माणदेशी कवी : बाबासाहेब कोकरे
इतिहास कालीन माणदेश आज स्वतंत्र भारतात सातारा, सांगली,सोलापूर जिल्ह्यात विभागला आहे. लेखक शंकरराव खरात , माणदेशी शाहीर नाना बनगर, ग. दी, व्यंकटेश माडगूळकर बंधू यांच्या साहित्याने माणदेशी मातीची ओळख जगाला झाली. माणदेश भूमीत जांभुळणी ता-माण जि-सातारा येथे बाबासाहेब कोकरे यांच्या सारखे प्रतिभा संप्पन्न कवी नेहमीच दुष्काळाशी लग्न गाठ बांधल्याप्रमाणे माणदेशी रांगडया भाषेत आपल्या कवितांच्या ओळीच्या पुष्पमाला गुंफत आहे. बाबासाहेब कोकरे यांच्या कवितामधून वास्तव परिस्थितीचे धगधगते प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. माणदेशी माणसांच्या वेदनानां वाचा फोडणारे बाबासाहेब कोकरे कवितेतून माणदेशी माणसांना दुष्काळामुळे झालेल्या जखमा आपल्या लेखणीत पकडून कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. "शब्दांचे फटकारे" हा माणदेशी कवीचा लोकप्रिय कार्यकम वाडी, वस्तीवर मर्यादीत न राहता मुंबई-पुणे सारख्या शहरवासीयांना भुरळ घालत आहे. शेकडो साहित्यकांनी माणदेशी कवीचे तोंड भरून कौतुक केले. जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे, बोरगावचा ढाण्या वाघ सामाजिक सलोख्याचे अग्रदूत बापू बिरू वाटेगावकर यांनीही माणदेशी कवीचे अभिनंदन केले. माणदेशी कवीलाही दुष्काळी परिस्थितीचे चटके बसल्याने बाबासाहेब कोकरे यांनी मुंबई शहराचा रस्ता धरला. माणदेशी कवीला भेटण्याचे ठरविले होते. अखेर दि. २८ एप्रिल २०१६ रोजी कुर्ला-मुंबई येथे भेट झाली. दुष्काळ व माणदेश यावर भरपूर चर्चा झाली व अनेक नव विचार उदयास आले.
कवितेतून शब्दांचे फटकारे देाताना बाबासाहेब कोकरे
या माणदेशी नव कवीचे हजारो कार्यक्रम शाळा, महाविद्यालयात लोकप्रिय ठरत आहे. या क्रांतिकारी माणदेशी कवीची म्हणावी तितकीशी महाराष्ट्रातील प्रचार-प्रसार माध्यंमानी दखल घेतली नसल्याचे स्पष्टटपणे जाणवले. भारतीय लोकशाहीत टेंभा मिरवणरी प्रसार माध्यम दखल घेऊ अथवा न घेऊ महाराष्ट्राच्या मातीने माणदेशी कवीला जय महाराष्ट्र असा सलाम केला आहे. माणदेशी कवीला आगामी काळातील परीस्थितीत साथ देऊन सहकार्य करून मराठी साहित्याच्या वैभवात भर घालुया. चंगळवाद संस्कृतीने पछाडलेल्या मानवी मनाचे कान उघणारे व डोळयाची झापड काढायला भाग पाडणारे 'शब्दांचे फटकारे' हा कार्यक्रम आयोजीत करून यशाच्या शिखरावर कवीला पोहचवालच अशी अपेक्षा आहे. माणदेशी कवीला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
- आबासो पुकळे
मु . पुकळेवाडी पो - कुकुडवाड ता- माण
दि. ८ मे २०१६
इतिहास कालीन माणदेश आज स्वतंत्र भारतात सातारा, सांगली,सोलापूर जिल्ह्यात विभागला आहे. लेखक शंकरराव खरात , माणदेशी शाहीर नाना बनगर, ग. दी, व्यंकटेश माडगूळकर बंधू यांच्या साहित्याने माणदेशी मातीची ओळख जगाला झाली. माणदेश भूमीत जांभुळणी ता-माण जि-सातारा येथे बाबासाहेब कोकरे यांच्या सारखे प्रतिभा संप्पन्न कवी नेहमीच दुष्काळाशी लग्न गाठ बांधल्याप्रमाणे माणदेशी रांगडया भाषेत आपल्या कवितांच्या ओळीच्या पुष्पमाला गुंफत आहे. बाबासाहेब कोकरे यांच्या कवितामधून वास्तव परिस्थितीचे धगधगते प्रश्न प्रकर्षाने जाणवतात. माणदेशी माणसांच्या वेदनानां वाचा फोडणारे बाबासाहेब कोकरे कवितेतून माणदेशी माणसांना दुष्काळामुळे झालेल्या जखमा आपल्या लेखणीत पकडून कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. "शब्दांचे फटकारे" हा माणदेशी कवीचा लोकप्रिय कार्यकम वाडी, वस्तीवर मर्यादीत न राहता मुंबई-पुणे सारख्या शहरवासीयांना भुरळ घालत आहे. शेकडो साहित्यकांनी माणदेशी कवीचे तोंड भरून कौतुक केले. जेष्ठ समाज सेवक आण्णा हजारे, बोरगावचा ढाण्या वाघ सामाजिक सलोख्याचे अग्रदूत बापू बिरू वाटेगावकर यांनीही माणदेशी कवीचे अभिनंदन केले. माणदेशी कवीलाही दुष्काळी परिस्थितीचे चटके बसल्याने बाबासाहेब कोकरे यांनी मुंबई शहराचा रस्ता धरला. माणदेशी कवीला भेटण्याचे ठरविले होते. अखेर दि. २८ एप्रिल २०१६ रोजी कुर्ला-मुंबई येथे भेट झाली. दुष्काळ व माणदेश यावर भरपूर चर्चा झाली व अनेक नव विचार उदयास आले.
कवितेतून शब्दांचे फटकारे देाताना बाबासाहेब कोकरे
या माणदेशी नव कवीचे हजारो कार्यक्रम शाळा, महाविद्यालयात लोकप्रिय ठरत आहे. या क्रांतिकारी माणदेशी कवीची म्हणावी तितकीशी महाराष्ट्रातील प्रचार-प्रसार माध्यंमानी दखल घेतली नसल्याचे स्पष्टटपणे जाणवले. भारतीय लोकशाहीत टेंभा मिरवणरी प्रसार माध्यम दखल घेऊ अथवा न घेऊ महाराष्ट्राच्या मातीने माणदेशी कवीला जय महाराष्ट्र असा सलाम केला आहे. माणदेशी कवीला आगामी काळातील परीस्थितीत साथ देऊन सहकार्य करून मराठी साहित्याच्या वैभवात भर घालुया. चंगळवाद संस्कृतीने पछाडलेल्या मानवी मनाचे कान उघणारे व डोळयाची झापड काढायला भाग पाडणारे 'शब्दांचे फटकारे' हा कार्यक्रम आयोजीत करून यशाच्या शिखरावर कवीला पोहचवालच अशी अपेक्षा आहे. माणदेशी कवीला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
कवितेतून शब्दांचे फटकारे देाताना बाबासाहेब कोकरे
- आबासो पुकळे
मु . पुकळेवाडी पो - कुकुडवाड ता- माण
दि. ८ मे २०१६
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे