Wednesday, February 26, 2025

काय सांगता ! 106 लाचखोर अधिकार्‍यांना शासनाकडून अभय

काय सांगता ! 106 लाचखोर अधिकार्‍यांना शासनाकडून अभय


क्लास ‘वन’च्या 30, क्लास ‘टू’च्या 29 अन् क्लास ‘थ्री’च्या 106 अधिकार्‍यांचा समावेश


मुंबई : राज्यामधील पावणेदोनशे लाचखोरांना अद्याप अभय मिळाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून समोर आले आहे. त्यामध्ये वर्ग एकचे 30, वर्ग दोनचे 29, तर वर्ग तीनच्या 106 अधिकार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, एवढ्या जणांचे निलंबन का थांबले, याबाबत मात्र एसीबीने स्पष्ट केलेले नाही.

लाचखोर अधिकारी कर्मचार्‍यांवर अंकुश ठेवण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडून केले जाते. लाचेबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल एसीबीकडून घेतली जाते. मात्र असे असले तरी, अनेक सरकारी कार्यालयातील खाबुगिरी काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच लाचेच्या हव्यासापोटी सामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या लाचखोरांना कारागृहाची हवादेखील खाण्यासाठी पाठवले जाते.

त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही होते. परंतु काहींना कारवाईपासून अभय मिळते. असेच अभय राज्यातील पावणे दोनशे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना 2012 पासून मिळत आल्याचे निदर्शनास आले आहे. कारण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात तशी नोंदसुद्धा आहे.

निलंबन रखडलेल्या विभागनिहाय अधिकार्‍यांची संख्या

निलंबित न करण्यात आलेल्यामध्ये वर्ग एकच्या 30, वर्ग दोनच्या 29, वर्ग तीनचे 106 आणि वर्ग चारच्या आठ लाचखोरांचा समावेश आहे. वर्ग एकचे निलंबन न झालेल्यांमध्ये वर्ग महसूल विभागातील सहा अधिकारी, नगरविकास विभागातील पाच, आरोग्य विभागातील चार, पोलिस खात्यातील चार, ग्रामीण विकास आणि गृहनिर्माण मधील प्रत्येकी तीन अधिकार्‍यांचे निलंबन झाले नसल्याचे चित्र आहे.


पुरावे मिळाल्यास होते निलंबन

पाहा याबाबत कायदेतज्ज्ञ काय म्हणतात याबाबत बोलताना अ‍ॅड. निखिल कुलकर्णी, (फौजदारी/दिवाणी वकील) सांगतात, सरकारी कर्मचारी सेवा नियमांनुसार, लाचखोरी हा गंभीर शिस्तभंग मानला जातो. त्यामुळे, पुरावे मिळाल्यास निलंबन केले जाते. सरकारी अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले गेले किंवा त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले, तर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई होऊ शकते.

जर संबंधित अधिकारी/कर्मचारी सेवेत राहिला, तर तो पुरावे नष्ट करू शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो त्यामुळे निलबंन केले जाते. चौकशी निष्पक्ष होण्यासाठीदेखील निलंबनाची गरज असते. सरकारी नोकरदार भ्रष्टाचार करत असेल, तर जनतेचा प्रशासनावर विश्वास राहणार नाही म्हणून निलंबनाची कारवाई होते.

कोणत्या विभागातील किती अधिकारी

शिक्षण विभाग (41), नगरविकास (36) (मनपा/ नगरपालिका), पोलिस, कारागृह, होमगार्ड (25), ग्राम विकास (जिल्हा परिषद/ पंचायत समिती) (17), महसूल, नोंदणी, भूमी अभिलेख (17) तर ऊर्जा, उद्योग, कामगार विभाग (5) आणि आरोग्य विभाग (5) अशांचा यामध्ये समावेश असून, त्यांचे 2012 ते 31 जानेवारी 2025 च्या कालावधीत झाले नाही. सर्वाधिक निलंबन न झालेल्यांमधबई विभाग (46), ठाणे (38), औरंगाबाद (22) पुणे (18), नाशिक (16), नागपूर (12), अमरावती (11) तर नांदेड येथील (10) अधिकार्‍यांचे निलंबन न झालेल्यांमध्ये समावेश आहे.

सत्याला पडलेली स्वप्ने

सत्याला पडलेली स्वप्ने

स्वप्न ३ रे

अखिल भारतीय साहित्य परिषद भरली आहे. सर्व भाषिक साहित्यीक जमले आहेत. विविध परिचर्चा, कथा वाचन, काव्य वाचनाने परिषद गजबजून गेली आहे. एका ठिकाणी भाषा विकास या विषयावर चर्चा सुरू आहे. चर्चा खालील प्रमाणे चालू आहे. त्याचे चेहरे स्पष्ट असले तरी त्यांचे भाष्यच तेवढे अवतारीत केले आहेत.

- दोन किंवा अधिकच्या समूहाला भाषेची गरज भासली. 

- - बरोबर आहे, कृती आणि ध्वनी

माध्यमाद्वारे आपले विचार मानस, मानव प्रगट करू लागला आणि भाषेचा उगम झाला. 

- याप्रकारे जगात साधारणतः सहा ध्वनिगट वा भाषा स्रोत आहेत असे मानले जाते. 

- बरोबर आहे. त्यात इंडो-युरोपीयन एक गट आहे.

भारतात दोन भाषा स्रोत आहेत. एक 'द्रविड' आणि दुसरी 'इंडो-युरोपियन'

 - 'इंडो-युरोपियन' मध्ये संस्कृत, इंग्रजी, जर्मन, गुजराती, मराठी आदी भाषा आहेत तर द्रविड मध्ये कन्नड, तेलगु, तमीळ आदी- भाषा आहेत.

- परंतु संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. संस्कृतापासून सर्व भारतीय नव्हे तर जगातील भाषा तयार झाल्या असे म्हणतात.

 - द्रविड भाषा स्रोत तसेच इतर ५ स्रोत पुर्णत संस्कृत पासून वेगळ्या आहेत. तेव्हा तुमच्या 

- म्हणण्याला अर्थ रहात नाही.

संस्कृत ही सर्वात विकसीत व्याकरण आदी गोष्टीने परिपूर्ण अशी भाषा होती व आहे.

- असावी. संस्कृत भाषा उगमातच विकसीत होती असे म्हणता येईल काय ?

 - नाही. ती हळूहळू किंवा इतर भाषेपेक्षा वेगात वाढली असावी. परंतु उगमातच ती विकसीत असावी असे म्हणता येणार नाही.

 - याचा अर्थ सुरवातीला विविध भाषा प्राकृत, स्वरूपात बोलल्या जात असाव्यात, ज्या अविकसीत वा विकसनशील असाव्यात.

- हे र्तकशुध्द आहे. परंतु संस्कृत पासून सर्व प्राकृत भाषा तयार झाल्या असे म्हटले जाते. ते कसे ?

