Saturday, January 18, 2025

सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची कर्नाटकात रासपची मागणी

सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची कर्नाटकात रासपची मागणी 

कलबुर्गी (३/१/२५) : आदर्शवादी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा अंगीकार करून शैक्षणिक व सामाजिक क्रांतीसाठी स्वार्थत्यागाची तत्त्वे देशात राबविणे हे सामूहिक जबाबदारीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांनी केले आहे.

कलबुर्गी येथील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारतीय समाजातील महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या एका धाडसी स्त्रीने शैक्षणिक- सामाजिक क्रांती घडवली आहे, यापूर्वीच त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय प्रथम महिला शिक्षिका पुरस्कार आणि 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यात आले. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जीवनाचे बलिदान आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या प्रासंगिकतेसाठी मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात यावा, असे केंद्र सरकारकडे निवेदन रासप करत आहे. 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष राज्य युनिट सरचिटणीस शरणबसप्पा दोड्डमनी, गुलबर्गा जिल्हाध्यक्ष देविद्र चीगरहल्ली, सचिव श्रीमंत मावनूर, महतेश आवारदी, रमेश शाहबाडकर, दुर्गाप्पा तारफिले, आनंद सिन्नूरा, आर. शामाराव, रचना यद्रामी, ज्येष्ठ नेते अनप्पा जमादार, सनामा पाटील, विजयकुमार आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...