Sunday, December 26, 2021

प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर

प्रबोधनकार गोविंदराम शूरनर यांचे साहित्य राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक : सिद्धप्पा अक्कीसागर

"स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" पुस्तकाचे श्री. अक्कीसागर यांचे शुभहस्ते पुण्यात प्रकाशन

पुणे : प्रबोधनकार/लेखक गोविंदराम शूरनर यांचे साहित्य बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी केले आहे. लेखक गोविंदराम शूरनर यांच्या "स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष" या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य/ कानिगेली विश्व धर्मपीठाचे सदस्य, यशवंत नायकचे कार्यकारी संपादक,  राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर साहेब यांच्याहस्ते पार पडले.  दिनांक १० ऑक्टोबर  २०२१ रोजी पुण्यात रासेफच्या बैठकीवेळी प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रासेफचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी श्री. अक्कीसागर म्हणाले, प्रबोधनकार गोविंदराम शुरनर यांनी नोकरीत असल्यापासून यशवंत सेना व पुढे रासपच्या कार्यात झोकून दिले. त्यांचे साहित्यातील सामाजिक व राजकीय लिखाण दर्जेदार राहिले आहे. राष्ट्रीय समाजाला मार्गदर्शक आहे. असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणारे लिखाण केले आहे.

स्वराज्य रक्षणार्थ क्रांतीविरांचा संघर्ष या पुस्तकाची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे, अशी महिती लेखक गोविंदराम शुरनर यांनी दिली. 'स्वराज्य रक्षणार्थ क्रांतिवीरांचा संघर्ष' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

Monday, December 20, 2021

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ : अक्कीसागर


रासेफतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन व संविधान दिन साजरा

मुंबई :  महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ सापडते असे मत रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे. दि. २८ नोंव्हे २०२१ रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या  स्मृतिदिन व संविधान दीन रासेफ तर्फे साजरा करण्यात आला. 

ऑनलाईन मीटिंगद्वारे अनेक मान्यवर सहभागी झाले.  रासेफचे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश नाजरकर यांनी संविधानाला पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. स्वातंत्र्य ,समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधानाची गरज आहे. केडर घेण्यासाठी प्रत्येक जिल्हातून दहा रा-सेफ सदस्याची यादी देण्याचे आवाहन श्री. नाजरकर यांनी केले.
रा-सेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर यांनी मध्ययुगीन, अर्वाचीन भारताचा इतिहासात राज्यकारभारामध्ये कोण लोक होते, त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्याने राज्यकारभारामध्ये कसा सहभाग घेतला, याची  सखोल आणि सविस्तर माहीती दिली. इंग्रज राजवटीमध्ये अनेक लोकांनी  केलेल्या समाज हितासाठीच्या कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. न्यायमूर्ति महादेव गोंविद रानडे, महात्मा जोतिराव फुले सहित दादाभाई नवरोजी, टिळक, आगरकर, गोपालकृष्ण गोखले, लोकहितवादी अशा विविध जाती धर्माच्या समाज सुधारक  महानुभाव यांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन केले. सर्वधर्मीय पुराणमतवादी आणि नवमतवादी यांच्या झगडयात मध्यममतवादी विचार मांडला जात असताना  जोतिबा फुले यानी 24 सप्टेंबर 1871 रोजी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला.   आर्य समाज, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, थियोसोफिकल समाज यापेक्षा 'सत्यशोधक समाज'  आगळा वेगळा राहिला आहे. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य 'असत्याचा पर्दाफाश' करणारे तसेच 'सत्याचा आग्रह' धरणारे होते. फुलेवादाचे विचार मुलभुत आणि मानवी मूल्य जोपसणारे समतेवर आधारित होते.  जोतिबा फुले आधुनिक सामाजिक भारताचे आद्य पितामह होते. त्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजात संविधानाचे मूळ सापडते, असा दावा श्री. अक्किसागर यांनी केला.  श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले, 1870 साली पुण्यात पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली . सार्वजनिक सभेचे 1885 मध्ये इंडियन न‍ॅशनल काॅग्रेसमध्ये रुपांतरित झाले, नेमस्त व जहाल गटाची उभारणी,  ब्रिटिश सरकारशी संवाद साधने हा सार्वजनिक सभेचा उद्धेश होता. इंग्रज सर ह्यूम यांनी स्थापन केलेल्या कॉंग्रेसचा भारताचे स्वातंत्र्य हा  उद्धेश होता.  या सर्व  विचार प्रवाहावर अभ्यास केला पाहिजे, त्यातून शिकले पाहिजे. कॉंग्रेसमध्ये  जहाल आणि गांधी नेमस्त मानले गेले. पुढे कोंग्रेस नेमस्त तर भाजपा जहाल पक्ष बनले असल्याचा मत श्री. अक्कीसागर यांनी व्यक्त केले. बिरसा मुंडा,भगतसिंग अशा अनेक क्रांतिकारक राष्ट्रीय समाज घटकानी केलेले कार्य, त्याग व बलीदान यांच्या राष्ट्र निर्माण कार्यातील महत्व पटवून दिले. आपण मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत अभ्यास करत असताना त्यांतील बारकावे लक्षात घेवून  त्यांच्या कार्यातून प्रेरणा, धड़े- घेवून आपण काम केले पाहिजे, तेव्हांच आपण बलशाली भारत निर्माण करु शकतो. असे श्री अक्कीसागर  यानी नमूद केले. भारतामध्ये जगभरातून अनेक समुदाय लोकसमूह आले. त्यानी येथे राज्यकारभार केला. आपण मात्र सुवर्ण मध्यमवाद स्विकारुन, फुलेवादाच्या मार्गावर स्वातंत्र्य,  समता,बंधुता व न्यायावर आधारित कार्य करुन राष्ट्रीय समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून , बलशाली भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कार्यक्रमामध्ये अनेक रा-सेफ सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा-सेफचे सचिव जयसिंग राजगे यांनी केले. रा-सेफचे खजिनदार राजेंद्र कोकरे यांनी सर्वाचे आभार मानले.

Monday, December 13, 2021

तेलंगणा हैदराबाद येथे राष्ट्रीय संत कणकदास जयंती साजरी










तेलंगणा-  हैद्राबाद येथे राष्ट्रीय संत कनकदास यांचा जंयती उत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, औरंगाबाद चे प्रभारी दत्ता मेहेत्रे मार्गदर्शन करताना, आमदार मल्लया व इतर नागरिक उपस्थित होते.

Sunday, December 5, 2021

मला समजलेले श्री. एस एल अक्कीसागर साहेब

श्री एस. एल अक्कीसागर साहेब यांचा आज 65 वा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मला समजलेले श्री. एस एल अक्कीसागर साहेब

सिद्धाप्पा लक्ष्मण अक्कीसागर राष्ट्रीय समाज पक्षाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपणास परिचयाचे आहेत. श्री अक्कीसागर साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा प्रवास 'माता से जगदर्शन पिता से पहचान' या 'स्व'लिखित लेखात मांडला आहे, त्यातील माहितीची पुनरावृत्ती टाळून 'मला समजलेले अक्कीसागर साहेब, याविषयी त्यांच्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात लिहत आहे.

श्री एस.एल अक्कीसागर साहेब यांच्या जीवनाची सुरुवात जबलपुर मध्यप्रदेशातुन होते, पुढे तो प्रवास पुणे- मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक सर्वत्र देशभर व्यापलेला आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले श्री. एस. एल अक्कीसागर साहेब यांना वडिलांच्या नोकरीमुळे फुगेवाडी- पुणे येथे राहावे लागले. तेथे त्यांना काही मित्र भेटले- जोडले गेले, त्या परिसरात हुशार असल्यामुळे अक्कीसागर साहेब यांची ओळख निर्माण होत होती, त्यातून त्यांना तेथील स्थानिक पुढाऱ्यांनी शरद पवारांची भेट घडवून देण्याचे ठरवले व त्यांचे मत न जाणताच यांना काँग्रेसचे पद देऊ केले, ही वार्ता कळताच त्यांनी काँग्रेसचे पद नाकारले शिवाय शरद पवारांची भेट टाळली. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करावा असा त्यांना त्यांच्या मित्रांनी आग्रह धरला असता, त्यावेळी त्यांनी यापासून दूर राहणे पसंत केले. 

