श्री. पेशवे पुढे म्हणाले की बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी वृत्तपत्र चालू केले. त्याकाळी त्यांनी सामाजिक चळवळ आणि समाज सुधारणेबाबत मांडले विचार आजही तंतोतंत लागू होतात तसेच लोकमान्य टिळक यांनी शेतकर्यांसंदर्भात त्याकाळी २४ अग्रलेख लिहले. त्या अग्रलेखातील विचार आजही उपयोगी पडत आहेत. म्हणून वृत्तपत्र क्षेत्रातील अद्यपुरुषांचे विचार तरुण पत्रकारांनी अभ्यासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. हेमंत मोरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी महिंद्रकर यांनी केले. राजू घाडगे, किरण पाटील, सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असलेले अशितोष उपाध्ये,आबासाहेब पुकळे आणि मच्छिंद्र कांबळी यांचा श्री. पेशवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संदीप कुंभार आणि परशुराम कोते यांनी केले.
No comments:
Post a Comment