Sunday, November 27, 2022

रासप युवक आघाडीचे संघटन मजबूत करा : भगवान ढेबे

रासप युवक आघाडीचे संघटन मजबूत करा : भगवान ढेबे 

राष्ट्रीय समाज पक्ष युवक कार्यकर्ता बैठकित नियुक्ती पत्र प्रदान करताना भगवान ढेबे, गजानन चंदणे, सुभाष वैशपायन व अन्य.

वावोशी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे प्रश्न हातात घेऊन सोडवले पाहिजेत. आज घडीला युवकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बेरोजगारी, शिक्षण यासारख्या समस्या तर आहेतच, परंतु अलीकडे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ध्येय धोरणामुळे युवकांच्या गंभीर समस्या नव्याने उद्भवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवकांचे संघटन मजबूत करावे, त्यास वरिष्ठ पातळीवरून ताकद देण्याचे काम करू, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे यांनी व्यक्त केले. वावोशी ता- खालापूर येथील राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात युवक आघाडी कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी श्री. ढेबे बोलत होते. 

या बैठकीसाठी उत्तरा विभाग रायगड जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, प्रदीप कोचरेकर, आनंद हिरवे, गजाननभाऊ चंदने, उमेश पाटील, सुभाष वैशपायन, करण बबन ढेबे, अजय रमेश ढेबे, राजू रामचंद्र बर्गे, आनंद भगवान ढेबे, राज जाधव, साहिल अन्सारी, रोहित गाढवे, विजय ढेबे, आनंदा ढेबे, संदीप जाधव, लक्ष्मण हिरवे आदी उपस्थित होते.





Tuesday, November 22, 2022

महादेव जानकरांचा साधेपणा : दुर्गम भागातील नागरिकांना भावला

महादेव जानकरांचा साधेपणा : दुर्गम भागातील नागरिकांना भावला

महादेव जानकर यांची रायगड जिल्ह्यातल्या दुर्गम वाड्या वस्त्यांवर पायपीट

महादेव जानकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला असून त्यांच्या अतिशय साधेपणाची झलक कोकण दौऱ्यातल्या गाठीभेटीने अधोरेखित झाली आहे. महादेव जानकर हे जमिनीवरचा नेता असल्याचा परिचय दुर्गम भागातील नागरिकांना आला आहे. महादेव जानकर यांच्या दौऱ्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यांनी सर्व प्रकारचा लवाजमा बाजूला ठेऊन सर्वसामान्य नागरकांप्रमाणे दुर्गम भागातील नागरिकांच्यात मिळून मिसळून राहिल्याने त्यांचा साधेपणा दुर्गम वाडी वस्तिवरच्या नागरिकांना भावला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माजीमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी रायगड जिल्ह्यात दौरा करून सुधागड, खालापूर तालुक्यात अती दुर्गम डोंगर कड्या कपारीतील वाड्या वस्त्यांवर भेट देऊन आदिवासी, धनगर, ठाकूर बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना आपल्या समस्या मानून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. शेतात मशागतीच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे कष्ट जवळून अनुभवले. रानोमाळ भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या पालावर भेट देऊन लहान मुलांना शाळेत दाखल करून त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे असे सुचवले.

नुकतीच महादेव जानकर यांनी जंगलातून चालत जाऊन दर्यागाव आसानी ठाकूरवाडी येथे आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्यात मिळून मिसळून राहत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खालापूर तालुक्यातल्या ढेबेवाडी येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शिरवली पासून चालत जाऊन दूर सह्याद्रीच्या डोंगरात वसलेल्या ढेबेवाडी गावात ढेबे कुटुंबीयांकडे दोन दिवस वस्ती करून ढेबेवाडी, वावोशी गावातील रस्त्याची व पाण्याची समस्या जाणून घेतली. बालगोपाळांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. अभ्यासाची प्रेरणा देऊन संस्काराचे धडेही दिले. शाळांनाही भेटी देऊन दुर्गम भागातील शिक्षणाची व्यथा जाणल्या. दरम्यान महादेव जानकर यांनी गारमाळ, जभिवली, वावोशी, परखंदे, गोरठन, हेमडी येथील जननी मंदिराचे दर्शन करून या गावांनाही भेट दिली.

या दौऱ्यात कोकण प्रदेश अध्यक्ष तथा प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, कोकण नेते श्रीकांतदादा भोईर, उत्तर रायगड अध्यक्ष संपतराव ढेबे, रायगड संपर्क प्रमुख संंतोष ढवळे-धनवीकर , रायगड महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकूर, खालापूर तालुका रा.स.प. नेते गजाननशेठ चंदने, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, रासप युवक आघाडीचे नेते उमेश पाटील आदी उपस्थित होते.

- रिपोर्ट : आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक.

गायरान अतिक्रमनाबाबत फेरविचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्या

गायरान अतिक्रमनाबाबत फेरविचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्या, रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाने केली मागणी

निवेदन सादर करताना श्री भगवान देवी मनीषाताई ठाकूर मुकेश भगत व अन्य रासप पदाधिकारी.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन

अलिबाग  : सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या प्रकरणात दिलेल्या  २०११च्या व नुकतेच मुंबई हे उच्यन्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला असल्यामुळे, शासनाच्या जमिनीवर जमीन नसलेल्या भूमिहीन, आदिवासी, दलित व शासकीय योजनेतून बांधण्यात आलेल्या शाळा तसेच शासकीय संस्थाच्या इमारती आणि याठिकानावरील जसे की रस्ते, विज, पाणीपुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने व इतर पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने अब्जावधी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे धर्तीवर गावखेड्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासनाने नियमित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यकारणी कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे साहेब यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी, सर्व प्रांत, तहसील अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. भगवान ढेबे यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या  हेतूने अतिक्रमण काढणे संदर्भाततील फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व व राज्याचे मुख्यसचिव यांनी स्वतःकडे जमिनिअसूनही धनदांडग्यांनी व्यावसायिक उद्धेशानी शासकीय जमिनी बळकावल्या असतील, त्या वगळून ज्यांना जमिनी नसलेल्या भूमिहीन, अदिवासी व दलित यांच्याबाबत न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.

याबाबत जर शासनाने नुसती बघ्याची भूमिका घेतली तर राष्ट्रीय समाज पक्ष या प्रश्नासाठी जनआंदोलन उभे करेल आणि सर्व भूमिहीन, दलित,आदिवासी व सर्व पशुपालक भटकेविमुक्त शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून शासनाच्या नाकर्तेपणाबद्दल या प्रश्नाबद्दल तीव्र जनआंदोलन उभे करेल, याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गायरान जमिनीवर कुणी धनदांडग्यांनी डल्ला मारला असेल तर त्याची चौकशी करून, अशी जमीन रिकामी करून शासनाकडे जमा करून घ्यावी. जेणेकरून गायरान जमिनीत भर पडून पशूंना चरण्यासाठी पुरेसा चारा मिळेल. 

दिलेल्या निवेदनावर सौ. मनिषाताई ठाकूर, संपत ढेबे, मुकेश भगत, शहानवाज ताडे, अल्पेश खंडागळे, अजय सिंह, भास्कर नावडेकर, धर्मा खैर, सुरेश मुंडकर, प्रशांत गायकवाड यांच्या सह्या आहेत.

यापुढे पशुपालकांच्या पशुसाठी एकुण लागवडीच्या ५% इतके गायरान राखीव अबाधित ठेवण्यासाठी अतिक्रमण रोखण्यासाठी कायद्याची कडक अमंलबजावणी करण्यात यावी. - भगवान ढेबे, नेते रासप

Friday, November 18, 2022

तुमच्या मुलामुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा : महादेव जानकर

तुमच्या मुलामुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा : महादेव जानकर

 गजी ढोल वाजवून महादेव जानकर यांनी यात्रेची शान वाढवली.

दहिवडी: यशवंत नायक ब्यूरो 

तुमच्या मुला-मुलींना कलेक्टर करा नाहीतर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिनिस्टर करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र यांनी आबाबा देवस्थान यात्रेच्या प्रसंगी केले. यावेळी वडगावचे सरपंच अजित जाधव, रासपचे ज्येष्ट नेते बबन दादा विरकर, जिल्हा उपाध्यक्ष इंजी. दादासाहेब दोरगे, चंद्रकांत दडस, शरद दडस उपस्थित होते. 

महादेव जानकर ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले, ज्या गावची शाळा चांगली असते, त्या गावची प्रगती चांगले असते. ज्या गावचा शिक्षक चांगला त्या गावचे वैभव चांगले असते. दडसाची लेक राष्ट्रीय समाज पक्षामुळे माण तालुक्याची पहिली सभापती झाली. दोरगेची लेक मार्केट कमिटीवर राष्ट्रीय समाज पक्षामुळे उपसभापती झाली. कारण आज जिस समाज का दल है ! उस समज का बल है !! ज्यांचे दल नाही ते बेदखल आहेत. या गावचा सरपंच रामोशी समाजाचा आहे, याचा मला अभिमान आहे. उमाजीराजे नाईक यांची पहिली जयंती, महात्मा फुले यांची पहिली जयंती साजरी केली.  महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातात तलवारधारी प्रतिमा व पहिली जयंती मीच केली. दडसवाडा येथे आज मी नवीन आलेलो नाही. चारपाच वेळा इथे मुक्काम केला आहे, असे श्री. जानकर यांनी सांगितले.

पुढे श्री. जानकर म्हणाले, ज्यांनी आता गजी घाई लावली ते दडसमामा २१ वर्षाचे असताना यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते तेव्हा पांगरीतले दडस गजी खेळण्यासाठी दिल्लीला गेले, पण मामा मी तुम्हाला दिल्लीला बोलविन, घाई लावण्यासाठी नाही तर नेता म्हणून बोलविन. रामोशी समाजाचा पोरग मंत्री झालं पाहिजे. धनगराचा पोरगा पंतप्रधान झाला पाहिजे. माळी, वंजारी समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. यात काही चुकीचे नाही. या देशाची व्यवस्था बदलण्यासाठी ४० वर्ष फिरतोय. तुम्ही माझ्यावर प्रेम केले. दहा दहा रुपये दिले. तुम्ही मते दिलीत. तुमच्यामुळेच दिल्लीकडे चाललोय. चार राज्यात पक्षाला मान्यता मिळत आहे. आता दोन आमदार आहेत; पुढच्या वेळेस २५ आमदार असतील. स्वता:ची झोपडी असेल, दुसऱ्याचा महाल नाही. तुमचीच मदत घेऊन पक्ष पुढे जात आहे. महादेव जानकरने स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही. स्वाभिमान विकलेला नाही. एकट्या समाजाचा नेता मला बनायचे नाही. सर्व समाजाचा नेता बनायचाय. एकट्या जातीचा नेता बनून चालणार नाही. एकट्या जातीची संघटना चालती; पक्ष चालत नाही. सर्व समाजाला सोबत घ्यावे लागेल.  आजपर्यंत महाराष्ट्रात रामोशी समाजाला कोणी विधानसभेचे तिकीट दिले नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने रामोशी समाजाला पहिले विधानसभेचे तिकीट दिले. रासपच्या मंत्रिमंडळात रामोशी समाजाचाच पहिला गृहमंत्री होईल.  आमची लोकसंख्या जास्त आहे, पण वाटा कुठाय? सर्वच क्षेत्रात संख्येनुसार वाटा पाहिजे. आजपर्यंत उपसभापती करत होती, सभापती नाही, त्यासाठी मला पक्ष काढावा लागला. त्यामुळे आपला पक्ष ओळखा. मला गजी घाई लावता येते, मेंढर राखता येतात आणि डाहळा देखील पाडता येतो. ऊस तोडायला येतो व ऊस नांगरायलही येतो. 