सार एकच एक 

आदी अर्थ अती अर्थ 

शब्द नव्हे ब्रहम, अर्थ हेच ब्रहम

झोपलेल्या माणसालाच स्वप्ने पडतात. म्हणून कदाचित स्वप्ने-स्वप्नेच राहतात. कधीच खरी न होण्यासाठी. मला जागत्यानेच स्वप्ने पडतात. परंतु ती खरी असतात, झोपतो तेव्हा भविष्यातील गोष्टी दिसतात. ती खरी होण्यासाठी नसतात. जागतो तेव्हा भुतकाळातील गोष्टी दिसतात. ती खरी झालेली असतात. भविष्य काळातील गोष्टी दिसतात ती खरी होण्यासाठी असतात. ज्याला पडते तोच फक्त ही स्वप्ने पाहू शकतो. दुसरा कोणी कोणी नाही. बाकी सर्वांना वेगळेच दिसत असते. तेच त्याना खरेही वाटते. पण खरे काय ? काय ? काय ? अनंताकडे हा प्रश्न आदळत गेला आणि आदळत परत आला. त्याने उत्तर दिले मला मला.!जागत्यापणी तुला जे दिसते तेच खरे एकच एक तुझ्या "सत्याला पडलेली स्वप्ने" जागा असताना 'सत्या'ला हे पहिले स्वप्न पडले आणि सुरू झाली स्वप्नाची एक मालिका. 

शब्द हे दृश्य, अर्थ हे अदृश्य

शब्द हे साधन, अर्थ हे साध्य

शब्द हे किरण, अर्थ हे प्रकाश

शब्द हे ग्रंथ, अर्थ हे ज्ञान 

शब्द हे मार्ग, अर्थ हे ध्येय.


शब्द हे मर्त्य, अर्थ हे अमर 

शब्द हे स्वप्न, अर्थ हे जीवन 

शब्द हे भ्रम, अर्थ हे सत्य 

शब्द अशाश्वत, अनित्य, अर्थ चिरंतन, नित्य


शब्द हे शरीर, अर्थ हे आत्म 

शब्द हे प्राकृत, अर्थ हे संस्कृत 

सार एकची एक 

आदी अर्थ, अंती अर्थ 

शब्द नव्हे ब्रह्म, अर्थ हेच ब्रह्म


- हे केवळ अशक्य आहे .

- ते कसे ?

- प्राकृत आणि संस्कृत याचा अर्थ काय

- प्राकृत म्हणजे निर्सगतः सुरवाती प्राथमिक अवस्था आणि संस्कृत म्हण संस्कार केलेली, नंतरची अवस्था

- म्हणजे प्राकृत वर संस्कार केले अस संस्कृत तयार होते.

- अगदी बरोबर.

- मग प्राकृत अगोदर कि संस्कृत अगोदर

- निःसंशय प्राकृत प्रथम.

- मग विकसीत संस्कृत अवस्था अगोदर अविकसीत प्राकृत अवस्था अगोदर ? अर्थात प्राकृत प्रथम कि संस्कृत प्रथम ?

- प्राकृत प्रथम, संस्कृत नंतर.

- असे असता संस्कृत पासून सर्व भाषा तयार झाल्या हा सिध्दांत खरा ठरत नाही.

- अगदी बरोबर! संस्कृत ही विकसीत भाषा आहे असे म्हणू शकतो. परंतु तिला भाषा जननी म्हणू शकत नाही. त्या भाषेमुळे दुसरी भाषा समृध्द होत गेली असेल. अर्थात भाषा पिलापाने भाषा समृध्दच होत असते. हा सार्वत्रिक नियम आहे.

- म्हणजे आम्ही उलटी गंगा पहात होतो कि काय ?

- अर्थात. चुकीचे गृहीते धरल्यास गणिताचे उत्तर चुकच येणार, म्हणून गृहीते तपासा अन्यथा चुकीच्या उत्तरांना बरोबर समजून गटांगळ्या खात रहाणार.  

- प्राकृत प्रथम नंतर संस्कृत हा सिध्दांत एकमताने मान्य.

प्राकृत प्रथम नंतर संस्कृत ह्या सिध्दांताने भारतीय इतिहासाचे संदर्भ - क्रांतीकारकरित्या बदलेले गेले: संस्कृत भाषा कोणत्या एका आणि अधिक प्राकृत भाषा मधून विकसीत पावली याचा शोध घेतला गेला. भाषा अगोदर बोलली जाते नंतर विकसीत होत रहाते आणि लोक मान्यता, राज मान्यता यावरून तिची विकासाची तिव्रता ठरते. मग संस्कृतची मुळ प्राकृत भाषा कोणती ? तर त्या भाषा (बोली) पाली, अर्ध मागधी अशा स्वरूपात असावी. तत्कालीन भारतीय विद्वानात विविध बोली बोलणाऱ्या लोकासाठी एक संपर्क भाषा असावी असे वाटले असणार. त्या विद्वानांना कदाचित राजमान्यता व धर्म मान्यता मिळाली असणार. त्यातुन विविध विद्वानांनी अनेक बोलीतून काही शब्द घेऊन व्याकरणाचा उपयोग करून त्या काळातील एक परिपूर्ण भाषा तयार करण्याचा प्रयत्न केला. अर्थ हरवू नये असे शब्द तयार करून ही भाषा तयार केली. अर्थपूर्ण असे तत्व जेव्हा बोली वा प्राकृत भाषेमुळे अर्थ हरवत होती, तेव्हा शुद्ध भाषा निर्माण करण्याची गरज भासली. ह्यातून जी विशिष्ट जाणिवपूर्वक संस्कारातून एक संस्कारीत भाषा साकार होत गेली, तीच संस्कृत भाषा होय. काही कारणामुळे या भाषेचा प्रसार झाला नाही. ती लोकभाषा झाली नाही. ज्या विद्वानांनी ही भाषा तयार केली ते गुणकर्माने विद्वान होते. त्यांना ब्राह्मण म्हणत होते. नंतरच्या काळात ते जन्मजात बनले आणि एक सर्वोत्तम भाषा कंठित झाली. एवढेच नव्हे तर हळूहळू ऱ्हास होत गेली. अर्थ बांधण्यासाठी जी भाषा तयार केली. त्याचेच अर्थ हरवले गेले. काही शब्द तोंडपाठातंरामुळे जीवंत राहिले. परंतु त्यांचे अर्थ हरवत गेले. यातुनच उभा राहिला एक भयानक गोंधळ असलेला, विसंगती असलेला भारताचा इतिहास. जो तो त्या शब्दांना स्वतःचे हितासाठी व विशेष हितसंबंधासाठी निरनिराळे अर्थ देवू लागला, शब्द ब्रह्मातून शब्द तयार भ्रम झाला.

निर्गुण निराकार अर्थ ब्रह्माचे सगुण-साकार रूप म्हणजे शब्दब्रह्म. अशाप्रकारे या शब्द ब्रह्मातून अर्थ ब्रह्म शोधले असता खरी रत्ने बाहेर पडतात.

_ सिद्धप्पा अक्कीसागर

- शब्दांकन : आबासो पुकळे

चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान यावा - महादेव जानकर यांचे साकडे

चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान यावा - महादेव जानकर यांचे साकडे 

आरक्षण प्रश्नावरून महादेव जानकरांनी काँगेस, भाजपला केले लक्ष्य 

मुंबई (१५/२/२५) : आबासो पुकळे 

या देशातली जनता मालक झाली पाहिजे, राजकीय सत्तेत वाटा मिळाला पाहिजे, चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान आला पाहिजे, मुख्यमंत्री आला पाहिजे, असे साकड राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी घातले. श्री. जानकर यांनी कुलस्वामिनी आई चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला उपस्थिती लावून विविध गावच्या ओवीकर मंडळास भेट देऊन शुभेच्छ्या दिल्या. अहिल्यादेवी होळकर होळकर ओविकार मंडळ घेरडीचे शाहीर गजानन बंडगर, शाहीर अनिल गडदे, सचिन तामखडे यांच्यासह विविध मंडळाना भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. यात्रेला भाविक भक्तांना शुभेच्छ्या देत महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. 

