Sunday, May 3, 2020

महाराजा यशवंतराव होळकर जयंती ६ डिसेबर २०१६


सागंली शहरात महाराजा यशवंतराव होळकर यांची 241 वी जयंती साजरी

महाराजा यशवंतराव होळकर जयंतीने सांगली शहराच्या लौकीकात भर

सांगली (आबासो पुकळे) : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा-र्या महाराजा यशवंतराव होळकर चौकात होळकर अनुययांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 241 व्या जयंतीचे दिमाखदार आयोजन करत सांगली शहराच्या लौकीकात भर घातली. यावेळी चौक नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व दिप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. 07 व 08 जानेवारीला सोलापूर येथे होणा-या ऐतिहासिक पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या लोगोच यावेळी अनावरण करण्यात आले.
जयंती उत्सवात विविध मान्यवरांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमी शौर्याची गाथा,साहित्य संमेलनांचे महत्व विषद केले.

"यशवंतराव होळकर यांच्या स्फूर्तीतूनच नेपोलियन बोनापार्ट इंग्रजाविरूद्ध लढले" -इतिहाकार अनिल मिसाळ
काही इतिहासकार म्हणतात भारताचा नेपोलियन बोनापार्ट यशवंतराव होळकर हे चुकीचे असल्याचे सांगत ते म्हणाले, महाराजा यशवंतराव होळकर यांच्याकडूनच स्फूर्ती घेऊन नेपोलियन इंग्रजाविरूध्द युद्धास तयार झाले असल्याचे परखड मत इतिहासकार लेखक अनिल मिसाळ यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी हक्कराय बुक्कराय, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बिंदूसार, मल्हारराव होळकर, अहिल्यामाई होळकर यांचा इतिहास सांगून ते म्हणाले,तुकोजीराव होळकरांनी इंग्रजांचा सर्वप्रथम पराभव केला.
आष्टा नगरसेवक बाबासाहेब सिद्ध म्हणाले, पांढरा कपडा घालून नेता होता येत नाही. *समाजाने एकसंघटीत होऊन लढा उभारावा.

उपोषणकर्ते श्रावण वाक्षे म्हणाले, आरक्षणाची अंमलबजावणी करावी. सरकारने समाजाला फसवाफसवी करू नये.
"महिला व कुटुंबामध्ये जागृती होणे काळाची गरज" - संगिताताई खोत नगरसेविका सांगली.
जयंती आयोजन टिमचे भरभरून कौतुक करून त्यांनी समाजाची अपेक्षीत असणारी जागृती होत नसल्याची उपस्थित समाजबांधवापुढे खंत व्यक्त केली. समाजातील महिलांनी बाहेर पडावे. त्या पुढे म्हणाल्या, जोपर्यत महिला व कुटुंबामध्ये समाजातील प्रश्नांची जाणीव होणार नाही तोपर्यंत समाजातील महिला उठाव करणार नाहीत. त्यासाठी समाजातील प्रत्येक महिला व कुटुंबामध्ये जागृती होणे काळाची गरज आहे.

"अहिल्यामाई, मल्हारराव, यशवंतराव होळकर यांची राज्यभर चौकात स्मारके उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा" - विष्णू माने नगरसेविक सांगली. 
सांगली शहरात अहिल्यामाई होळकर स्मारकाचे 80% काम पूर्ण असून उर्वरित काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आपले पूर्वज कोण होते याचे स्मरण व्हावे यासाठी समाजातील महामानवांची चौकाला नाव देण्यात यावे व स्मारके उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढकार घ्यावा असे परखड विचार श्री. माने यांनी मांडले. सामाजिक कार्य करणाराला आर्थिक मदत केली पाहीजे. समाजातील निंदा, टिका टिपणी टाळून समाजाने एकतरीत लढा उभारला पाहिजे. महिलांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक गल्लीत अहिल्यामाई होळकर जयंती साजरी झाली पाहिजे असे प्रतिपादन करून सांगली मार्केट कमिटीला होळकर राजांचे नाव दिले पाहिजे अशी जोरदार मागणी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत(आण्णा) शेजाळ यांच्याकडे केली असता उपस्थितांमधून टाळ्यांच्या कडकडाटात मागणीचे स्वागत केले.

"समाजाला चांगल्या शिक्षणाची गरज" - विजयाताई घुटुकडे
प्रथमच होळकर मंचकावरून प्रबोधन करणा-या विजयाताई घुटुकडे यांनी शिक्षणाने समाजाचे आचार विचार बदलतात, समाजाची मानसिकता सुधारली पाहिजे, समाजाला चांगल्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले.
*समाजाच्या चळवळीमध्ये नेटाने काम करणार*- प्रशांत(आण्णा) शेजाळ अध्यक्ष मार्केट कमीटी सांगली.
समाजाच्या चळवळीमध्ये खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची ग्वाही दिली व नगरसेवक माने यांनी केलेली मागणी जीवाची बाजी लावून एखाद्या विभागाला नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे शेजाळ यांनी सांगितले.

