अनिश रघुवंशी, प्रताप बघेल,   ज्ञानसिंह पाल, डॉक्टर मुकेश कोहली, ब्रिजेश प्रजापती, धर्मेंद्र कुशवाहा रवी रजक आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

बहुजनांच्या चळवळी उध्वस्त करण्याचा प्रयत्न : महादेव जानकर

बहुजनांच्या चळवळी उध्वस्त करण्याचा प्रयत्न : महादेव जानकर 

मोहोळ (१५/७/२५) : बहुजनांच्या चळवळी व राजकीय पक्ष, संघटना आणि आरक्षण उध्वस्त करण्याचा जोरदार प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री यांनी काढले. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील कार्यकर्ते सुरेश आवारे व ग्रामस्थांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 

गावातील ग्रामस्थांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये महादेव जानकर यांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्या कसबे यांनी सत्कार केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रिपाइंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे, जिल्हाध्यक्ष विकास आलदर, जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी, जिल्हा सचिव नागेश हजारे, माजी सरपंच तानाजी माळी, बलभीम आवारे, नवनाथ आवारे, महादेव आवारे, डॉक्टर स्वप्नील आवारे, रवी हजारे, दीपक शिंदे, राजु चेंडगे, अमोल चवरे, समाधान काळे, बीरू आवारे, बापू आवारे, तायाप्पा वाघमोडे, सुभाष कसबे, शिवरत्न आवारे, सुशांत आवारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे; महादेव जानकर यांनी ठाकरे बंधूंना भरवले पेढे

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे; महादेव जानकर यांनी ठाकरे बंधूंना भरवले पेढे 




मुंबई (५/७/२५) : वरळी येथे शिवसेना उबाठा पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे अनेक संघर्षांनंतर एकत्र आल्याचे पहायला मिळाले. याचा आनंद म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना व महाराष्ट्रातील नेत्यांना पेढे भरवून त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा वरून काढलेल्या जीआरमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. राज्यातून मोठा विरोध झाल्यावर सरकारने तो जीआर रद्द केला. ठाकरे बंधूंनी पक्ष झेंडा विरहीत विजयी मेळाव्याचे आयोजन करत, राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. रासपलाही आमंत्रण दिले होते. महादेव जानकर यांनी उपस्थित राहून खास पाठिंबा दिला. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे, देशावर राज्य करायचे असेल तर हिंदी शिकले पाहिजे, जगातील ज्ञान मिळवायचे असेल तर बहुभाषा आत्मसात केल्या पाहिजेत, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी महादेव जानकर यांचा आवर्जून उल्लेख करत आभार मानले. "इथे महादेवराव बसलेत, महादेवराव जानकर यांना खूप दिवसांनी पाहतोय. काहीवेळेला जानकर भी अंजान होते" असे हसतमुखातून उद्धव ठाकरे यांनी उदगार काढले.

मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खा. सुप्रिया सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, भालचंद्र कांगो, कॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.

Friday, July 18, 2025

धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनांचा गैरवापर; भ्रष्ट शिक्षण संस्थाचा कारभार चव्हाट्यावर

धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनांचा गैरवापर; भ्रष्ट शिक्षण संस्थाचा कारभार चव्हाट्यावर 



विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता ; रासपच्या जिल्हाध्यक्षांचा घणाघाती आरोप


मुंबई (११/७/२५) :  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मंत्री असताना धनगर समाजासाठी आणलेल्या १३ योजनांपैकी एक असणाऱ्या गरीब मुलामुलींना इंग्रजी माध्यमातून देण्यात येत असलेल्या शिक्षण योजनांचा गैरवापर झाला आहे. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस अजित पाटील यांनी नाराजी व्यक्त करून सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी मंत्री काळात केलेल्या विशेष प्रयत्नामुळे, धनगर समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'धनगर समाजाच्या योजनांना निधी दिला जात नसल्याबद्दल,  सभागृहात महादेव जानकर यांनी आवाज उठवला होता. राज्य सरकार केवळ आश्वासन देऊन निधी देत नसल्याचे सभागृहाचे लक्ष वेधले होते." प्रत्यक्षात मात्र छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील शिक्षण संस्थानी गोरगरीब धनगर मुलांच्यासाठी असलेल्या निधीवर डल्ला मारल्याचे उजेडात येत आहे. हा प्रकार केवळ मराठवाड्यात नसून राज्यभर हा घोटाळा झाल्याचा संशय धनगर समाजातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश, वसतीगृह, भोजन, शैक्षणिक साहित्य अशा सुविधा देण्याचा हेतू होता. रासपचे अजित पाटील म्हणाले, ही योजना सुरुवातीला तत्कालीन मंत्री महादेव जानकर साहेबांच्या पुढाकाराने, राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आली. समाजातील हुशार पण दुर्लक्षित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा त्यामागचा हेतू होता. पण आता हाच हेतू बाजूला पडतोय... आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार पुढे येतोय. काही ठिकाणी शाळा, संस्था आणि वसतीगृह चालकांकडून या योजनेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार वृत्त वाहिन्यांमधून, सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीतून समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

श्री. पाटील पुढे म्हणाले, कागदोपत्री विद्यार्थी दाखवून कोट्यवधींचं अनुदान उचललं जातंय. नाव, शाळा, वसतीगृह फक्त कागदावर – प्रत्यक्षात विद्यार्थीच नाहीत. धनगर समाजाच्या डोळ्यात धूळ टाकून तसेच सरकारची फसवणूक करून ही योजना भ्रष्टाचाराचं कुरण बनवली गेली आहे. बहुजन कल्याण विभाग काय करतंय? जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई? तपास, ऑडिट किंवा चौकशी कुठे आहे? गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना न्याय मिळतोय का? या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे अनेकांना वाटतंय की सरकारच्या कामकाजालाच भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आज लाभ कोणाला? ठराविक नेत्यांना! शिक्षणाचं नाव घेऊन पैसे कमवणाऱ्यांना! आणि ज्यांचं शिक्षण खरंच मोडतंय – त्या मुलांना काय? ही बाब समाजासमोर आणणं आवश्यक आहे. ही योजना महादेव जानकर साहेबांच्या सकारात्मक संकल्पनेतून सुरू झाली होती, पण आज तिचं रूपांतर अनियंत्रित भ्रष्टाचारात झालं आहे. या प्रकारांची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.



धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारा भाजप कार्यकर्ता असल्याचा, घणाघाती आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष रमेश काटकर यांनी केला आहे.

Tuesday, July 15, 2025

रासपच्या कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती

रासपच्या कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती

मुंबई (१५/७/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक युवती प्रदेशाध्यक्षपदी बंगळुरू येथील डॉ. रेणुका होराकेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी दिली. डॉ. रेणुका यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र श्री. जोगीन यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ. रेणुका होराकेरी या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात, त्यांना "ब्यूटी विथ अ ब्रेव्ह हार्ट" म्हणून ओळखले जाते. त्या मिसेस इंडिया २०२० च्या उपविजेत्या आहेत. डॉ. रेणुका यांनी राजाजीनगर येथील एमईआय पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यांना महिला अचिव्हर्स पुरस्कार, वॉरियर्स पुरस्कार, कर्नाटक हेम्मे पुरस्कार, बंगळुरू महिला शक्ती पुरस्कार, श्री विश्वेश्वरय्या पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार, चिन्नाडा बेटे सीझन २ (कस्तुरी वाहिनी) येथे सुवर्ण आदि पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

डॉ. रेणुका होराकेरी यांची युवती प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने त्यांची राष्ट्रीय समाज पक्षातून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला आहे. भारतात महिलांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा पहिल्या भारतीय महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या सर्वजण कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्शवाद घेऊन चालणारा पक्ष आहे. डॉ. होराकेरी यांना राष्ट्रीय समाज पक्षात काम करण्याची मोठी संधी दिली आहे, त्या कशा पद्धतीने काम करतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.

रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा

रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा 


14/7/2025 : रासपाचे लढाऊ नेते सुनीलदादा बंडगर यांचे निधन; राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा 

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव तसेच उत्तर कर्नाटक प्रभारी सुनीलदादा बंडगर यांचे आज पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनिलदादा फार घाई केलीत. तुमच्या अकाली निधनाने कुटुंबाचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे फार मोठे नुकसान झाले. दादा तुम्ही पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते नेते होता. दादा तुम्ही आम्हाला असं अचानकपणे जाऊन आम्हाला पोरंक करून गेलात, अशी भावना कार्यकर्त्यात आहे. बांधकाम कामगार ते बिल्डर व रासप कार्यकर्ते ते प्रदेश सचिव असा तुमचा प्रवास पक्षाची शिस्त राखणारा कार्यकर्ता हे दाखवून देते. बारामती लोकसभा मतदारसंघात पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघात कमी मते मिळाल्याची जबाबदारी घेऊन आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यायची घेतलेली भूमिका आठवतेय. पक्ष तळागाळात रुजत असताना जानकर साहेबांच्या नावाने एमजे पार्क नाव दिल्याचे जुना रासप कार्यकर्ता सांगत होता. आदरणीय दादा तुम्हाच्या सारखं व्यक्तीमत्व, नेतृत्व पुन्हा होणार नाही. तुमची आठवण पावलोपावली नेहमीच जाणवत राहील..!तुमच्या पश्चात राष्ट्रिय समाज पक्षाला नेहमी उणीव भासेल. दादांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षात शोककळा पसरली. (दिनांक १४ जुलै) त्यांच्यावर अक्कलकोट मधील मैदर्गी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. मा. महादेव जानकर यांनी एका अत्यंत भावनिक आणि कृतज्ञतेने भरलेल्या प्रसंगी त्यांच्या पार्थिवास राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा ठेवून दादांना अभिवादन केलं. दादांची शेवटची इच्छा होती की, "मी मरताना माझ्या प्रेतावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा घाला," आणि ती इच्छा जानकर साहेबांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केली. ही कृती केवळ एका कार्यकर्त्याच्या श्रद्धेचे नव्हे, तर संपूर्ण पक्षाच्या मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. पक्षासाठी आयुष्यभर झगडलेल्या व्यक्तीच्या कार्याचा आणि त्याच्या भावना, श्रद्धेचा मान राखला गेला.