श्री. जानकर म्हणाले, चिंचणी मायाक्का यात्रेस आलेल्या सर्व भाविक भक्तांचे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अभिनंदन करतो. आपल्या राष्ट्रीय समाजाची जागृती झाली पाहिजे. ओवीच्या माध्यमातून शाहीर प्रबोधन करतात. जिस बाप का बेटा लाईक होता है, उस बाप की इज्जत होती हैं! जिस बाप का बेटा बेटी नालायक होती है, उस बाप की बेइज्जत होती है. देशात एवढ्या मोठ्या संख्येने असणारा आपला समाज, त्याची राजकीय भागीदारी शून्य आहे. प्रशासकीय भागीदारी शून्य आहे. म्हणून आपल्या समाजाला आपलं दल मोठं केलं पाहिजे. ज्या पक्षावर आपला समाज विश्वास ठेवतो तो पक्ष आपल्याशी गद्दारी करतो, म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे. तुमच्या मुला मुलींचे भलं करायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला मोठे करावे लागेल. काँग्रेस व भाजप तुम्हाला न्याय देणार नाहित, राष्ट्रीय समाज पक्षच तुम्हाला न्याय देईल, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आपल्या समाजात शाहीर निर्माण झाले पाहिजेत, समाजाच्या व्यथा वेशीवर टांगल्या पाहिजेत. या देशात जर न्याय मिळवायचा असेल तर दुसऱ्याचे झेंडे घेऊन न्याय मिळणार नाही. आपलाच झेंडा आणि आपलाच दांडा पाहिजे तरच तुमचा विजय होणार आहे. बांधवांनो, मोठे पक्ष आपल्याला फसवणार आहेत. काँग्रेस फसवणार आहे, भाजप फसवणार आहे, मायाक्कादेवीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला न्याय फक्त राष्ट्रीय समाज पक्ष देणार आहे, हे विसरता कामा नये. प्रस्थापित मते घेण्यापूरती गोड बोलतात आणि हक्क द्यायची वेळ आली की तुम्हाला बाजूला सारतात. ४० वर्षं घरी गेलेलो नाही, संसार केलेला नाही, संपत्ती उभा केली नाही, पण राष्ट्रीय समाजाचे दल म्हणून चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष मोठा केला आहे. माझी विनंती आहे, आपली आई ओळखायला शिका. राष्ट्रीय समाज पक्ष आपली आई आहे, दुसरा पक्ष आपला असू शकत नाही. तो आपल्याला उल्लू बनवतो. माझी तुम्हाला शपथ आहे, अहिल्याबाईंची शपथ आहे, एवढा मोठा समाज असताना मागतकरी का बनतो..? देणारा समाज बनला पाहिजे, म्हणून तुम्ही मंडळींनी आपले दल ओळखले पाहिजे, आपली माणसे ओळखली पाहिजेत, ही विनंती करण्यासाठी आपल्या दारात येतोय. वयाच्या चौथ्या वर्षापासून मायाक्कादेवीच्या यात्रेला येतोय. टोलनाके बंद व्हावेत, यासाठी पहिला मोर्चा मीच काढला. समाजाच्या मुलामुलींना आरक्षण मिळावे, म्हणून पहिला दिल्लीत मोर्चा मीच काढला. आम्हाला वाटले काँगेसवाले देत नाहीत, आम्ही भाजप बरोबर युती केली. काँगेस बरोबर भाजप देखील चोर निघाला. आपल्या दोन्ही हिताचे नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षावर प्रेम करा, येणारा काळ आपला असेल. एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान माखूबाईच्या यात्रेला आल्याशिवाय राहणार, हा तुम्हाला शब्द देतो. यावेळी 'ओवीकार शाहीरांनी आरक्षणाचे आश्वासन देतात आणि आरक्षण कोण देत नाही नाही, असा आरोप काँगेस, भाजपवर केला'. जानकर यांच्या समवेत शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ मोटे, अजित पाटील व अन्य उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेसाठी मुदत व्याप्ती वाढविण्यात यावी : दिपकराव तिरके

सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेसाठी मुदत व्याप्ती वाढविण्यात यावी : दिपकराव तिरके 

रिसोड : सावित्रीबाई फुले स्व आधार योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त इतर मागास घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदविका व्यावसायिक शिक्षण घेता यावे, म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट आधार संलग्न खात्यात वितरित केले जाते. परंतु या योजनेची माहिती भटक्या विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही, ऑनलाईन अर्ज सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे या योजनेची मदत वाढवण्यात यावी, तसेच सदर योजना शहरी व तालुका भागातील प्रवेशासाठी लागू आहे. परंतु शासनाने ग्रामीण भागात अनेक वैद्यकीय महाविद्यालय प्रशिक्षण संस्था तसेच इंजिनिअरिंग कॉलेज यांना मान्यता दिल्याने, ग्रामीण भागात प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही, तो मिळावा याकरिता या योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दीपकराव तिरके यांनी बहुजन कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महादेव जानकर यांचा कोकणातील धनगरवाड्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी

महादेव जानकर यांचा कोकणातील धनगर वाड्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी 

पेण (१८/१/२५) : कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम धनगर वाड्याच्या विकासासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विधानपरिषद फंडातून कोट्यावधी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. पेण तालुका धनगर समाज भवनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्याहस्ते पार पडले. महादेव जानकर म्हणाले, आज आपले सरकार नाही, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आल्यावर दुर्गम वाड्यावर त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस निधी देऊ. देश स्वतंत्र झाल्यापासून या वाड्यावरस्त्यावर निधी पोहोचला नव्हता, पहिल्यांदा निधी देणारा राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर आहेत, असे स्थानिकांनी सांगितले. कमी वयात सरपंचपदी विराजमान झालेल्या सोनलताई उघडे यांचा सत्कार महादेव जानकर यांनी केला. यावेळी शरदभाऊ दडस, संतोष ढवळे, भगवान ढेबे, मनिषाताई ठाकूर, आनंदा ढेबे, मुकेश भगत, आबासो पुकळे, शशिकांत मोरे, विजय उघडे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वाराणसी येथील पुतळ्याजवळील आक्षेपार्ह फलक हटविले

राष्ट्रीय समाज पक्षाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वाराणसी येथील पुतळ्याजवळील आक्षेपार्ह फलक हटविले

वाराणसी - उत्तर प्रदेश (१८/२/२५) : काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोध्दार करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वाराणसी येथील पुतळ्याभोवती काही सूचना फलक लावले होते. तसेच महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देखील झाकोळले होते. आक्षेपार्ह विचित्र सूचना फलक पाहून देशभरातून होळकर समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. समाज माध्यमातून संताप व्यक्त होत होता. अखेर आज राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठिय्या देऊन ते सूचना फलक हटवले आहेत. रासपचे मिर्जापूर जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाल यांचे बंधू सुनील टायगर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे पुष्पहार व राष्ट्रीय समाज पक्षाचे दुपट्टा अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मिर्जापुर येथून डॉक्टर राजेश पाल, जिला उपाध्यक्ष, संदीप पाल भदोही यांनी फलक हटवण्यास प्रशासनास भाग पाडले. उत्तर प्रदेश रासप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे. रासपचे सर्वत्र कौतुक होत आहे, सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

