Monday, February 3, 2025

रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा : धिरज पाटील, नाशिक

रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा

वय वर्ष १८ ते ४० दरम्यानच्या मतदारांचा संख्या देशात ५०% पेक्षा जास्त आहे. ही मोबाईल पीढी आहे,  ज्या पक्षाकडे संघटनेकडे ही पिढी असेल, तो या देशावर राज्य करेल.

रासपचा संघर्ष कींबहुना रासप नेतृत्वाचा संघर्ष देखील या पिढीने पाहीलेला नाही. मुंबई पुणे सारख्या मेट्रोसीटी मधील आयटी, इंजीनियरींग त्या विद्यार्थ्यांपर्यंत आजही रासप पोहचलेला नही. माणूस वयाने कनेक्ट होत नाही तर विचारांनी कनेक्ट होतो. गडकरी सारख्या नेत्यांना ऐकण्यात या पिढीला इंटरेस्ट आहे. म्हणजे वयाचा तिथे प्रश्न नाही. आदरणीय जानकर साहेबांच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होतं, ज्यांनी साहेबांना ऐकलं त्यांचा इतिहास जानला, त्यांचा विचार संघर्ष जानला ते तरूण नक्कीच साहेबांना देखील प्रभावित झालेत. त्यातलाच मी एक आहे. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, ही तरूण पीढी राजकारण्यांच्या मीटींगांना यायला तयार नाही, सभा मोर्चे नकोसे झालेत यांना. ही सत्यता नाकारून चालनार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण युटुबर, पर्यायाने पॅाडकास्ट मुलाखती यांच्या माध्यमातुन साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी साहेबांची प्रतीमा लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आपल्याला कल्पना असेल पण , एकनाथ शींदे, सुप्रीया सुळे, नितीन गडकरी, आपचे काही खासदार अश्या बऱ्याच मंडळींनी या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून लोकप्रीयता मीळवलीच. किंबहुना त्यांच्या विचारांना कनेक्ट होणारी मंडळी कायमची त्यांची पाईक झाली.

याला कॅार्पोरेटमध्ये ब्रॅंड आयडेन्टींटी असे म्हणले जाते. उदाहरणार्थ रतन टाटांची प्रतीमा जितकी अधीक विश्वासू संवेदनशील प्रेमळ बनत होती तीतके शेयर मार्केटला टाटा ग्रुप ची गुंतवणूक वाढत होती.  जानकर साहेबांची विचार, व्हीजन, प्रगल्भता, आचरण, संघर्ष जितके नविन पीढीपर्यंत जास्तीत जास्त पोहचेल, तितकी साहेबांची प्रतीमा नविन पीढीमध्ये तयार होत जाईल व त्याचा फायदा ग्राउंडवर काम करणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्याला संघटन वाढीसाठी लोकांचे मतपरीवर्तन करण्यास होईल. २०१४ नंतर राजकारणाचं कॅार्पोरेटीकरण झालंय, हे आपण मान्य करायलांच हव. त्यामुळे रासपने देखील परंपरागत संगठनबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा.

  -धिरज पाटील, नाशीक मो - 7875717798

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...