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ३७ वर्षाची सेवा केली. नोकरीच्या सुरुवातीला पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेसने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले मत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे वारसदार यांना दिल्याचे श्री. अक्कीसागर सांगतात. श्री  अक्कीसागर यांचे हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड अशा विविध भाषांवर प्रभुत्व आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियातील सेवानिवृत्तीनंतर अक्कीसागर यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी आली.  राष्ट्रीय अध्यक्षपदी असताना बिहार, केरळ, तमिळनाडू,तेलंगणा, छत्तीसगड राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश दिल्ली, गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यात पक्षाचे संघटन उभे करन्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.  बहुसंख्यांक असलेल्या भारतातील पशुपालक समाजात एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी पाल -धनगर -गडरिया -रबारी रायका -कुरुबा- मालधारी- भरवाड या नावाने स्नेहसंमेलने आयोजित केली. विविध प्रांतात विखुरलेला विविध भाषिक समाज हा राष्ट्रीय समाज असल्याचे सांगितले. पशुपालक समाज हा विश्वाचा भुपालक समाज आहे. 

राजकीय संधी अभावी ठेचा खाणारा, जनजागृती अभावी खच खळग्यातून वाटचाल करणारा बहुसंख्यांक धनगर समाजाची संघटीत शक्ती यशवंत सेनेच्या माध्यमातून तयार होत होती, त्या शक्तीला बुध्दीची युक्ती श्री. अक्कीसागर यांनी दिली. घोषवाक्य दिले, कार्यक्रम दिले, निशाण ठरवले, प्रचार प्रसाराची कोणतीही साधने नसताना कार्यक्रम आखले व ते राबवले.

त्यांनी नोकरी करत असताना बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजाचा राजकीय पक्ष असावा अशी इच्छा बाळगली, 'आपला पक्ष आपला नेता' हे स्वप्न पाहिले, त्यासाठी त्यांचे मन अस्वस्थ होत होते. पुढे त्यांना राष्ट्रीय समाज पक्ष व नेता महादेव जानकर यांच्या रूपाने ते मिळाले. 

महादेव जानकर या नेतृत्वास ते जपण्याचा व वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. महादेव जानकर यांचे नेतृत्व हे डबक्यात साचून राहणाऱ्या पाण्यासारखे नसून खळखळत वाहणाऱ्या व प्रवाहाबरोबर वाहत जाणारे परिवर्तनवादी नेतृत्व आहे, असे ते सांगतात. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाचे अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांना २५ वर्षापूर्वी, २० वर्षांपूर्वी,१५ वर्षापूर्वी, १० वर्षापूर्वी, ५ वर्षांपूर्वी धनगर समाजाची अवस्था काय होती ? असा प्रश्न करून लक्ष वेधतात.

एस. एल. अक्कीसागर हे महाराजा यशवंतराव होळकर यांना आपले प्रतीक मानतात. कर्नाटकातील त्यांच्या घरी महाराजा यशवंतराव होळकर यांचे तैल चित्र रेखाटले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्रकाशित केलेले यशवंत सेनेचे पत्रक त्यांनी पोस्टाने कर्नाटकातील बांधवांना पाठवले, मात्र तेथील कुलकर्णीने ते पत्र वाचून फेकून दिले व अपमानास्पद शब्द वापरले. यावर महाराजा यशवंतराव होळकर यांचे चित्र छापले होते. त्यातील मजकूर जरी वाचता येत नसला तरी, त्यातील चित्र मात्र तेथील बांधवांनी ओळखले होते, या घटनेवर प्रकाश टाकताना श्री. अक्कीसागर यांनी यशवंत नायकमध्ये कुलकर्णीचे ढोंग व माफीनामा यावर लीहले आहे.

30-जानेवारी-2014 हा दिवस राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर यांच्यासाठी सत्ता संक्रमणाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर म्हणतात, मात्र 2019 साली सत्ता संक्रमणाची वाटचाल करत असलेले महादेव जानकर व राष्ट्रीय समाज पक्ष यांनी महाराष्ट्रात ज्यांच्याशी दोस्ती केली त्यांनीच राजकीय पटलावरून संपवण्यासाठी कटकारस्थान रचले, मात्र दिल्लीच्या सत्तेचे लक्ष्य घेऊन मार्गक्रमण करणारा राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरला व आपले दिल्लीचे स्वप्न जिवंत असल्याचे एस. एल अक्कीसागर यांच्या नेतृत्वात सिद्ध करून दाखवले. ओबीसींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील कोणताही नेता ईशान्य भारतात पोहचलेला नाही, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकर यांचे नेतृत्व आसाम पर्यंत नेण्याचे काम अक्कीसागर यांनी केले आहे. भारतातील विविध नेतृत्वास महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथे आणण्यासाठी एस. एल अक्कीसागरांनी प्रयत्न केले आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार क्षेत्रातून पहिल्यांदा जिंकला ,तेव्हा त्यांनी त्यांच्या आईस, ही गोष्ट सांगितली ; पण त्यांच्या अनपढ आईस यातले काहीच समजले नाही. लहानपणापासून श्री. अक्कीसागर चिकिस्तक वृत्तीचे असल्याकारणाने त्यांनी समाजाला अज्ञानाच्या अंधकरात घेऊन जाणाऱ्या, देवा धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या रूढींना जुमानले नाही. राष्ट्रीय समाजातील महानायक उपेक्षित असल्याकारणाने राष्ट्रीय समाज उपेक्षित असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. महाराजा यशवंतराव होळकर यांचा 200 वा स्मृतीदिन भानपुरा येथे पार पाडला, तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याचे श्री अक्कीसागर सांगतात. शालेय पुस्तकात दिलेले नेतृत्व हे आमचे नसून महादेव जानकर हे आपले नेते आहेत असे श्री अक्कीसागर ठासून सांगतात. भारतातून गोरे इंग्रज गेले, तरी भारतात काळे इंग्रजांचे राज्य आहे आणि ह्या काळे इंग्रजांना हटवण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर करतील असा दावा श्री. अक्कीसागर यांचा आहे. 

श्री एस एल अक्कीसागर यांनी रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ओबीसी कर्मचाऱ्यांचे संघटन उभे केले. आरबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा फुले यांच्या विचाराने ते प्रेरित आहेत. फुले - शाहू -आंबेडकर विचाराचे श्री. अक्कीसागर साहेब पाईक आहेत. छत्रपती शाहू महाराजांची पहिली जयंती रिझर्व बँकेत साजरी करण्याचे काम श्री. एस एल अक्कीसागर यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेची आठवण सांगताना श्री अक्कीसागर सांगतात, रिझर्व बँकेच्या पायरीवर  महादेव जानकर व आपण असंख्य बैठका घेतल्या. कालांतराने पुढे आम्हाला फोर्टला यशवंत नायकचे ऑफिस मिळाले. मासिक यशवंत नायकमधून श्री अक्कीसागर यांनी दर्जेदार स्फुटलेखन, विविध लेख, कविता, बातम्या, संपादकीय लेख लिहले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर  श्री. अक्कीसागर यांनी 'रासेफ'चे संघटन उभे करण्याकडे जोर दिल्याचे समजते. 

श्री. अक्कीसागर यांचे योगदान मोठे आहे. काही लोक जाणीवपूर्वक श्री एस एल अक्कीसागर यांचे नाव लपवतात. श्री एस एल अक्कीसागर यांच्याविषयी लिहिण्या बोलण्यासारखे भरपूर आहे, मात्र आज इतकेच लिहीत आहे.

राष्ट्र भारती द्वारा- आबासो पुकळे, मुंबई.

मो - ९६३७१२०४५३

दिनांक : ०५/१२/२०२१









Saturday, December 4, 2021

वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न

वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर जयंती सोहळा संपन्न

महाराजा यशवंतराव होळकर यांचा 246 वा जयंती सोहळा काल दि. 3 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे जन्मस्थळ भुईकोट किल्ला वाफगाव येथे  अहिल्यारत्न फौंडेशन संचलित महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी 11.30 वाजता मुख्य सभेस सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय बाळासाहेब दोडतले होते. प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक मा. संजय सोनवणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंदौरच्या होळकर घराण्यातील मा. भूषणसिंहराजे होळकर, डॉ. उज्वलाताई हाके, प्रकाश खाडे, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ राजेंद्र खेडेकर, पुण्यश्लोक साप्ताहिकाचे संपादक गणेश पुजारी, समरसता मंचाचे रवी ननावरे, डॉ स्नेहा सोनकाटे,  काकासाहेब मारकड, गोविंदराव देवकाते तसेच भगवानराव जऱ्हाड, नवनाथ बुळे, वाफगावचे सरपंच उमेश रामाने, शाळा नियोजन समितीचे धनंजय भागवत, विद्यालयाचे मुख्याध्यापक श. आ.  तासगावकर तसेच बहुसंख्येने समाज बांधव व वाफगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

जयंती उत्सव समितीतर्फे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत महाराजा यशवंतराव होळकरांची मूर्ती भेट देऊन करण्यात आले. जय मल्हार सेनेच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. संवर्धन समितीच्या वतीने राणी महालातील आकर्षक सजावट करण्यात आली होती.

