Friday, March 28, 2025

लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना सडेतोड विचारमंथनाची गरज

लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना सडेतोड विचारमंथनाची गरज


गेल्या १०-१२ वर्षांपासून संघटनात्मक बांधणी करत आणि जनतेत संघर्षाची मशाल पेटवत राष्ट्रीय समाज पक्ष मैदानात उतरला. आज त्याला २० वर्षे पूर्ण झाली. मात्र, या कालखंडातही समाजाने स्वाभिमानाने जागे होण्याऐवजी अंधश्रद्धेच्या अफूची गोळी घेत निपचित पडण्याचेच काम केले. हा समाज आता झोपेचे सोंग घेत बसण्याचीही गरज भासत नाही, कारण तो पूर्णतः मानसिक गुलामीच्या विळख्यात अडकला आहे.


सरंजामशाही, जातिव्यवस्था आणि धर्माधारित गुलामीचा खेळ

नीतिमूल्यांची पायमल्ली करत सरंजामशाही व जातीव्यवस्थेच्या उतरंडी मोडण्याच्या उंबरठ्यावर समाज उभा असताना, त्याच समाजावर धर्माच्या नावाने नवीन जळमटं चढवली जात आहेत. गेली २००० वर्षांहून अधिक काळ हीच मानसिक गुलामी कायम ठेवण्यासाठी बुद्धीच्या जोरावर सत्ता गाजवणाऱ्या एका विशिष्ट वर्गाने आपली रणनीती बदलली आहे.

आज २१व्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या (IT) युगात संपूर्ण देशावर एका विशिष्ट विचारसरणीचा विळखा घातला जात आहे. ही मंडळी लोकशाहीचे धिंडवडे काढत, स्वायत्त संस्थांचे अस्तित्व संपवत, संविधानाच्या चौकटी मोडत एकछत्री सत्ता निर्माण करू पाहत आहेत.


स्वतःला क्षेत्रीय म्हणवणाऱ्यांची मानसिक गुलामी आणि राष्ट्रीय पराभवाची मानसिकता

जे स्वतःला क्षेत्रीय शक्ती समजतात, स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतात, तेही आता मांडलिकत्व स्वीकारत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ते एक विशिष्ट विचारधारेपुढे नतमस्तक झाले आहेत. त्यांच्या तलवारी म्यान झाल्या आहेत आणि त्यांनी पूर्ण पराभव स्वीकारला आहे.


स्वतंत्र भारतातील नव्या गुलामगिरीकडे वाटचाल

आजचा भारत मानसिक गुलामीतून आर्थिक गुलामीकडे वाटचाल करत आहे. लोकशाही व्यवस्था मोडीत काढली जात असताना, संविधान संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकदही उरणार नाही, अशी स्थिती निर्माण होत आहे.


राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते काय करणार?

हा संघर्ष अस्तित्वाचा आहे. या परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागे व्हावे आणि मैदानात उतरावे. गप्प बसल्यास या देशातील शेतकरी, कामगार, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिलावर्ग, दलित-वंचित यांची कायमची गुलामी ठरलेली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री राष्ट्रनायक मा.महादेवजी जानकर साहेब यांनी हा विचारधारात्मक संघर्ष आणखी तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूनच, राष्ट्रहितासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता झुंजारपणे मैदानात उतरणार आहे.

जय भारत! जय संविधान!

जय राष्ट्रीय समाज पक्ष

 - भगवान ढेबे, राज्य कार्यकारणी सदस्य रासप(११/३/२५)

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025