समाजाच्या एकत्रित ताकदीपुढे प्रस्थापितांना झुकावे लागते- डॉ. इंद्रकुमार भिसे.
समाजाला मिळणारी पदे कोणताही प्रस्थापित सहजासहजी देत नाही. समाजाच्या एकत्रित ताकदीपुढे प्रस्थापितांना झुकावे लागते तेव्हा समाजाला पदे मिळतात. बी के कोकरे यांच्यामुळे समाजात अस्मिता जागी झाली. 1999 ते 2002 या काळात यशवंत सेनेमुळे प्रस्थापितांना बीड, अहमदनगर, पुणे अशा अनेक जिल्हा परिषदांमध्ये धनगर समाजाला अध्यक्षपदे द्यावी लागली होती. डॉ.भिसे पुढे म्हणाले की,31 मे ला घरावर गुढी उभारली पाहिजे. जयंतीमध्ये गट तट आणू नये. प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.

"जो इतिहास जाणता है । वो इतिहास बनाता है" । - अमोल पांढरे प्रसिद्धीप्रमुख आदीवासी धनगर साहित्य संमेलन
सुरवातीलीच समाजातील बोलीभाषेतील शब्दाचा उच्चार करून आता समाजबांधवाचा प्रवास साहित्य संमेलनापर्यत झाला आहे असे उदगार काढत अमोल पांढरे यांनी साहित्यसंमेलाची रूपरेषा कथन केली व साहित्य संमेलनाचे महत्व विषद केले. ,महामानवांना जगण्याचा अर्थ समजला होता काय ? असे बोलत
होळकराशाहीतील शौर्याची प्रतिके असणा-या इंदोर, महेश्वर, भानपुरा येथे समाजबांधवानी जाऊन आपला इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन पत्रकार अमोल पांढरे यांनी केले. 'युगपुरूष कितीही मोठा असला तरी अनुयायी जीवंत नसला तर तो महापुरूष संपतो' असे वॉरेन हॅस्टींग यांच तत्व सांगितले. दुरचित्र वाहीनीद्वारे दाखवण्यात आलेल्या अहिल्यामाई होळकर मालिकेतील प्रसंग सांगून जगाला दिशा देण्याचे कार्य होळकर घराणयाने केले असल्याचे सांगितले. वाचाल तर वाचाल याचं समाजाने भान ठेवावे.

"प्रगतीपथावर जाणारा समाज घडवण्यासाठी साहीत्य संमेलन"- जयसिंगतात्या शेंडगे, स्वागत अध्यक्ष आदीवासी धनगर साहित्य संमेलन.
समाजाने यात्रा देव धर्म यावर होणारा खर्च थांबवून मुलांच्या शिक्षणासाठी करावा. साहित्य संमेलनात विचारांचा खजिना लपलेला आहे. समाजबांधवानी विचाराच सोन लुटण्यासाठी साहीत्य संमेलनाला यावे असे आवाहन करून प्रगतीपथावर जाणारा समाज घडवण्यासाठी साहित्य संमेलन असलयाचे प्रतिपादन स्वागत अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे यांनी कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानावरून केले.
कार्यक्रमस्थळी श्रावणी कोळेकर या बालकन्येने उभारलेल्या पुस्तक स्टॉलने लक्ष वेधून घेत समाजबांधवापुढे आदर्श उभा केला. यावेळी खेळाडू, नवनिर्वाचित नगरसेवक, मार्केट कमिटी अध्यक्ष प्रशांत शेजाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पलुसचे नगरसेवक संदीप सीसाळ, विठ्ठल खोत, पांडुरंग रुपनवर,नगरसेवक अर्जुन माने, रासपचे संपर्क प्रमुख विक्रम ढोणे, ज्येष्ट मार्गदर्शक राजारामबापू शेंडगे, रासपचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश टेंगले,लेखक युवराज पाटील,हरीदास लेंगरे,हेंमत येडगे,पत्रकार उत्तम जानकर, विशाल सरगर,विनायक रूपनवर, क्रीडाधिकारी सुहास होनमाने, अमृत जानकर,पै.संभाजी सरगर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.जयंती उत्सवाचे प्रास्ताविक निवांत कोळेकर सर, सुत्रसंचालन तानाजी दुधाळ सर,सागर मदने यांनी केले. होळकरी रक्ताने पेटून उठून समाज कार्यात वाहून घेतलेले समाजसेवक भारत तात्या व्हनमाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...