शेतकऱ्यांना उभारी मिळवण्यासाठी सरसकट पीक विमा देण्याची हिंगोली जिल्हा रासपची मागणी
पारडा- हिंगोली :(९/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो
शेतकऱ्यांना उभारी मिळवण्यासाठी, सरसकट विमा देण्याचे मागणी, राष्ट्रीय समाज पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पौळ यांनी केली आहे. पौळ म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीच्या पावसामध्ये विविध पिके जळून गेले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन पिकाचे येलो, मोझक रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन करेल.
No comments:
Post a Comment