जोपर्यंत ओबीसींचा पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत काहीही अर्थ नाही : महादेव जानकर
अंबड येथे रॅलीत रासप सुप्रीमो महादेव जानकर |
जो ओबीसी की बात करेगा! वही देशपर राज करेगा !! असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अंबड येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात घणाघाती भाषणात, जोपर्यंत ओबीसींचा पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत आपल्या ओबीसी चळवळीला काही अर्थ राहणार नाही, असे रोखठोक विधान केले. पुढे आ. जानकर म्हणाले, काँग्रेसचा किंवा बिजेपीचा ओबीसी माणूस येईल आणि तुमची मते लुटली जातील, तेव्हा भुजबळ साहेब तुम्ही महात्मा फुलेवादाचा स्वतःचा ओबीसींचा पक्ष काढा, माझी तुम्हाला विनंती आहे. दुसऱ्या पक्षाचे आमदार, खासदार येतील आणि याला मत द्या, त्याला मत द्या म्हणतील, पण त्याला ओबीसी म्हणू नका. रासप नेते महादेव जानकर यांनी केवळ ४० सेकदांच्या भाषणात मंचावर उपस्थित व समोर उपस्थित जनसमुदयास विचार करण्यास भाग पडल्याची चर्चा जनतेत रंगली.
No comments:
Post a Comment