घटनेत आरक्षण नाही, प्रतिनिधित्व आहे : अक्कीसागर

घटनेत आरक्षण नाही, प्रतिनिधित्व आहे : अक्कीसागर

सामाजिक महापरिवर्तन गठबंधन (SRA) मीटिंग संपन्न 


मुंबई (१९/१/२०२५) : सामाजिक न्याय व जातीय जनगणना करण्यासाठी ओबिसी, एसी.सी, एसटी आणि अल्पसंख्यांक संघटनांची भूमिका काय.? याविषयावर ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. सामाजिक परिवर्तन गठबंधनचे संयोजक आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त जस्टिस व्हि. ईश्वरया, अध्यक्षस्थानी आणि मुख्य वक्ते मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया आरबीआय एम्प्लॉइज ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर उपस्थित होते. श्री. अक्कीसागर म्हणाले, आरक्षण हा शब्द घटनेत नाही, प्रतिनिधित्व Representedness असा शब्द आहे. देश स्वतंत्र झाला तरीही कित्येक समाज घटकांना अद्याप सामाजिक, आर्थिक, राजकीय पर्याप्त भागीदारी वा न्याय अजून मिळालेला नाही. AIBCF च्या सर्वच मागण्यांना महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे समर्थन असेल, असे त्यांनी सांगितले.

सेवानिवृत जस्टिस व्हि. ईश्वरय्या यांनी विविध मुद्द्यांवर काँगेस, भाजप पक्षावर जाहिर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी फक्त बोलतात मात्र करत तर काहीच नाही, अशा शब्दांत काँगेस समर्थकाना माजी न्यायमूर्ती ईश्वरय्या यांनी सुनावले. महादेव जानकर यांचा आम्हाला पाठींबा राहिला आहे व नेहमीच ते आमच्या सोबत असतात. अक्कीसागर साहेब हे भारतातील एक रत्न आहे. त्यांचे मार्गदर्शन आजच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचे आहे. आरक्षण कायदा इंग्रजीत मसुदा तयार केला आहे, त्याची प्रत तुम्हाला दिली जाईल. वेगवेगळया राज्यात स्थानिक भाषेतून आरक्षण अंमलबजावणी कायदा जनजागृती करावी व चर्चा घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.

गुजरात मधील एका वक्त्याने ओबीसी नेतृत्वाना मंत्रीमंडळात डावलले जाते व दुय्यम दर्जाचे पद दिले जाते, याकडे लक्ष वेधले. बैठकित अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश विरेंद्र सिंह यादव, सर्व आदिवासी समाज छत्तीसगढ संघटनेचे युवा अध्यक्ष डॉ. सुभाष सिंह, भोपाळचे माजी जिल्हा सत्र न्यायाधीश रमेशचंद्र चौरसिया, श्रीकांत पाल, दिंगबर राठोड, आदिराम धाकड, सायंटिस्ट बी. एस. राजपूत (रायगढ, छत्तीसगढ), बहादुर सिंह, दादन बैगन, डॉ. बी.एल. कुशवाह (सतना), रॉबिन वर्मा (लखनऊ), डॉ. रोहिणी साहु, गोविंदराम शूरनर(नांदेड, महाराष्ट्र), रमाकांत करगटला(तेलंगणा), हशीत जाधव, के. पी. वर्मा(मेहर, मध्य प्रदेश), किशोर पंचोली, अशोक कुमार, मालकन सिंह, नामदेव बोरसे, नरेंद्रसिंह चौधरी, राजकुमार सिंह, रामेश्वर ठाकूर, रामकृष्ण यादव, ऋषिकेश जरग(सांगली, महाराष्ट्र), श्री निवास, शिवलिंगप्पा जोगीन(बेंगलोर, कर्नाटक), श्रीराम सेन, तिकेश कुमार, गुलसिंहमेटारीभाई राठोड, कशमा सिंह, नीलम यादव, प्रकाश मालवीय, डॉ. केवल कृष्ण, आबासो पुकळे (सातारा, महारष्ट्र) सहित देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tuesday, February 25, 2025

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक

 ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक 



ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे पिताश्री भगवानराव गोरे दादा यांचे दुःखद निधन झाले. माण तालुका रेशनिंग संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्यांना दादा या नावाने ओळखले जायचे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत ते राजकारणात खंबीरपणे सक्रीय पाठीशी होते.  विधानसभा निवडणुकीच्या काळापासून ते आजारी होते. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. बोराटवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथे दुपारी 4 वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात जयकुमार गोरे, अंकुश गोरे, शेखर गोरे, सुरेखाताई पखाले अशी मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली दादा.

राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती




मुंबई (२३/२/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती केल्याचे, रासपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे यांनी राष्ट्रभारतीच्या संपादकांशी बोलताना सांगितले आहे. उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. श्री. अनिल यादव यांना या बैठकीत नियुक्तीपत्र दिले आहे. बैठकीस यावेळी ओमप्रकाश सोनार, सौ. ललिता तिवारी, संतोषकुमार पाल, संतोष गुप्ता, मनीष तिवारी, विनय दुबे, मदन सिंग, संजय यादव, सुरज गुप्ता, अनिल यादव, राहुल यादव, सागर यादव, रवी यादव, कुणाल सिंग, अभय सिंग, राहुल तिवारी, सुभाष यादव, अरुण प्रजापती, धर्मेंद्र सिंह, प्रवीण यादव, शैलेश मोरे, दिनेश गायकवाड, प्रवीण शिंदे, राम यादव, रामलाल यादव, आकाश यादव, करण मेहता, गुड्डू मेहता, मोतीलाल यादव, राम सिंह, मोती सिंह, राजवीर पाल, महादेव सरगर, उमेश पटेल, सुरज यादव, गुड्डू मेहता, राजा यादव, दिलीप सोनी, अनुराग शिंदे, सुजित दुबे, सुनील पुजारी आदी उपस्थित होते.

Saturday, February 22, 2025

फार्मसी विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप संधी : नवनाथ ढवळे

 

फार्मसी विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये खूप संधी : नवनाथ ढवळे



गणपती फार्मसी, टेंभुर्णी मध्ये स्पर्धापरीक्षांवर कार्यशाळा संपन्न

Rashtrabharti Desk 22/2/2025| श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभुर्णी येथे आयोजित "फार्मा कॉम्प्युटिटीव एक्झाम्स: स्टेट, नॅशनल व इंटरनॅशनल ऑपोर्ट्युनिटिस" या विषयावर वर्कशॉपमध्ये बोलताना राज्य विक्रीकर अधिकारी नवनाथ ढवळे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृतपणे औषधनिर्माण शास्त्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी याबद्दल माहिती दिली. तसेच पॅरामेडिकल क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध असून, मुलांनी आता याकडे लक्ष देऊन संधीचा फायदा घ्यायला हवा. सध्या फार्मसीमध्ये मुलींची वाढलेली संख्या, तसेच प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरीच्या संधी बघता मुलांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच देशाबाहेरील संधींचा सुद्धा विचार करून, त्यानुसार आपले स्किल्स अवगत करून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
श्री. ढवळे यांनी थोडक्यात जीपॅट, नायपर, गेट, जीआरई टोफेल, फार्मसी ऑफिसर, रेल्वे फार्मासिस्ट, आर्मी, हॉस्पिटल फार्मासिस्ट या सारख्या विविध पदांबाबत तसेच अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली.  आपल्या आई-वडिलांचे स्वप्न तसेच विद्यार्थ्यांची चिकाटी नक्कीच यशस्वी वाटचाल ठरेल, यात शंका नसल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी केले व जास्तीत जास्त मुलांनी याकडे लक्ष देऊन यश मिळविले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.  वर्कशॉपला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात महाविद्यालयातील मुलांना सरकारी सेवेमध्ये सहभागी झाल्याचे पाहण्याची सचिव डॉ. रवींद्र बेंदगुडे यांनी व्यक्त केली.
       यावेळी प्रा. डॉ. सचिन सकट, प्रा. डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. नामदेव शिंदे, प्रा. शिवराज ढगे, प्रा. कोमल साळुंखे, प्रा. धनश्री कारंडे आदी. शिक्षक, प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे, सचिव डॉ. रविंद्र बेंदगुडे, उपाध्यक्ष श्री. बाबा येडगे, अध्यक्ष अँड. विजयराव हिरवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे यांनी केले.

