राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सातारा (२०/३/२५) : राजेश शासनाने नवीन केलेल्या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांची लूट होत आहे या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले शासनाच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये डॉक्टर रमाकांत साठे, रघुनाथ सकट, किरण माने, उमेश चव्हाण, सतीश शिंदे, अतिश कांबळे, सविता कणसे, रीना भोसले व अन्य महिला इत्यादी आंदोलनात सहभागी झाले. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, शासनाने सर्वसामान्य लोकांना न परवडणारे ऑनलाइन पद्धतीचे कायदे केले आहेत, अनेक शासकीय योजनांचा इंटरनेटच्या ज्ञानाअभावी लोकांना लाभ मिळत नाही, मुला-मुलींना शाळेचे दाखले वेळेवर मिळत नाही, इंदिरा आवास घरकुल योजना, पारधी आवास घरकुल योजना, यांच्या अटी व शर्ती पूर्ण करताना नागरिकांची परवड होत आहे. ज्या महिलांचे बँकेने सिबील खराब केले आहे, ते दुरुस्त करून त्यांना पुन्हा कर्ज देण्यात यावे, यशवंत घरकुल योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, अपंग परित्यकता विधवा महिलांना 5000 रुपये मानधन मिळावे, अशा विविध मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्या निवेदनावर मंगेश, महेश वायदंडे, विजय पवार, प्रशांत कोळी, संदीप पवार, मोहित बडेकर, वैष्णवी सुतार, आदेश कांबळे, किरण माने, यांच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment