Sunday, September 23, 2018

राष्ट्रीय ओबीसी समाजाचा मानबिंदु : एस एल अक्कीसागर साहेब

अक्कीसागर साहेबांची झंजावती ६१ वर्षे पूर्ण...!
...................................
राष्ट्रीय ओबीसी समाजाचा मानबिंदु : एस एल अक्कीसागर साहेब



भारत देशाचा मध्यवर्ती भूभाग म्हणून ओळखल्या जाणा-या मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे जन्म घेतलेले, दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात बेळगांव-चंदरगी मातृभूमी असणारे, भारतीय रिजर्व बॅक ऑफ इंडियाचे मॅनेजर अशी ओळख असलेले एस. एल. अक्कीसागर साहेबांची कर्मभूमी पश्चिम भारतातील महाराष्ट्रात पुणे- मुंबई अशी राहिली आहे.  श्री अक्कीसागर साहेब त्यांच्या भाषणाची सुरूवात करताना विविध दाखले देत भारतीय बहुसंख्याक समाज राष्ट्रिय कसा आहे याची ओळख करून देतात व जन्मभूमी-मातृभूमी-कर्मभूमीची सांगड घालून ते स्वतः राष्ट्रीय कसे आहेत हे सांगतात. त्यांच्या कार्याकडे नजर टाकली असता त्यांच्या जीवनाचा प्रवास हा राष्ट्रिय असून राष्ट्रीय समाजाच्या उन्नती साठीच राहीला आहे हे ठळकपणे निदर्शनास येते. आज  ५ डिसेंबर रोजी 'एस एल अक्कीसागर साहेब' या राष्ट्रीय समाजातील व्यक्तिमत्वास वयाची ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. एकसष्टी निमीत्त त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा लेखनीरूपी घेतलेला अल्पसा जीवन प्रवास वाचकांसमोर ठेवताना आनंद होत आहे.
देशाच्या आर्थिक धोरणांसाठी केंद्रबिंदू असणारी 'रिझर्व बँक ऑफ इंडिया' च्या मुंबई मुख्यालयातून गत वर्षी डिसेंबर- २०१६ मध्ये श्री. अक्कीसागर साहेब मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी भारतातील ओबीसीं कर्मचारी यांची संघटीत मोट बांधत 'ऑल इंडिया रिझर्व बँक ओबीसी वेलफेअर असोसिएशन' ची स्थापना केली.  त्यांना ऑल इंडिया आरबीआय ओबीसी वेलफर असोशिएशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष यासाठीही देशपातळीवर ओळखले जाते.  अक्कीसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  'NSEBC (OBC) फेडरेशन' या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला त्यांचे हक्क अधिकार, महत्व, समस्या, उपाय या विषयावर जागृत करण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. सध्या ते या संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत.

