Sunday, February 25, 2024

भाजप, काँग्रेसने देशाची वाट लावली : महादेव जानकर

भाजप, काँग्रेसने देशाची वाट लावली : महादेव जानकर


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून रासपचे रविंद्र कोठारी लढणार

अहमदनगर (३/२/२४) : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी देशाची वाट लावली. भाजपबरोबर आम्ही युती केली, मात्र त्यांनी आमचा तोंडाला पाने पुसली. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणारे असल्याचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री यांच्या उपस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघाचा मेळावा नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आ. जानकर बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाने नगरसह बारामती, शिरूर, परभणी, माढा, नंदुरबार आदी जागांवर लोकसभा निवडणुकीची तयारी केल्याचे सांगताना नगरमधून रवींद्र कोठारी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना विजयी करण्याचे आवाहन जानकर यांनी केले. भाजपने दोन जागा दिल्या तरच 'रासप' त्यांच्याशी युती करण्याचा विचार करेल, अन्यथा शरद पवार तीन जागा देण्यास तयार आहेत, असाही दावा जानकर यांनी केला. शिर्डीच्या जागेसाठी भाऊसाहेब वाकचौरे माझ्या संपर्कात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांनी बोलावून लोकसभेचे तिकीट देत असल्याचे सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील माझ्या संपर्कात आहेत असाही दावा त्यांनी केला. 

भाजपकडे आज ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, न्यायालय आहेत, मात्र आमच्याकडे जनता आहे. भाजपला रोखायचे असेल तर त्यांचा आमदार मत मागायला आल्यानंतर त्यांना तुम्ही आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारा असे आवाहन जानकर यांनी केले. यावेळी पक्षाचे राज्य सचिव रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य डॉक्टर प्रल्हाद पाटील, शरद बाचकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी कोरडकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड, मंदाकिनी बडेकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...