यावेळी जयंती उत्सव समितीतर्फे अध्यक्ष योगेशराजे होळकर, सचिव योगेश काळे, कार्याध्यक्ष किरण सोनवलकर पाटील, उपाध्यक्ष विकास माने, विक्रांत काळे, राजेश होळकर, तुषार काळे, रंगनाथ होळकर, राहुल सलगर, संदीप वैद्य, संतोष वरक आदींनी कार्याक्रमचे नियोजन केले.


शिक्षक विजय कराळे सर यांनी आद्य स्वातंत्र्य वीर अजिंक्य दादा चक्रवर्ती महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे अलका वर चित्र रेखाटले होते त्याबद्दल त्यांचा अहिल्या रत्न फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे, ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे, मान्यवरांचे अहिल्यारत्न फौंडेशन संचालित, महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य तर्फे आभार मानले.

युवाओं को महाराजा यशवंतराव को मनाना चाहिए अपना आदर्श : दादु महाराज

युवाओ को महाराजा यशवंतराव को मनाना चाहिए अपना आदर्श : दादु महाराज

इंदौर 

देश के इतिहास में ख्यात स्वतंत्रता वीर इंदौर महाराजा श्रीमंत यशवंतराव होलकर (प्रथम) की 245वां जन्मोत्सव 3 दिसंबर को मनाई गई । बंगाली चौराहे के समीप महाराजा श्रीमंत यशवंत राव होलकर की प्रतिमा पर यशवंत सेना द्वारा श्रीमंत के जन्मोत्सव पर मार्ल्यापण एवं दीपोत्सव एवं आतिशबाजी का आयोजन शाम 6:30 बजे किया गया। संस्था के संयोजक रविन्द्र होलकर ने बताया की महामण्डलेश्वर श्री दादु जी महाराज के सानिध्य में मार्ल्यापण व दीपोत्सव एवं आतिशबाजी का आयोजन किया गया।  श्री दादु जी महाराज ने बताया कि श्रीमंत का जीवन युवाओं के लिए प्रेरणास्त्रोत है। 28/10/1811 को उनका देहावसान भानपुरा, मध्यप्रदेश में हुआ था। वे हिंदी, मराठी, उर्दू, अंग्रेजी, फ़ारसी के भी ज्ञाता थे। वे एक ऐसे भारतीय शासक थे जिन्होंने अंग्रेजो को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। वे ऐसे शासक थे जिनका ख़ौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था, इनसे अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार रहते थे। सुमित बोराडे ने कहा की इस वीर योद्धा को भी गुमनामी से इतिहास के पन्नों पर लाना जरूरी है संगठन के अध्यक्ष लक्ष्मण दातीर ने बताया की जिस प्रकार आज शहर में मामा को याद किया जा रहा है आने वाला समय श्रीमंत यशवंत राव होलकर जी का होगा जन-अभियान की शुरुआत करेंगे और स्कूलों में इतिहास के रूप में बच्चों को पाठ्यक्रम आये इसलिए मध्यप्रदेश शासन से प्रतिनिधि मिलेगा ।

इस अवसर पर कौशिक होलकर, धनंजय होलकर, पंडित मीत भवानी कश्यप, जीतू होलकर, मधुकर बुधे, अभिषेक गावड़े, मयूरेश पिंगले, संदीप राहणे, रंजित भांड, जतिन थोरात, सुमित बोराडे, जितेश होलकर, पियूष भिटे,कमल व्यास, सौरभ लांभाते, संदीप नजान,दीपक कोकरे, रामनरेश जादौन, संतोष वडगे, प्रवीण मतकर, गजेन्द्र मतकर, अभिषेक मिश्रा,मोनू साहू आनंद साहू,जय सिंह चौहान,पी. सी मालवीय, प्रणव भोंडवे व कई युवा उपस्थित थे।  कार्यक्रम का संचालन यतिश होलकर एवं आभार लक्ष्मण दातीर ने माना।  

Friday, December 3, 2021

Thursday, November 25, 2021

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मध्यप्रदेश - उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर मध्यप्रदेश- उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर

झाशी रेल्वे स्थानकात महादेव जानकर, कुमार सुशील व अन्य.

मुंबई : आबासो पुकळे

'कंनेक्ट इंडिया स्वराज रॅली' अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर, माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे उत्तर भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे(मामा) आहेत. 

दतीया (मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, कुमार सुशील व अन्य रासप पदाधिकारी.

उद्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी मध्यप्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित 'राष्ट्रीय संविधान दिवस' कार्यक्रम व  कार्यकर्ता मेळावा दातिया जिल्ह्यात सपहा पहाड मैदान, रेल्वे स्टेशनच्या जवळ, दतिया येथे आयोजित केला आहे. दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी उत्तर प्रदेश राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित कानपूर येथे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशाल जनसभेचे आयोजन केले आहे.
मल्हारगड आलमपुर जिल्हा - भिंड येथे राजे मल्हारराव होळकर समाधीस्थळी महादेव जानकर, बाळासाहेब लेंगरे मामा, अन्य रासप पदाधिकारी.

दतिया(मध्यप्रदेश) येथे महादेव जानकर यांचे स्वागत करण्यात आले

दरम्यान, आज २५ नोव्हेंबर रोजी पहाटे महादेव जानकर झाशी रेल्वे स्थानकात पोहचले व दतियाकडे रवाना झाले. पुढे  पितांबरी पीठ की नगरी दतिया मध्यप्रदेश पोहचल्यानंतर  राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांचेतर्फे भव्य स्वागत व अभिनदंन करण्यात आले. दरम्यान, मल्हारगड आलमपुर, जिल्हा- भिंड (मध्यप्रदेश) येथे अटकेपार झेंडे लावणारे राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधी परिसरास श्री. जानकर यांनी भेट दिली.

Tuesday, November 23, 2021

आझाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है : हरीश देवासी

आझाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है  : हरीश देवासी


आजाद भारत में लोकतंत्र की हत्या हो रही है ! आज सिरोही शिवगंज में 6 दिन हो गए हैं और अभी तक पीड़ित परिवार को न्याय नहीं मिला ! पूरे 36 कोम को सड़कों पर उतर कर धरना प्रदर्शन करना पड़ रहा है अभी तक लाश मोर्चरी में रखी हुई है!  इंसानियत मर चुकी है अपराधी अभी भी बाहर घूम रहे हैं उनको गिरफ्तार नहीं किया जा रहा है ! यह कहीं ना कहीं प्रशासन की मिलीभगत और किसी बड़े व्यक्ति की मिली भक्ति के बिना नहीं हो सकता  ऐसा आरोप बिजोवा के सरपंच हरीश देवासी ने लगाया !  देवासी समाज के सभी युवा साथियों यदि अब आप जागरूक नहीं हुए तो आने वाले टाइम पर आप का अस्तित्व ही खत्म हो जाएगा हमें अभी तक आगे और बहुत सारी लड़ाइयां लड़नी बाकी है इसके लिए सभी युवाओं को आगे आना होगा और ऐसे लोगों को सबक सिखाने की जरूरत है आने वाले इलेक्शन में ध्यान रखें  वही लोग आपके सामने गिड़गिड़ाएंगे नाटक करेंगे लेकिन हमे तो उसको वोट की चोट बस एक व्यक्ति यदि 10 लोगों को डिवाइड कर सकता है तब इन लोगों को पता चलेगा जैसे गुर्जर समाज और जाट समाज हमारे से कितने आगे निकल चुके हैं उनके लोगों में जागरूकता और एकता के कारण ही वह लोग आगे बढ़े हैं आज उन लोगों को कोई परेशान नहीं करता तो आप भी ध्यान रखे! 





प्रदेश में न्याय के लिए आखिर कब तक सड़को पर आना पडेगा..⁉️

आजादी के 74 /' 75 वर्ष बाद भी देश मे गरीब, पिछडे एवं शोषित समाजो को अधिकार व न्याय के लिए सड़को पर धरना-प्रदर्शन करना पडता हैं और शासन-प्रशासन का मौन व तमाशबीन बनना तो सरेआम आज़ाद भारत में लोकतंत्र की हत्या हैं. शिवगंज कोना कोलर निवासी भाई ‌अनाराम देवासी का मृत शरीर मोर्चरी में पडा व खराब हो रहा हैं उसको छ-सात दिन हो रहे हैं उसका परिवार , रिश्तेदार और हजारो लोग सड़को पर बैठे है मगर मृत्यु पुर्व लिखे हुए पत्र में नामजद लोगों से प्रशासन द्वारा पुछताछ या गिरफ्तारी या अभी तक कोई बडी कारवाई ना होना चिंता का विषय हैं. आखिर प्रशासन पिडीत परिवार व राईका समाज के धैर्य की परिक्षा क्यू व कब तक लेंगे और शासन-प्रशासन ऐसे संवेदनशील मामलों पर लीपा-पोती क्यू व कब तक करेगी. यह मृतक के परिवार व देवासी समाज के साथ बहुत बड़ा अन्याय हो रहा है. अब पुरे प्रदेश के 36 कौम के बुद्धीजिवी लोगों से करबद्ध निवेदन हैं की पिडीत परिवार को न्याय दिलाने मे मदद करे. और न्याय व अधिकार के लिए सभी को आगे आना होगा नही तो अब मानवता ही खत्म हो रही हैं. और प्रदेश में हत्यारो का मनोबल व अपराध भी बढेगा...? जागो युवाओं जागो अभी नहीं तो कभी नहीं..! इसलिए अब अपराधियों के खिलाफ पिडीत परिवार व राईका समाज का 36 कौम साथ दे और अब एकता का परिचय बहुत जरूरी है!


छ-सात दिन से धरणे पर बैठे सभी आदरणीयों , भाईयों , साथियों, अनुजों एवं समाज के सभी समाज सेवी संगठनों , संघर्ष समितीयों के सभी कर्मठ कर्मवीर कार्यकर्ताओ को नतमस्तक प्रणाम.

राईका , रैबारी , देवासी समाज राजस्थान

प्रदेश की सभी संघर्ष समितीयाँ , संगठन एवं मार्गदर्शन मंडल और  युवाशक्ती

मालधारी अधिकार संगठन राजस्थान

Saturday, November 20, 2021

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय : भगवान ढेबे

पनवेल :  तालुक्यातील कामोठे स्थित जवाहर इंडस्ट्रीज मधील एका विदेशी कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अल्प वेतनात राबवून त्यांना  मूलभूत सोईसुविधापासून डावलले जात होते, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे तथा कामगार नेते भगवान ढेबे यांच्या ६ महिन्याच्या संघर्षानंतर कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. सदर आस्थापनेत सुमारे चारशे ते पाचशे कामगार दिवस-रात्र काम करत होते. त्यांची पिळवणूक होत होती, याविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाकडून श्री. ढेबे यांनी कामगारांच्या बाजूने कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार करत त्यांच्याकडे दाद मागितली. 

श्री. ढेबे यांच्या अथक प्रयत्नामुळे कंपनी व्यवस्थापनाकडून ज्या कामगारांना किमान वेतन मिळत नव्हते, अशा कामगारांना माहे ऑक्टोबर 2021 पासून किमान वेतन लागू, त्याचबरोबर घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, दुप्पट दराने ओव्हर टाईम, दिवाळी बोनस, भविष्यनिर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, भर पगारी रजा अशा अनेक सुविधा मिळवून देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे सर्व कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू नये, अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्यासाठी संघर्षासाठी त्यांच्या संघटनेच्या कार्यालयांमध्ये येऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन श्री. ढेबे यांनी केले आहे.  यावेळी श्री. ढेबे यांच्यासमवेत श्री. आण्णासाहेब रुपवर , सौ. मनिषाताई ठाकूर, मुकेश भगत, श्रीकांतदादा भोईर आदी उपस्थित होते.

