१२ वी चा निकाल जाहीर; कोकणची बाजी तर लातूर पॅटर्न सर्वात मागे
निकालात पुन्हा मुलींचाच बोलबोला, मुलांपेक्षा ५ टक्केने पुढे
मुंबई (५/४/२५) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली.
यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.
बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.
यंदा निकाल घसरला
यंदा बारावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२२ या वर्षात ९४.२२ टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला होता. २०२४ मध्ये ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच या वर्षी २०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदा निकाल कमी का लागला त्यांचा आढवा घेण्यात येणार आहे.
खासगी विद्यार्थ्यांची एकून संख्या ३६ हजार १३६ इतकी होती. त्यामध्ये ३५ हजार ६९७ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यामधून २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७३.७३ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर सर्व शाखांमधून एकून ४२ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी नोंदनी केली होती. त्यापैकी ४२ हजार २४ विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसले होते. त्यामधून १५ हजार ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे.
No comments:
Post a Comment