Saturday, November 25, 2023

शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैवच - महादेव जानकर

शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैवच - महादेव जानकर

प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करताना आ. महादेव जानकर, पंजाबराव पाटील, श्रीकांत देवकर, पुजाताई घाडगे व अन्य.

कऱ्हाड ( ९/११/२३) : यशवंत नायक ब्यूरो 

एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत असणाऱ्या शेतकऱ्याला राज्यकर्त्याकडे भिक मागावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बदलली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी कराड येथे केली.

बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कराड ते पाटण अशी रॅली काढण्यात आली. खास शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आ. महादेव जानकर येथे आले होते. जेष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली.

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. शेतकऱ्याला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर टनाला द्यावा, दुधाला शंभर रुपये लिटर दर मिळावा, शेतकऱ्याला टोल माफी करावी, अशी अपेक्षा आहे. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत शेतकऱ्यांत असून, जगाचा पोशिंद्याला आज राजकारण्यापुढे भीक मागावी लागत आहे, हे दुर्देवच आहे. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. ट्रॅक्टर रॅली पुढे एक शेतकरी आसूड उगारत होते. या रॅलीत गणेश शेवाळे, संदीप धुमाळ, श्रीकांत देवकर, पूजा घाडगे, कराड तालुका व पाटण तालुका रासप कार्यकर्ते व बळीराजा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाला सत्ता द्या, दहा मिनिटात आरक्षणाचा प्रश्न मिटवू : महादेव जानकर

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. 2009 साली मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबत पुस्तक लिहले आहे. तामिळनाडूत 63 टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित जनतेने हुशार झाले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून अथवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा. दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना कराडात रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटात सोडवून टाकतो. आमच्या हातात सत्ता द्या. आमच्याजवळ आज सत्ता आहे का? आम्ही बाहेर आहोत. धनगर समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. देशात छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षाने आरक्षण मागावे लागत असल्याची सांगत हे अपयश कोणाचे असा प्रश्नही माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...