Sunday, September 23, 2018

दोन हातात दोन तलवार घेऊन लढणारी जगातील अद्वितीय महाराणी

"आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भिमाई होळकर जयंती"


दोन हातात तलवार घेऊन लढणारी जगातील अद्वितीय महाराणी

जागतिक पातळीच्या इतिहास संशोधकांनी आद्य स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भिमाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करून ठेवले आहे, एक दुर्दैवच आहे. १८ व्या शतकात ब्रिटीशांच्या विरोधात रणसंग्राम गाजवणा-या भीमाईला इतिहासात उपेक्षितच ठेवले आणि ब्रिटिशांविरूध्द लढाई न लढणा-या लक्ष्मीबाईस महान बनवले. भीमाईचा पराक्रम झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ४० वर्ष आधीचा आहे. परंतु या शुरवीर रणरागिणीच्या देशभक्तीकडे, जाज्वल इतिहासाकडे व तिच्या शौर्यगाथेकडे कोणत्याही इतिहासकाराचे जाणीवपूर्वक लक्ष गेलेले दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. 
गणित, विज्ञान, भूगोल या सारख्या विषयांचे विकृतीकरण केल्याचे आढळत नाही. परंतु इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे पुरावे पानोपानी सापडतात, असे का व्हावे? यामागचे षडयंत्र काय? याचा परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. जसा इतिहास समाजापुढे मांडला जातो, पुस्तकरूपाने लिहला जातो, विद्यार्थांना शिकवला जातो, तशीच व्यक्ती व समाज यांच्या मन आणि मेंदूची जडण-घडण होत असते.नेमका याचाच फायदा घेऊन इतिहासाचे विकृतीकरण करून काल्पनिक दंतकथांचा डोंगर उभारत असतात. (उदा-रामाचा महान त्याग, आदर्श राम, सीतेसारखा वनवास, सम्राट चंद्रगुप्ताचा गुरू चाणक्य, गो ब्राम्हण प्रतिपालक, मल्हाररावांचे ब्राम्हणीकरण, तुकाराम सदेह वैकुंठ, खूप लढी झाशीची राणी)
भारताचे प्रथम स्वातंत्र्यवीर, महापराक्रमी लढवय्या योद्धा इंग्रजाचा कर्दनकाळ,बलाढ्य ब्रिटिशांना सतत १८ वेळा पराभूत करणारा भारतातील एकमेव नरश्रेष्ठ, ब्रिटीशांविरूध्द प्रथमतः स्वातंत्र्याचा एल्गार पुकारणारा वीर यशवंतराव होळकर होय. यशवंतरावांनी ब्रिटीशांविरूध्द दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही. यशवंतरावांच्या समशेरीची चमक ब्रिटीशांसह चांगल्या बलाढ्य संस्थानिकांनीही चाखलेली होती. त्यामुळे यशवंतरावाचे साधे नावही उच्चारले तरी शत्रूचा थरकाप उडायचा एवढी जरब त्यांची होती. परमवीर यशवंतरावांच्या रक्तात देशभक्ती ओतप्रोत भरलेली होती. संपूर्ण भारतातून इंग्रजांचे उच्चाटन झाले पाहीजे असे त्यांना सदैव वाटायचे. कपटनितीचा वापर करत भारतातील पेशव्यांसह बहुतांशी संस्थानिकांनी इंग्रजाचे मांडलिकत्व स्वीकारले, परंतु नरश्रेष्ठ यशवंताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील होऊन प्रतिसाद देण्याचे नाकारले. महाराजा यशवंतराव हे भारतातील एकमेव संस्थानिक आहेत की, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटीशांशी लढा दिला. अशा नरश्रेष्ठ यशवंतराव होळकर (प्रथम) यांची एकुलती एक कन्या भिमाई. 