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी मा. महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वाजत गाजत भव्य मोर्चा काढणारा लढवय्या नेता सुनीलदादा होते. अकोला येथे झालेल्या राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात स्वाभिमानी बंडखोर खणखणीत आवाजात स्वाभिमानाने भाषण देणारे, त्याप्रमाणे महाराष्ट्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारक्षेत्रात एकाकी झुंज देणारे नेते सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाचे वृत्त पाहून अत्यंत दुःख झाले.

2009 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत गृहराज्यमंत्र्याच्या विरोधात दंड थोपटणारा नेता म्हणून सुनील दादानी दाखवून दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी लढणारा नेता, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा नेता, तसेच  जानकर साहेब यांचा आदेश प्रमाण मानून एकनिष्टने काम करणारा कार्यकर्ता नेता, समाजकारण राजकारणात गुळगुळीत भूमिका न घेता रोखठोक सडेतोड भूमिका घेणारा नेता म्हणजे सुनीलदादादा बंडगर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपले दैवत असणारे नेते महादेव जानकर यांना विश्वासाने दगा देणाऱ्या भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेऊन जशास तसे उत्तर देणारा नेता सुनीलदादा बंडगर होते.

विधानसभा निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी दादांना आर्थिक प्रलोभने दाखवली गेली, पण त्या सर्वांना धुडकावून लावत रणमैदानात स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार घेऊन बाणेदारपणे लढत देत, समाजासाठी झटणारा मी कार्यकर्ता आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. देशपातळीवर सुनीलदादांचं नाव चर्चिले गेले. ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते संदिग्ध भूमिकेत असताना जानकर साहेब यांच्यावर विश्वास ठेवून सुनीलदादानी निःसंदिग्धपणे अक्कोलकोट विधानभक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे रणशिंग फुंकले. सुनील दादा बंडगर यांनी चांगली लढत दिली, असे सांगितले गेले, तसे राष्ट्रीय समाज पक्षात राज्य व राष्ट्रीय पातळीवर   बोलले जात होते. सुनीलदादा बंडगर हे अठरापगड समाजातील समाजघटकांना सोबत घेऊन काम करत होते. सुनिलदादा यांचा राजकारणात दबदबा वाढत होता. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, शेतमजुर यांच्या प्रश्नावर सुनीलदादा बंडगर सातत्याने आवाज उठवत होते.  सर्वसामान्यांना त्यांचा मोठा आधार होता. राष्ट्रीय समाज पक्षात ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य त्यांच्याकडून होत होते. प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला न जाता, छोट्या मोठ्या सत्तेला भीक न घालता, सत्व आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षात राहून संघर्षची भूमिका घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले. राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची आठवण कायम काढत राहील.

सुनीलदादा बंडगर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, कर्नाटक राज्य प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन यांनी यशवंत नायक जवळ शोक व्यक्त केला आहे. सुनीलदादा यांचे अकाली निधनाने राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना, राष्ट्रीय समाज पक्ष परिवार कार्यकर्त्यांना दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.  त्यांच्या स्मृतीस यशवंत नायक परिवार तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली....!

  - आबासो पुकळे, मुंबई.


-

Sunday, July 13, 2025

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 


मुंबई (२३/६/२०२५) : शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करा या मागण्यांचे राज्यातील तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजलेपासून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, सातबारा कोरा करा, अशा मागण्यासाठी राज्यभर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरत सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी सह अन्य आश्वासने पाळावीत, राज्यातील सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. केवळ समित्या नेमायच्या वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक करणारे राज्यातील फसवे सरकार असल्याचे टिकास्त्र सोडले. रासपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या नेतृत्वात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास राज्यभरात शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्री. शेवते यांनी दिला. 

सोलापूर, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, अहिल्यानगर , छत्रपती संभाजी नगर, रायगड, मुंबई, नाशिक, अकोला, बुलढाणा, पुणे, धाराशिव, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले, शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा करा अशी जोरदार घोषणाबाजी, निदर्शने केली. धनदांडग्या उद्योगपतींची कोणतीही आंदोलन मोर्चे न काढता कर्जेमाफ करता, मग शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी आंदोलन, मोर्चे का काढावे लागते, असा बोचरा सवाल श्री. शरद दडस यांनी अलिबाग येथे यशवंत नायक प्रतिनिधीशी बोलताना केला.

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...