Sunday, February 25, 2024

रासपच्या जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा, कन्नौज शहर बनले रासपमय

रासपच्या जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा, कन्नौज शहर बनले रासपमय 



कन्नौज - उत्तरप्रदेश (११-०२-२४) : राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात कन्नौज लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय संघटनमंत्री बालकृष्ण लेंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. जन स्वराज यात्रेचे शेवटी सभेत रूपांतर झाले. रासपचे विचार तळागाळात रुजवावेत. संघटन भक्कम करावे. याबाबत चर्चा करण्यात आली. जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा सहभागी होता. तसेच कन्नौज शहर रासपमय झाले होते.

जन स्वराज यात्रेत प्रांत अध्यक्ष चंद्रपाल, प्रदेश संघटनमंत्री प्रदीप सिंह तोमर, प्रदेश प्रभारी अनुपम पाल, प्रदेश सचिव श्याम पाल, प्रदेश प्रवक्ता मनोजकुमार पाल, जिल्हाउपाध्यक्ष लखीमपुरखीरी श्रीकान्त वर्मा, सीतापुर जिल्हाध्यक्ष रामसिंह पाल, उपाध्यक्ष सचिन पाल, औरैया जिल्हाध्यक्ष रजत बघेल, दिनेश बघेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जन स्वराज यात्रा यशस्वी करण्यासाठी मंडल अध्यक्ष विष्णु पाल, अंकित, दीपक, प्रमोद, राधेश्याम, आलोक, पुष्पेंद्र, पूर्वप्रधान रामनरेश पाल, प्रधान हरपालसिंह, आशीष पाल, विपिन, विवेक पाल, प्रो. अजय पाल, अर्पित भदौरिया, वृजेश विक्रम रावत, शिवकुमार यादव, शिवदीप सिंह, कादिर खा, अमरसिंह यादव, आदित्य सिंह, फौजी रामसनेही, संजय त्रिवेदी, फौजी सुरेश, राजकुमार, बाबूराम, जितेंद्र, अशोक, प्रेमचंद, एड. धीरेंद्र, धीरराज सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...