Tuesday, February 18, 2025

यूपीएससी परीक्षा पास, तरीही 985 ओबीसी विद्यार्थ्यांना नोकरी नाही !

यूपीएससी परीक्षा पास, तरीही 985 ओबीसी विद्यार्थ्यांना नोकरी नाही !


नागपूर : देशात बेरोजगारीची समस्या किती गंभीर होत चालली आहे याची ही आकडेवारी मन विषन्न करणारी आहे. दहावी, बारावी किंवा केवळ पदवीधर नव्हेत तर मागील आठ वर्षापासून देशभरातील 985 ओबीसी विद्यार्थ्यानी यूपीएससी परीक्षा पास केलेली असूनही त्यांना केंद्र सरकारने कोणत्याही सेवेत रुजू करून घेतलेले नाही. आपापल्या राज्यात नॉन क्रिमिलियर या गटात ते मोडतात मात्र केंद्र सरकारने त्यांना नॉन क्रिमिलियरचा लाभ दिलेला नाही. यातील तब्बल 150 विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील आहेत.

यांचे पालक अनुदानित शाळेतील शिक्षक, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, भारत सरकारचे उपक्रम जसे डब्लूसीएल, एनटीपीसी, गेल, सेल , सर्व PSU आणि राज्य सरकारचे उपक्रम एम एस ई बी स्टेट ट्रान्सपोर्ट विभाग आणि भारतभरातील सर्व बँका महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधे काम करणारे आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ओबीसी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप ओबीसी युवा अधिकार मंच मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी पत्रपरिषदेत केला.

2015 पासून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (DOPT. Govt.of India) नियुक्ती पासून रोखले जात आहे. या अडवणुकीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतली. यात केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्युनल चेन्नई , केरळ आणि मद्रास, दिल्ली आणि केरळ उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णयही दिला. याप्रमाणे भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) नियुक्ती देणे भाग होते. परंतु याउलट डीओपीटी (DOPT) ने या सर्व निकालांना 2017 साली सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. ''भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन'' हा खटला 2017 पासून सुरू आहे.

विशेष म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत एकदाही या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच झालेली नाही. न्या चंद्रचूड यांच्यापुढेही हे प्रकरण येऊ शकले नाही. आता हे प्रकरण निकाली न लागल्यामुळे दरवर्षी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची यात भर पडत असल्याकडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी (ऑल इंडिया रँक 480)रणजीत थिपे यांनी यावेळी लक्ष वेधले. आठ वर्षात नोकरी न मिळाल्याने इतरांना प्रशिक्षण,विद्यादान किंवा मिळेल ते काम त्यांना करावे लागत असल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत एकदाही या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच झालेली नाही. न्या चंद्रचूड यांच्यापुढेही हे प्रकरण येऊ शकले नाही. आता हे प्रकरण निकाली न लागल्यामुळे दरवर्षी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची यात भर पडत असल्याकडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी (ऑल इंडिया रँक 480)रणजीत थिपे यांनी यावेळी लक्ष वेधले. आठ वर्षात नोकरी न मिळाल्याने इतरांना प्रशिक्षण,विद्यादान किंवा मिळेल ते काम त्यांना करावे लागत असल्याचे सांगितले.

हंसराज अहिर लक्ष देतील का?

दरम्यान, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हे एक संविधानिक आयोग आहे. या आयोगाच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीचे अधिकार आहेत. ओबीसी समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होत असेल तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने तातडीने त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करून अन्याय दूर केला पाहिजे अशी घटनात्मक तरतूद आहे. याबाबतीत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेऊन वेळोवेळी निवेदने दिलीत. परंतु अद्यापही अहिर यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मागासवर्ग आयोगाने यामध्ये लक्ष घालून भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला नोटीस बजावली तर हे प्रकरण दहा दिवसात निकाली लागू शकते व भारतभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकतो याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. यामुळे सर्वोच्च समजला जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळतील. भविष्यात केंद्र सरकारमध्ये ओबीसी आरक्षण पूर्ववत लागू होईल यावर भर दिला.

नांदुर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा तोडफोडी विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

नांदुर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा तोडफोडी विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

होळकरवाडा पाडणाऱ्या माथेफिरूवर कठोरात कठोर कारवाई करा : रासप जिल्हाध्यक्ष

नाशिक १५/१/२५ : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची तोडफोड व त्याठिकाणी होळकरवाडा पाडून इतर नवीन बांधकाम करण्याच्या विरोधात आता रासप उतरल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे व त्यांचे सहकारी खुशीराम पाल, ज्ञानेश्वर ढेपले, अनिल लांडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन जलद कारवाई करण्याची मागणी केली. अहिल्यादेवी होळकर यांनी नाशिक जिल्ह्याबरोबरच पूर्ण भारतभर विश्व हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. मंदिरे, मस्जिद, चर्च बांधली. असंख्य राम मंदिर ही बांधली. त्याचप्रमाणे घाट, बारव अशा पद्धतीने विविध समाज उपयोगी कार्य केले. वाट सरूनसाठी धर्मशाळा, कितीतरी अन्नछत्रे, पशुपक्षांसाठी अभयारण्ये अशा पद्धतीने समाज उपयोगी जीवन उपयोगी काम मातोश्रीने केली आणि एवढ्या महान महाराणीच्या व्यक्तिगत संपत्तीतील एक हिस्सा म्हणजेच नांदूर मध्यमेश्वरचा होळकर वाडा जो त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना खासगीची संपत्ती म्हणून दिलेला होता.  म्हणजेच एक प्रकारे अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही प्रकारे राज्याचा किंवा त्यांच्या मराठा साम्राज्यातील असणाऱ्या संपूर्ण संपत्तीचा भाग न वापरता हा स्वतः अहिल्यादेवी होळकर यांच्या खाजगी संपत्तीतील वाडा असून, त्या जागेवरती अज्ञात लोक येऊन होळकर वाड्याची तोडफोड करतात आणि होळकर वाड्याची तोडफोड करून त्या ठिकाणची चीज वस्तू गायब करण्याचा प्रयत्न करतात आणि एवढं होत असताना प्रशासन झोप लागल्यासारखे त्या ठिकाणी दुर्लक्ष करते, ही बाब गंभीर असल्याचे, रासप जिल्हा अध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे यांनी नमूद केली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्याहस्ते त्याठिकाणी उद्घाटन झालं. होळकरवाडा पाडून राम मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणी त्या जागी होत असेल तर ही आम्हास मान्य नाही. होळकर वाड्याच संवर्धन व्हायला हवे व राम मंदिर व्हावे अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे. ज्याप्रमाणे आयोध्या व काशी या ठिकाणी मातोश्रींचा सन्मान झाला, त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्यामध्ये सुद्धा कुठलेही नवीन काम होताना मातोश्रींचा सन्मान होने गरजेचे आहे. आणि तसं न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर जनआंदोलन उभं करेल आणि त्यानंतर जे सामाजिक पडसाद उमटतील किंवा अहिल्याप्रेमी व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल. ज्या माथेफिरुंनी  होळकरवाडा पाडण्याचं काम केलं किंवा होळकर वाड्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कोठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व असे न केल्यास राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाभर घोंगडी बैठका घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभ करून प्रशासनाला जाग आणु असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथजी शिंदे यांनी दिला.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त रासपाची दिल्लीत महाअधिकार रॅली होणार !