तमिळनाडू कार्यकर्ते सोबत मा. श्री. अक्कीसागर साहेब
बलशाली भारत निर्माणाचा पुरस्कार करणारा पहिला प्रतिनीधी म्हणून प्रकाशित होणारे मासिक : 'विश्वाचा यशवंत नायक'चे श्री. एस एल अक्कीसागर साहेब कार्यकारी संपादक आहेत. यशवंत नायक अंकातून राष्ट्रीय समाजात प्रचार-प्रसार करण्याचे काम त्यांनी माणदेशातील म्हसवड येथे बहुजन विराट मेळाव्यात मान्यवर. कांशिराम यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या पहिल्या हस्तलिखीत यशवंत नायक अंकापासून ते आतापर्यंत अखंडपणे सुरू ठेवले आहे. यावर्षी 'मासिक यशवंत नायक'ला २३ वर्षे पूर्ण झाली. यशवंत नायकच्या अंकामुळे राष्ट्रीय समाजात जाणीव जागृतीचे प्रमाण वाढले आहे. भारतीय प्रचार-प्रसार माध्यमांनी लपवलेली गेलेली प्रेरणास्थळे, राष्ट्रीय समाजातील महामानवांना 'यशवंत नायक' अंकातून प्रकाशझोतात आणणयाचे काम श्री. अक्कीसागर यांच्या हातून घडलेले आहे. मासिक 'यशवंत नायक'ची प्रेरणा घेऊन कोळी समाजाचे 'सागर शक्ती' नावाचे राष्ट्रीय मुखपत्र उदयास आले आहे. 
बदामी -  कर्नाटक येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २०० व्या स्मृतीदीना निमीत्त होळकरशाहीचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकर जन्म गांव होळ ता-फलटण व्हाया महाराजा यशवंतराव होळकर जन्म गांव-वाफगांव ता-खेड ते महाराजा यशवंत होळकर स्मृतीस्थळ भानपुरा जि-मंदसौर(मध्य प्रदेश) अशी रासपच्या नेतृत्वात राष्ट्रीय एकात्मता रॅली काढण्यात आली यामागे श्री. अक्कीसागर साहेबांची महत्वाची भुमिका होती. ऑक्टोबर- २०११ चा यशवंत नायक अंक महाराजांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला तर त्याचवर्षी सांस्कृतिक राजधानी तथा शिक्षणाची पंढरी असणा-या पुण्यातील प्रसिद्ध लेखक मा. संजयजी सोनवणी यांनी "स्वातंत्र्ययोध्दे महाराजा यशवंतराव होळकर' पुस्तक लिहले. आज महाराज यशवंतराव होळकर यांच्या कार्याचा प्रचार प्रसार वाढला असून प्रतिमा, पुस्तकांना जोरदार मागणी वाढली आहे.
आगरा उत्तर प्रदेश येथे मा. श्री. अक्किसागर साहेब
आंध्रप्रदेश तेलंगणा येथे मा. श्री. अक्किसागर साहेब
मा. एस.  एल. अक्किसागर साहेब
दक्षिण भारतात संत कबीरदासाप्रमाणे लोकप्रिय असणारे दंडनायक, सत्यशोधक संत कनकदास यांच्यावर पहिले मराठी पुस्तक लिहिण्याचा मान श्री. अक्कीसागर यांच्याकडे जातो. योगायोग म्हणजे त्यांचा ६० वा वाढदिवस दिल्ली येथे पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सवात कनकपीठातर्फे स्वामीजी व देशभरातील विविध क्षेत्रातील राष्ट्रीय प्रतिनिधीच्या उपस्थितीत सहपत्नीक साजरा करण्यात आला. दिल्लीहून मुंबईला परतलेल्या श्री. अक्कीसागर साहेब यांच्याशी शुभेच्छा देण्यासाठी संपर्क साधल्यावर त्यांनी भाग्यवान ठरलो अशी माझ्याशी बोलताना प्रतिक्रिया दिली. श्री. अक्कीसागर यांचे मल्हार भारती, दै. लोकसत्ता, दै. सामना, दै. पुण्य नगरी इ. वृत्तपत्रातून लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी विविध विषयावर विपुल असे स्फुटलेखन/वार्तालेखन केले आहे.
तमिळनाडू येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
त्यांच्याकडे येणारा कोणीही असो त्यांना ते आपलेसे वाटतात ही त्यांची खासीयत. परिस्थिती कशीही असो ते नेहमी सकारात्मक विचार करायला सांगतात. देशभरात त्यांच्या कार्यास सन्मान देणारा, त्यांच्या विचारांना मानणारा लहानापासून थोरांपर्यंत असा विविध राष्ट्रीय समाजजन आहे. यशवंत सेना ते राष्ट्रीय समाज पक्ष, भूतकाळातील धनगर-राष्ट्रीय समाजाचे स्थान ते वर्तमानातील धनगर-राष्ट्रीय समाजाचे स्थान, महत्व याबद्दल ते सर्व जाणून आहेत. भविष्यातील मार्ग कसा असेल याकडेही श्री. अक्कीसागर अचूकपणे लक्ष वेधतात. यशवंत सेना, रासप या सर्व टप्यात खंबीरपणे निष्ठेने साथ देणारे श्री. अक्कीसागरजी 'राष्ट्रनायक' महादेव जानकर साहेब यांच्या जवळचेही समजले जातात.
राजस्थान येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
आरबीआयमध्ये उल्लेखनीय कारकिर्द घडवून सेवानिवृत्त झाल्यावर श्री. अक्कीसागर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य महासचिवपदी निवड करण्यात आली.  दक्षिण भारत ते उत्तर भारत, पश्चिम भारत ते पूर्व भारत, ईशान्य भारतासह देशातील संपूर्ण राज्यांचा दौरा करणारे श्री.अक्कीसागर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी देशपातळीवर चांगल्या प्रकारे करत आहेत. देशाच्या कानाकोप-यात सर्व सीमांना राष्ट्रीय समाज पक्ष भिडवायचा आहे असे सांगणा-या महादेव जानकर यांचे हातबळकट करण्यासाठी श्री. अक्कीसागरजी राष्ट्रीय स्तरांवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