Friday, November 19, 2021

तीनों कृषी कानुन बिल वापस लेने पर लोकतंत्र की जीत हुई और अहंकार की हार : महेंद्र राठोड, युवा नेता रासप गुजरात

तीन कृषी कायदे बील मागे घेतल्याची घोषणा, लोकशाही जिंकली तर मोदी सरकारच्या अंहकराची हार : महेंद्र राठोड, युवा नेता गुजरात रासप


तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर गुजरात राष्ट्रीय समाज पक्षाचे युवानेते श्री महेंद्र राठोड यांनी आणि आपली प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त केली आहे. राठोड म्हणाले हा लोकशाहीचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे. गेल्या एक वर्षापासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धैर्याचा विजय आहे. अशदूरदृष्टी पणा व मोदी सरकारचा अहंकार यामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला हा देश कधी विसरणार नाही.
श्री राठोड पुढे म्हणाले आहेत, आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्याला वंदन करतो कारण त्यांच्या बलिदानाचा हा विजय आहे.


 



Monday, November 15, 2021

महादेव जानकर म्हणाले, या देशात आक्रित घडतय

महादेव जानकर म्हणाले, या देशात आक्रित घडतय

मनोर : पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर, बाजूस सिद्धप्पा अक्कीसागर

मनोरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न; सब समान तो देश महान : महादेव जानकर

मुंबई : आबासो पुकळे 

या देशात आक्रित घडतय; ज्यांची मतांची टक्केवरी कमी आहे ते आमच्या डोक्यावर बसलेत आणि ज्यांची मतांची टक्केवारी जास्त आहेत ते भिक मागत बसलेत, पण मला मागतकरी समाजाला देणारा समाज बनवायचाय, त्यासाठी आम्हाला आमचे दल मजबूत करायचे आहे, असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. पालघर तालुक्यातील मनोर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर पार पडले. प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, जिल्हा प्रभारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेला माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर सामोरे गेले. आ. जानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन आम्ही आमचा पक्ष बळकट करण्याचे काम हाती घेतले आहे. कारण दुसऱ्या बाजूला काँग्रेस गांधीवादावर चालते, शिवसेना आणि भाजप हिंदूवादावर चालते, समाजवादी पार्टी समाजवादावर चालते तसे आम्ही फुलेवाद व मानवतावादावर चालणारे आहोत. "सब समान तो देश महान" असे उद्गार पत्रकार परिषदेत महादेव जानकर यांनी काढले.
सर्व धर्मीयांना राजकीय, सामाजिक, आर्थिक भागीदारी समान मिळाली पाहिजे, या विचाराने आमचा पक्ष पुढे जाणार आहे. आज सर्वच समाजात जातिभेद केला जातोय, धर्मवाद केला जातोय, दंगली घडवल्या जातात, हे कुठेतरी थांबवून, समतामुलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मानवतावाद पुढे आणण्याचे काम आमच्या पक्षातील अल्पसंख्यांक आघाडी, मच्छिमार आघाडी, वकील आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व आघाडीचे नेते करणार आहेत, असे पत्रकार परिषदेत जानकर म्हणाले.  पुढे जाऊन काँग्रेस आणि भाजपला पर्याय आम्ही देऊ, हे आमचं पुढचं संशोधन असणार आहे. कारण, काँग्रेस आणि भाजपवर आरएसएसचे नियंत्रण आहे, तुम्हाला नेता राहुल गांधी पाहिजे की मोदी पाहिजे हे तेच ठरवतात. प्रधानमंत्री काँग्रेसचा असला तर तो गांधी घराण्यातला आणि भाजपचा असला तर आरएसएस मधून करायचा ही प्रथा बदलायला पाहिजे.  सर्वसामान्यांमधला प्रधानमंत्री व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. असे बोलून जानकर यांनी दोन्ही पक्षावर ताशेरे ओढले. भारत देशात राहणाऱ्या उच्चवर्गीय, आदिवासी, ओ.बी.सी, मुस्लिम, ख्रिश्चन मागासवर्गीय सर्व समाजासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. सर्व धर्मियांना संगती घेऊन आमचा पक्ष बळकट करणार आहोत. असे दोन दिवसीय शिबिरात महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज या देशात फक्त मुस्लिम आणि मागासवर्गीय लोकांना टार्गेट केले जातंय. पण हे विसरून चालणार नाही की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मुस्लिमांचही तेवढाच योगदान आहे, जेवढा सर्व देशवासीयांचा आहे.



राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाप्रभारी  यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर माधवधाम, मनोर  जिल्हा- पालघर येथे पार पडले. यावेळी जिल्हा प्रभारी यांच्यासह माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, प्रसन्नकुमार, बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशीलजी, गोविंदराम शूरनर, पंडित घोळवे आदी उपस्थित होते.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...