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती निमित्त रासपाची दिल्लीत महाअधिकार रॅली होणार !

नंदगड येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत निर्णय 

नंदगड (२६/१/२५) : होळकर राजांची लढाई ही दिल्लीवर राज्य करण्याची होती. महाराजा यशंतराव होळकर यांनी दिल्लीला ९ दिवस वेढा घातला होता, दिल्ली ताब्यात आली होती ! होळकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यश्लोक महारानी अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त भारताची राजधानी दिल्ली येथे 31 मे 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे 'महाविशाल महाअधिकार रॅलीचे आयोजन केले जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत केले. हा पूर्वनियोजित कार्यक्रमस्थळ आणि वेळेनुसार राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक महादेव जानकर यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता संगोळी रायन्ना वीर भूमि क्षेत्र, तालुका खानापुर , जिल्हा बेलगावी, कर्नाटक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शिवलिंगप्पा किन्नुर होते. 

राष्ट्रव्यापी एकसमान राष्ट्रीय शिक्षण, समतामुलक समाज निर्मितीसाठी सर्व राष्ट्रीय समाजाची जातीयगणना, देशातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य उपचार, प्रत्येक क्षेत्रात महिलांना संख्येनुसार समान भागीदारी, पुण्यश्लोक महारानी अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती निमित्त अखिल भारत स्तरावर भव्य दिव्य कार्यक्रम, रामलीला मैदान नवी दिल्ली येथे करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रमुख ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. एक राष्ट्र - एक शिक्षण पद्धती, सर्वांना मोफत आरोग्य व्यवस्था, सर्व जाती जमाती समुदाय गणना आणि दिल्लीत महाअधिकार रॅलीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.





राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वार्षिक दोन बैठका होतात. पहिली अर्ध वार्षिक बैठक नंदगड़ बेळगावी कर्नाटक येथे राष्ट्रवीर संगोळी रायन्ना पुण्यतिथि आणि रासपा आयोजीत रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव दिनी २६ जानेवारी रोजी प्रतिवर्षी आयोजित केली जाते . दूसरी अर्ध वार्षिक बैठक महारणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मजयंती दिनी ३१ मे रोजी प्रतिवर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित केली जाते. याशिवाय आवश्कतेनुसार विशेष बैठीकांचे आयोजन केले जाते, अशी माहिती रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी दिली. 

एस. एल. अक्कीसागर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता ते नेता हा निष्ठावान असला पाहिजे. शिस्तवान असला पाहिजे. आणि ज्ञान असला पाहिजे. प्रथम संघटनेवर निष्ठा असायला हवी नंतर नेत्याशी निष्ठा असायला पाहिजे. संघटनेत शिस्त आणि शेवटी ज्ञान असले पाहिजे. 

राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीवेळी नंदगड येथील कार्यक्रमास रासपचे कार्यकर्ते तेथे उपस्थित होते, त्यांना देखील मार्गदर्शन करण्यात आले. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा राज्याचे प्रमूख आणि कार्यकारणीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. बैठकीसाठी ज्येष्ठ नेते गोविंदराम शुरनर(नांदेड, महाराष्ट्र), कुमार सुशील(जौनपुर, उत्तर प्रदेश), डॉ. मनोज निगडकर(ईशान्य भारत), शिवलिंगप्पा जोगीन (बेंगलोर, कर्नाटक), काशीनाथ शेवते(सातारा, महाराष्ट्र), ज्ञानेश्वर सलगर(सोलापूर, महाराष्ट्र), रमाकांत करगटला (हैदराबाद, तेलंगणा), शरणबसप्पा दोड्डमणी(कलबुर्गी, कर्नाटक), ओमप्रकाश चीतळकर (जालना, महाराष्ट्र), बलराम कामन्नावर (बेळगावी कर्नाटक) व अन्य उपस्थित होते.

Monday, February 3, 2025

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर


‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" कार्यक्रमाचा समारोप


नांदेड (१७/१/२५) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे शासनाने दिलेल्या १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, क्रांतीकारी राणी तुळसाबाई होळकर, राजमाता जिजाऊ भोसले, विरागंणा झलकारीबाई यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी ते ४ जानेवारी रोजी "ग्रंथ प्रदर्शन"चा व १७ जानेवारी २०२५ रोजी महिला ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम घेवून " वाचन संकल्प महाराराष्ट्राचा " या अभियानाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात सौ. सावित्रा शूरनर म्हणाले, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा उपक्रम सतत चालू ठेवून समाजांत वाचनाचे महत्व समजावून सांगावे लागते. वाचन संस्कृती वाढवावी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत मदत व्हावी, म्हणून शासनाने वाचनालयाची निर्मिती केली आहे. पंरतू शासन अनुदान वाढवून देत नाही, ग्रंथपाल यांना वेतन देतं नाही, त्यामुळे वाचन संस्कृतीचे कार्यक्रम कागदावरच दिसून येतात, यापुढे शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालून वाचन संस्कृती वाढविण्याकडे लक्ष घालावे, असे वाचकांच्या निदर्शनास सावित्रा शूरनर यांनी आणून दिले.


कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर म्हणाले, महिलांनी राष्ट्रमाता सावित्रीमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाल्यांना घडवावे. सावित्रीमाईमुळे शिक्षण मिळाले, शिक्षणामुळे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानाचा फायदा स्वतः चे आरोग्य व मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी करावे. चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज आहे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाणात कंगवे चमचे देण्याऐवजी महापुरूषाचे पुस्तके भेट द्यावी, असे प्रतिपादन केले. प्रथम प्रस्ताविक करतांना गोविंदराम शूरनर म्हणाले, स्त्रीयांना शिक्षणाचे दारे खुली करण्यासाठी प्रस्थापिताकडून फुले दांपत्याने शेणमारा खाला, स्त्रियांना पुरूषा बरोबर समान अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी प्रस्थापिताचा विरोध असतानाही हिंदू कोड बिल संसदेत पास करून घेतले. त्यामुळेच आजची स्री सन्मानाने उच्च पदापर्यंत जाऊ लागले आहेत. त्यासाठी लोककल्याणासाठी ज्यांनी काम केले त्या महापुरुषांची जयंती सण म्हणून साजरी करावी व तसे संस्कार पाल्यावर करावेत, असा संदेश दिला. 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय तपासणी अधिकारी कैलास गायकवाड, ग्रंथालय संघाचे सचिव सचिन पाटील, दत्ताजी काकडे उपस्थित होते. सौ. दिपा गायकवाड, सौ. राधाबाई जाधव, शुभांगी कांबळे, ज्योती कसनकर तसेच अनेक महिला भगिनींनी ग्रंथ वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला. शेवटी पुस्तके ज्ञानदानात भेट देवून हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे शेवटी सविता हेळगीरे यांनी सर्वांचे आभार मानले.