संत कनकदास जयंती, दिल्ली कार्यक्रमात मा.  श्री. अक्कीसागर साहेब
मला आठवतेय काही वर्षापूर्वी त्यांच्या डोळ्यास इजा झाली होती. सर्व भार दुस-या एका डोळ्यांवर होता तसा आजही आहे, पण तब्येतीकडे फार लक्ष न देता त्यांनी आपली लेखनी, वाचन, समाजकार्य सोडलेले नाही हे आवर्जुन नमूद करावे लागेल. सर्वसाधारणतः लोक सेवानिवृत्ती नंतर समाजकार्याकडे वळतात. पण श्री. अक्कीसागर साहेब सुरूवातीपासूनच समाजकार्यात तन-मन-धन देऊन सक्रिय सहभागी राहिलेले आहेत हे त्यांचे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे.
केरळ - कोची येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब
शालेय जीवनात गणित विषयात पैकीच्या पैकी गूण मिळवणारे, देशाचे अर्थकारण सांभाळणा-या प्रतिष्ठित बँकेत सेवा बजावणारे श्री. अक्कीसागर साहेब नक्कीच त्यांचा ज्ञानाचा पुरेपुर सदुपयोग करून भोळया-भाबडया वंचित, उपेक्षित राष्ट्रीय समाजाला राजकारणाबरोबर, सामाजिक, आर्थिक गणित जुळवून नवी दिशा देतील अशी आशा आहे. भारताच्या संसदेत महात्मा फुले वादाचा समतेचा झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष विस्तार देशाच्या सर्व राज्यात करून 'राष्ट्रनायक' महादेवजी जानकर यांचा आवाज देशपातळीवर बुंलद करण्याचे काम करत आहेतच पण पुढेही नव्या उत्साहाने करतील असे खात्रीपूर्वक सांगता येईल. श्री. एस एल अक्कीसागर साहेब देशाच्या कानाकोप-यात कार्य कर्तृत्वाने जोडलेले राष्ट्रीय समाजाचे व्यक्तिमत्व आहे. 
मध्यप्रदेश येथे मा. श्री. अक्कीसागर साहेब

मेंढपाळाच्या पालावर मा.श्री. अक्कीसागर साहेब व चिरंजीव सुदर्शन.
वेगवेगळ्या नावांनी निरनिराळ्या प्रदेशात विखुरलेल्या राष्ट्रीय समाजाला संघटित करणारे उत्तम संघटक आहेत. त्यांच्या कार्यावर, व्यक्तीमत्वावर लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे  बरेच काही आहे. थोडक्यात सांगायचे तर श्री.अक्कीसागर साहेब यांना राष्ट्रीय-ओबीसी समाजात देशभरात असलेला मान, सन्मान पाहता ख-या अर्थाने श्री.अक्कीसागर साहेब 'राष्ट्रीय समाजाचे मानबिंदु' ठरले आहेत असे वाटते. मध्ययुगीन काळात दिनदुबळ्या, पिचलेल्या समाजाला सर्व प्रथम ज्ञानाची कवाडे खुली करून देणारे महाज्ञानदेव महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव श्री. अक्कीसागर साहेब यांच्यावर आहे. महात्मा फुलेंना त्यांनी गुरू मानले आहे. श्री. अक्कीसागर साहेबांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून एकसष्टाव्या वाढदिवसानिमीत्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. 

✍ आबासो पुकळे,  
     पुकळेवाडी ता. माण, सातारा.
     ५ डिसेंबर २०१७

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...