Wednesday, April 17, 2024

कांदा निर्यात बंदी उठवा, रासपचे नांदगाव तहसीलदारांना निवेदन

कांदा निर्यात बंदी उठवा, रासपचे नांदगाव तहसीलदारांना निवेदन

नांदगाव : राज्यातील शेतकरी गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या संकटात सापडत आहे, अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची शेतकरीविरोधी भूमिका सातत्याने बघायला मिळत आहे. कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतातील माल बाजारात येण्यास सुरुवात झाली की, त्याचे बाजारभाव कमी होतात. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालास अनुदान व हमीभाव मिळावे तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत नांदगाव तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. अन्यथा केंद्र व राज्य सरकार विरोधात नांदगाव तालुका अध्यक्ष खुशाल सोर, दिंडोरी लोकसभा प्रभारी रामदास बाचकर, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष नानाभाऊ यमगर यांनी जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...