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर

रासपचा पंतप्रधान नंदगडला येईल : महादेव जानकर 

महादेव जानकर राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून मैदानात लढत आहेत, त्यांना साथ देणे गरजेचे : अक्कीसागर


नंदगड (क्रांतिवीर संगोळी रायन्ना स्मृती/बलिदान स्थळ येथून...) : जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी केले आहे. श्री. जानकर हे नंदगड ता - खानापुर जिल्हा बेळगाव येथे  राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षीकोत्सव -१७ वा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, मखनापुर गुरूपिठाचे सोमेश्वर स्वामी, जोकानहट्टी(गोकाक) येथील योग सिद्धेश्वर आश्रमाचे बिळीयान सिद्ध स्वामी, रामदुर्ग येथील पूर्णानंद आश्रमाचे कृष्णानंद स्वामी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, सन 2008 सालापासून अंखडपणे राष्ट्रीय समाज पक्ष संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचा कार्यक्रम नंदगडला घेत आहे. सुरुवातीला येथे काहीही नव्हते. राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष घातल्यानंतर कर्नाटक शासनाने दिले. रासपच्या चळवळ पाहून सर्वच सत्ताधारी राजकीय पक्षांनी नंदगडच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. संगोळी रायन्ना कन्नडवीर नसून राष्ट्रवीर बनले पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची चळवळ चालू आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा सर्वच राज्य प्रदेशातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येत असतात. राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची वार्षिक २ बैठका पैकी १ नंदगड येथे आयोजित केली जाते. संगोळी रायन्नाचा इतिहास उजेडात आल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रीय समाज पक्षाने 'समाज संगम राष्ट्र यात्रा' काढून २००८ मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात संगोळी रायन्नाचे महान कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. संगोळी रायन्ना समाधीस्थळ राष्ट्रीय स्मारक बनले पाहिजे, रासपची इच्छा आहे. 


कर्नाटकच्या जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार खासदार विधानसभा, संसदेत पाठवावेत, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारीला नंदगडला येत राहणार. रासपाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो नंदगडला येईल. रासपचा पंतप्रधान देखील नंदगडला येतील. स्वामीजींनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी आशीर्वाद उभा करावा. राणी चेन्नमा, छ. शिवाजीराजे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर आदी सर्वच महामानवांचा विचार घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष वाटचाल करत आहे.

रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर संगोळी रायन्ना पुतळ्याजवळ उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक आयोजित करण्याचे कारण, क्रांतिवीर रायन्ना यांस आपल्या भारतीयांचे स्वराज्य आणावयाचे होते, त्यासाठी ते ब्रिटिश कंपनी सरकार विरोधात लढले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वयाच्या 33 व्यां वर्षी आपले बलिदान दिले. विशेष म्हणजे आजच्या प्रजासत्ताक दिवशी रायन्ना स्मृती/बलिदान दिवस आहे आणि त्यांचा जन्मदिन हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. त्यांना अभिप्रेत असलेले भारतीयांचे स्वराज्य, त्यासाठी त्यांनी दिलेला लढा, बलिदान याची सर्व आठवण लक्षात घेऊन महादेवजी जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सन 2008 पासून दरवर्षी येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा राज्याभिषेक कार्यक्रम घेतला जात आहे. रायन्ना सारखा देशभक्त अन् शुरवीर पुत्र प्रत्येक घरी व्हावा, असे बोलले जाते. पण रायन्ना बनणे हे तितके सोपे नाही. महादेवजी जानकर हे सुद्धा आपले घर दार सोडून राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून ते मैदानात आजही लढत आहेत. त्यांना साथ देणे गरजेचे आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमास रासपचे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, गुजरात आदी. राज्यातून विविध राष्ट्रीय समाजातील लोक येथे आलेले आहेत. दरवर्षी येथे येत असतात. विविध जाती धर्म  प्रांतांतील लोक म्हणजेच राष्ट्रीय समाज होय आणि अशा सर्वांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष होय. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारी कार्य, त्यांस अभिप्रेत असलेले स्वराज्य संकल्पना, त्यांचा लढा आणि त्यासाठी त्यांचे बलिदान आदिचे स्मरण करून रायन्ना यांस आपण आदरांजली वाहुया. तसेच आपणां सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


सकाळी महादेव जानकर यांच्याहस्ते, पुजारी गोविंद चव्हाण, श्रीमती चव्हाण आई यांच्या समवेत संगोळी रायन्ना राज्याभिषेक करण्यात आला. सिद्धप्पा अक्कीसागर यांनी कन्नडमध्ये भाषण केले. शालेय विद्यार्थ्यांनी राणी चेंनम्मा व संगोळी रायण्णा त्यांची वेशभूषा परिधान करून नाटिका सादर केले. संगोळी रायन्ना रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते देशभरातून उपस्थित होते. राष्ट्रीय संघटक गोविंदराम शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा ईशान्य भारत प्रभारी डॉ. मनोज निगडकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, कर्नाटक रासपा प्रभारी शिवलिंगप्पा जोगीन, तेलंगणा राज्य प्रभारी रमाकांत करगटला, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, कर्नाटक राज्य महासचिव शरणबसप्पा दोड्डमनी, मराठवाडा रासप नेते ओमप्रकाश चितळकर, उत्तर कर्नाटक रासपा प्रभारी सुनीलदादा बंडगर, बेळगांव प्रभारी बलराम कामन्नावर, महाराष्ट्र सचिव नरेशकुमार मंडल (नागपूर), प. संपर्क प्रमुख विनायकमामा रुपनवर (पुणे), प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे(आटपाडी), युवा नेते अजित पाटील(सांगली), कलबुर्गी माजी जिल्हाध्यक्ष देवेंद्र चिगरहल्ली, नंदगडचे सामाजिक नेते किशोर कुरिया, रासपचे ज्येष्ठ नेते शिवाजीबुवा गावडे (उमरगा), कर्नाटक कुरबर संघ पदाधिकारी राजश्री यरनाळ, सूर्यकांत गुंडाळे (लोहा नांदेड), परमेश्वर पुजारी (मोहोळ सोलापूर), रासेफचे महावीर सरक (सातारा), पत्रकार आप्पाजी पाटील दै. तरुण भारत, रमेश संगप्पा पुजारी, हालसिद्धप्पा आदी उपस्थित होते.