बालवयातच भिमाईने शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त केले होते. मराठी, हिंदी, उर्दू, फारसी या भाषा तिला अवगत होत्या. आठ-दहा वर्षाची असतांनाच तीर चालवणे, भाला फेकणे, धावत्या घोड्यावर बसण्याचे कसब बालभिमाने आत्मसात केले. भिमाईला यशवंतरावांनी घोडेस्वारी व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले होते तसेच लिहणयावाचण्याचेही शिक्षण तिला मिळाले होते. भालाफेक, बंदुक चालवण्यात ती पटाईत होती. यशवंतराव अत्यंत पुढारलेल्या विचारांचे असल्यानेच त्या काळात त्यांनी मुलीला शिक्षण दिले, जेव्हा स्त्रियांना जनान्याबाहेरही पडायची परवानगी नव्हती. (Indian Female Freedom Fighters-article in Sunday Tribune by Rajesh Chopra)
भिमाईचा विवाह विवाह धारचे संस्थानिक गोंविदराव बुंदेल यांच्याशी झाला. राजकुमारी भीमाई महाराणी बणून पतीच्या सहावासात जीवन व्यतीत करीत असतांनाच पती गोविंदराव बुंदेल यांच निधन झाले. भिमाराणीच्या जीवनात वडील यशवंतरावांचे निधन, आईचा मृत्यू, दत्तक मुलाचे निधन, भावाचा मृत्यू यासारखं वज्राघात झाले.
लाॅर्ड वेलस्लीला धडा शिकवला, १८१७ चे महिदपूर युध्दात रणरागिणी वीरागंना भीमाराणी प्रत्यक्षात युध्दात घोडयावर बसून सैन्य संचलन करत होती. भामाराणीने घोड्याची लगाम दातात धरली. दोन हातात दोन तलवार घेऊन अक्षरशः ब्रिटिश सैन्यांना कापून काढत होती. 
मेजर हंट सैन्य तुकडीसह आपल्याकडे येतांना पाहून भुकेल्या सिंहनीसारखी गर्जना करत अश्वरूढ भीमाराणी प्रचंड वेगाने हंटच्या दिशेने निघाली. क्षणार्धात तलवारीने हंट वर वार केला. हंटवर वार करून भीमा पुढे निघाली आणि फिरंगी सैन्यावर तुटून पडली.सपासप ब्रिटीश सेनेचे मुडदे पाडू लागली.
रणागंण रक्ताने न्हाऊन निघाले होते.ठार झालेल्या इंग्रज सेनेचा खच पडला होता. जखमी झालेले सैनिक प्राणांच्या आकांताने विवळत होते.बलाढय ब्रिटीश सैन्याची एका महिलेने अशी दाणादाण उडवणे ही गोष्ट खरोखरच अखिल भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. भिमाराणी निर्बलांना बळ, निराश्रीतांना आश्रय, निर्धनांना धन तर निराधारांना आधार देत असे. म्हणून राज्याच्या रक्षणासाठी आणि भीमाराणीच्या संरक्षणासाठी राज्याचा प्रत्येक नागरीक आपले प्राण द्यायला मागेपुढे पाहत नसे. भीमाराणी सुद्धा आपल्या सहकां-यासाठी व प्रजेसाठी आपला जिवही धोक्यात घालायला मागे पुढे पाहिले नाही.
भारतीयांचे आर्थीक शोषण करणा-या साम्राज्यवादी ब्रिटीशांची कर्दनकाळ ठरलेल्या रणरागिणी विरागंना भिमाराणी होळकर २२० व्या जयंतीच्या भारतमातेच्या लेकरांना हार्दिक शुभेच्छा. 

संदर्भ ग्रंथ-
१ ) रणरागिणी वीरागंना भिमाई-होमेश भुजाडे 
२ ) महाराजा यशवंतराव होळकर-संजय सोनवणी 
✍ आबासो पुकळे 
      पुकळेवाडी ता-माण
      १७ सप्टेंबर २०१५

2 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete
  2. त्रिवार अभिवादन

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...