Sunday, May 3, 2020

विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन

विश्वाचा यशवंत नायकने 22 वा वर्धापन दिन सोहळा व वाचक मेळावा केला अनोख्या पद्धतीने साजरा

........................................................
अंधारात चाचपडणारा राष्ट्रीय समाजाला प्रकाशनमान करून समर्थ समाज घडवण्याचा केला निर्धार

होय विश्वाचा यशवंत नायकने 22 वा वर्धापन दिन सोहळा व वाचक मेळावा अंधारात साजरा करून प्रस्थापित व्यवस्थेचे लक्ष वेधले. सत्तेसाठी भांडणारा प्रस्थापित वर्ग मात्र बहुसंख्याक धनगर/राष्ट्रीय समाजाला भारतीय लोकशाही असून देखील वाटा देईला तयार नाही. ही बहुसंख्याक ओबीसी.एस.सी, एस.टी साठी गंभीर बाब आहे. अंधारात वर्धापन दिन साजरा करून विश्वाचा यशवंत नायकने अज्ञानाच्या अंधकारात गटखाळया खाणा-या  राष्ट्रीय समाजाबरोबर यशवंत नायक काळोख्या भयान रात्री साथिदार आहे हे एकप्रकारे दाखवून दिलेले आहे . लोक जागृती आणि लोकशिक्षण याद्वारे अज्ञान दूर करून बहुसंख्याक समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणार आहे व राष्ट्रीय समाजाला भारतीय समर्थ समाज घडवणार आसल्याचा निर्धार यशवंत नायक वर्धापन दिनी करण्यात आला.

नकली आणि बनावट लोकांना अमाप प्रसिद्धी देण्यासाठी भारतीय प्रचार-प्रसार माध्यम दिवस-रात्र राबतात. सत्यासाठी लढणा-यांना झाकोळून टाकण्याचे प्रयत्न केले जातात. आजही उघड्यावरच पालातल जिणं जगणारा, अनवाणी पायाने रानोमाळ चालणारा शोषित धनगर समाजावरील अन्याय व्यवसथेला दिसत नाही याचे आश्चर्य वाटते?.

गुलामीत वावरणारा 'प्रजा समाज वाचक समाज' बनावा. 'वाचक समाज लेखक समाज' बनावा.'लेखक समाज शासनकर्ता समाज' बनावा. सर्वांगीण विकास घडून समर्थ समाज बनला पाहीजे यासाठी यशवंत नायक ने प्रयत्न केले.

यशवंत नायक ने बहुसंख्याक राष्ट्रीय समाजाला जागृत करण्यासाठी 22 वर्षापूर्वी घोडदौड सुरू केलेली आहे.
"ज्या समाजाने आपला इतिहास सांभाळून ठेवला आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य' दोन्ही 'उज्वल' आहे." आम्ही मात्र आमचा इतिहास विसरलो. त्यामुळे स्वतंत्र भारतात आमची ससेहोलपट सुरू आहे. "जो समाज सर्व अर्थाने 'जागृत' आणि 'संघटीत' आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य' 'उज्वल' आहे." आम्ही जागृतही नाही संघटितही नाही व्यवसाय व अन्य कारणाने विखुरलेलो आहे. "ज्या समाजाकडे 'सक्षम नेतृत्व' आणि 'मजबूत संघटन' आहे, त्या समाजाचे 'वर्तमान' आणि 'भवितव्य दोन्ही 'उज्वल' आहे".  आमच्याकडे खडतर प्रवासानंतर सक्षम नेतृत्व तयार आहे परंतु मजबूत संघटन नाही. खोटी प्रतिष्ठा बाळगण्याची सवय लागलेली आहे. "मत व्यक्त करण्याची 'क्षमता' असून 'धैर्य' नाही, ते गुलाम आहेत. " मत व्यक्त करण्याचे 'धैर्य' असून 'क्षमता' नाही, ते मूर्ख आहेत."  'मत' व्यक्त करण्याचे 'धैर्य आणि क्षमता' आहे, ते स्वतंत्र, ज्ञानी व प्रगत आहेत."  आम्हाला मात्र यावर सर्वत्र बहुसंख्याक समाजात जाऊन जागृत केली पाहीजे.आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी वाचक मेळाव्यात व्यक्त केला. वर्धापन दिनी वाचक मेळाव्यास चांगला प्रतिसाद लाभला.

समाजाला सामाजिक, राजकीय जागृत करायचे असेल तर यशवंत नायक चा अंक प्रत्येक घराघरात असायला हवा. यशवंत नायक हा आपला नायक आहे.  समाजावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेखक, पत्रकार, बुद्धीजीवी राजकारणी तयार झाले पाहिजेत. समाजातून अभ्यासू वक्ते घडावेत यासाठी मदत करायला तयार आहे असे नगरसेवक विष्णू माने यांनी यशवंत नायक वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थितीत राहुन शुभेच्छा दिल्या व मार्ग दर्शन केले.  जेष्ठ नागरिक राजाराम(बापू) शेंडगे यांनी यशवंत नायक अंकाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आबासो पुकळे यांनी यशवंत नायक  हा बहुजन समाजाचा आरसा असून लवकरच दैनिक स्वरूपात आपल्या हाती यावा असा आशावाद केला.तत्पूर्वी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. व नगरसेवक विष्णू माने, समाजसेवक भारत (तात्या) व्हनमाने, सामाजिक कार्यकर्ते अमृत जानकर, शिक्षक तानाजी दुधाळ सर, यवा सामाजिक कार्यकर्ते विशाल सरगर, युवा सामाजिक कार्यकर्ते बबन गडदे, युवा नेते महेश मासाळ, प्रा.उत्तम हराळे, आबासो पुकळे व यशवंत नायक मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत केक कापून विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.  सांगली शहराचे वैभव महाराणी अहिल्यामाई होळकर स्मारकात हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. महाराणी अहिल्यामाई होळकर स्मारकाचे उर्वरीत काम पूर्णत्वास जावून लोकार्पण सोहळा पार पडावा अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

राष्ट्रीयालय, मुंबई येथून  सुदर्शन अक्किसागर साहेब यांनी भ्रमणदूरध्वनी वरून विश्वाचा यशवंत नायक 22 वा वर्धापन दिन व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबई, बोरिवलीतील कार्यकर्त्यानी व इतरांनी घेतलेली अपार मेहनत याची माहीती दिली.
-आबासो पुकळे , २९ सप्टेबर २०१७.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...