नवी मुंबईत आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी संगोळी रायन्ना पुण्यतिथी साजरी

नवी मुंबईत आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी संगोळी रायन्ना पुण्यतिथी साजरी

नवी मुंबई (२६/१/२०२५) : कळंबोली येथील आई मायाक्कादेवी मंदिरात आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांची 194 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मायाक्कादेवी मंदिरात आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी संगोळी रायन्ना यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. एवढा मोठा शूरवर स्वातंत्र्यवीर भारताच्या इतिहासात उपेक्षित कसा राहिला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 

संगोळी रायन्नाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी विठ्ठल कोळेकर, प्रकाश कोळेकर, अतुल देशमुख, चंद्रकांत दडस, राहुल आगलावे, अक्षय पाटील, विजय जाधव, सतीश पिसाळ, सौरभ झंजे, प्रेम करे, अजित पिंगळे, बाबू मासाळ, राहुल खिलारी, विठठल खरात, राहुल सरगर, विशाल मेटकरी, श्रेयस कोळेकर, ओम अमृतसागर, पी. आबासो, संदीप गावडे, मारुती लेंगरे, ममताबाई पाटील, कोळेकर पुजारी ताई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या

चिकन पार्टीचे पैसे दिले नाही म्हणून मित्राने केली मित्राचीच हत्या 

पनवेल (31/1/25) : चिकन पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचा भयानक प्रकार खारघर मध्ये घडला आहे. जयेश वाघे असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याला अटक केली असून त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिस्सारण वाहनावर सफाईचे काम करत होता. 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास आदिवासी वाडी, बेलपाडा, खारघर येथे क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते. मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही, पैसे मिळाले नाहीत याच कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला. पुढे भांडण वाढलं. जयेशने मन्नू याच्या कानाखाली मारली. त्यामुळे मन्नू हा प्रचंड संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने जयेशला हाता बुक्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली. एवढंच नव्हेतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने जयेशच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केले. मारहाणीमुळे जयेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर खारघर पोलिस तेथे दाखल झाले. आरोपी मन्नू विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पनवेल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत आता कायमची बंद

इयत्ता पाचवी अन्‌ आठवीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे होणार जतन; पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत आता कायमची बंद


इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर 

मुंबई (१ फेब्रुवारी २०२५) : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का, उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता 'डायट'चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जनत करून ठेवाव्या लागणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली.

अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्व्हेतून उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली. शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन 'एससीईआरटी'कडून करण्यात आले आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दोन संधी

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात. एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आली की नाही, याची पडताळणी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे.

प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे जपून ठेवाव्या लागतील

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोनअंकी आहे. आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. त्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिकारी करतील. तसे आदेश त्यांना दिले आहेत. 

- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

यशवंत नायक: जानेवारी 2025

 





रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा : धिरज पाटील, नाशिक

रासपने परंपरागत संघटनाबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा

वय वर्ष १८ ते ४० दरम्यानच्या मतदारांचा संख्या देशात ५०% पेक्षा जास्त आहे. ही मोबाईल पीढी आहे,  ज्या पक्षाकडे संघटनेकडे ही पिढी असेल, तो या देशावर राज्य करेल.

रासपचा संघर्ष कींबहुना रासप नेतृत्वाचा संघर्ष देखील या पिढीने पाहीलेला नाही. मुंबई पुणे सारख्या मेट्रोसीटी मधील आयटी, इंजीनियरींग त्या विद्यार्थ्यांपर्यंत आजही रासप पोहचलेला नही. माणूस वयाने कनेक्ट होत नाही तर विचारांनी कनेक्ट होतो. गडकरी सारख्या नेत्यांना ऐकण्यात या पिढीला इंटरेस्ट आहे. म्हणजे वयाचा तिथे प्रश्न नाही. आदरणीय जानकर साहेबांच्या बाबतीतही हे तंतोतंत लागू होतं, ज्यांनी साहेबांना ऐकलं त्यांचा इतिहास जानला, त्यांचा विचार संघर्ष जानला ते तरूण नक्कीच साहेबांना देखील प्रभावित झालेत. त्यातलाच मी एक आहे. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, ही तरूण पीढी राजकारण्यांच्या मीटींगांना यायला तयार नाही, सभा मोर्चे नकोसे झालेत यांना. ही सत्यता नाकारून चालनार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण युटुबर, पर्यायाने पॅाडकास्ट मुलाखती यांच्या माध्यमातुन साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहचण्यासाठी साहेबांची प्रतीमा लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे आपल्याला कल्पना असेल पण , एकनाथ शींदे, सुप्रीया सुळे, नितीन गडकरी, आपचे काही खासदार अश्या बऱ्याच मंडळींनी या माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून लोकप्रीयता मीळवलीच. किंबहुना त्यांच्या विचारांना कनेक्ट होणारी मंडळी कायमची त्यांची पाईक झाली.

याला कॅार्पोरेटमध्ये ब्रॅंड आयडेन्टींटी असे म्हणले जाते. उदाहरणार्थ रतन टाटांची प्रतीमा जितकी अधीक विश्वासू संवेदनशील प्रेमळ बनत होती तीतके शेयर मार्केटला टाटा ग्रुप ची गुंतवणूक वाढत होती.  जानकर साहेबांची विचार, व्हीजन, प्रगल्भता, आचरण, संघर्ष जितके नविन पीढीपर्यंत जास्तीत जास्त पोहचेल, तितकी साहेबांची प्रतीमा नविन पीढीमध्ये तयार होत जाईल व त्याचा फायदा ग्राउंडवर काम करणाऱ्या रासपच्या कार्यकर्त्याला संघटन वाढीसाठी लोकांचे मतपरीवर्तन करण्यास होईल. २०१४ नंतर राजकारणाचं कॅार्पोरेटीकरण झालंय, हे आपण मान्य करायलांच हव. त्यामुळे रासपने देखील परंपरागत संगठनबरोबरच अधुनिकतेचा मीलाप साधावा.

  -धिरज पाटील, नाशीक मो - 7875717798

जानकर साहेबांनी पक्ष तयार केला नसता तर नेता झालो नसतो : एड. विकास पाटील, जिल्हाध्यक्ष धाराशिव

जानकर साहेबांनी पक्ष तयार केला नसता तर नेता झालो नसतो 


राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र राज्याची प्रदेश कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणीसह महाराष्ट्र राज्यातील सर्व आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली, या गोष्टी प्रोटोकॉलनुसार घडतं असतात. नवीन जुन्या जबाबदाऱ्या येत जात असतात, पण मला अभिमान याचा वाटतो की, माझ्यासारख्या 26 वर्ष वयाचा एका विद्यार्थी दशेतला युवक, अगदी सामान्य कुटुंबातून येऊन, राजकारणात मलाही कोणताही वारसा लाभलेला नसताना, आदरणीय जानकर साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष, मुख्य महासचिव, प्रदेश कार्यकारिणी व माझे सहकारी यांनी जो माझ्यावर विश्वास ठेऊन मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल धन्यवाद व मी सुद्धा ती जबाबदारीने तंतोतंत पाळली व कोणत्याच विश्वासाला तडा जाऊ देण्याच काम केलं नाही व कधी भविष्यात सुद्धा करनार नाही, हे मला सांगायला अभिमान वाटतोय. कारण की जर जानकर साहेब यांनी पक्ष काढला नसता तर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराला नेता होता आले नसते, पद मिळली नसती, पदामुळे माझी उंची वाढण्यासाठी खुप मोठा फायदा झाला, गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर काम करता आले, आंदोलन, मोर्चे करता आली, सत्ता येत राहील, जाईल पण हा तुमचा कार्यकर्ता कधीच राष्ट्रीय समाज पक्ष सोडून कुटल्याच गोष्टीचा विचार करणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी जे जे करता येईल, आम्हाला ते करु, पण जास्तीत जास्त वेळ पक्ष वाढवण्यासाठी देऊ, जानकर साहेब यांच्यावर बोलण्यासारखं खुप काही आहे, पण मी एवढेच सांगेन अस नेतृत्व पुन्हा होणे नाही त्यामुळे या नेतृत्वाला जपा वाढवा.

 -  ॲड विकास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धाराशिव 

9623858891

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025