श्री. जानकर म्हणाले, माझी विनंती आहे.. आपल्यातले हेवेदावे बंद करा. हिमंत असेल, तर तुमच्या मुला मुलींना कलेक्टर करा. पोरं राजकारणात टाका. आमचा समाज काय म्हणतोय, राजकारण वाईट आहे.  ग्रापंचायतींलाच मारामारी करतील. जिल्हा परिषद, आमदार खासदारकी लढणार नाहीत. आता तुम्हाला आमदार खासदार व्हावे लागेल, कारण राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा तिकिटाचा कारखाना काढलाय. भल्याभल्यांना लोळवणार हाय. आपल्या लोकांनी त्याची काळजी करू नका. फक्त दारू पिऊ नका, व्यसनात जाऊ नका. माझा कोणत्या नेत्यावर राग नाही. पण आमची संख्या जास्त आहे, एखादा खासदार करायला पाहिजे होता. मुख्यमंत्री करायला पाहिजे होता. माझी बहीण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते राहुल गांधी व अमित शहाना ढोल वाजवता येईल का? आपण तुमच्या सोबत ढोल व गजी घाई खेळलो. लहान वयात मुलींची लग्ने करू नका, असे आवाहन करून यात्रेकरू व ग्रामस्थांना शुभेच्छ्या दिल्या.

विश्वाचा यशवंत नायक : ऑक्टोबर २०२२

 





Thursday, November 17, 2022

रासप विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नास यश

रासप विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नास यश; महाज्योतीकडून सरसकट फैलोशिप


मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीच्या प्रयत्नामुळे महाज्योतीकडून सर्व विध्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळणार आहे. म्हाज्योती संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशीप मिळावी, यासाठीं रासपची विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांच्या नेतृत्वात प्रयत्नं करत होती. सारथी व बार्टी प्रमाणें महाज्योतीलाही सर्व सुविधा मिळाव्यात. तसेच फेलोशिप देखील सरसकट मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री यांना रासप विद्यार्थी आघाडीच्यावतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. आंदोलन करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन देखील महाज्योतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांची भूमिका मांडण्यात आली. २०० विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या माध्यमातून दिली जाणारी फिलोशीप विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून ती सरसकट करावी अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. १५०० विद्यार्थांनी महाज्योतीमधून फेलोशिपसाठी अर्ज केला होता, त्यातील महाज्योतीच्या माध्यमातून पहिली प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर करण्यात आली असून, 1226 विद्यार्थ्यांची नावे यामध्ये सामाविष्ट आहेत. तर २५०-२७५ विध्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे, त्यांना त्रुटी दूर करण्यासाठी वेळ दिला आहे. सरसकट फेलोशिपच्या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Wednesday, November 16, 2022

भाजप जनमताचा अनादर करणारी पार्टी : सुशील शर्मा, गुजरात प्रभारी रासप

रासप लोकशाहीचा पुरस्कार करणारी पार्टी तर भाजप जनमताचा अनादर करणारी पार्टी : सुशील शर्मा

वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष भाजपचा मित्र पक्ष असून, भाजप धोका देणारी पार्टी आहे. राष्ट्रीय समाज पार्टी लोकशाहीचा पुरस्कार करणारी पार्टी आहे तर भारतीय जनता पार्टीने जनमाताचा अनादर करण्याचे काम केलेले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे गुजरात राज्य प्रभारी सुशील शर्मा यांनी घणाघात केला आहे. श्री. शर्मा हे शहरवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार नयना परमार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शर्मा पुढे म्हणाले, लोकशाही टीकण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष गुजरातमध्ये स्वबळावर निवडणूक लढवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडणुकीतील मुद्दे जनहिताचे आहेत. भाजप हा भांडवलदारांचा पक्ष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. राष्ट्रीय समाज पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे. पादरा, कर्जत, वडोदरा येथील जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला भरभरून साथ दिली आहे, आशीर्वाद दिला आहे. लोकशाही रक्षणासाठी जनतेने रासप सारख्या विरोधी पक्षाला देखील संधी दिली पाहिजे.

ભાજપ જનતાના અભિપ્રાયનો અનાદર કરે છે: સુશીલ શર્મા, ગુજરાત પ્રભારી આરએસપી

આરએસપી લોકશાહીની હિમાયત કરતી પાર્ટી છે જ્યારે ભાજપ જનતાના અભિપ્રાયનો અનાદર કરતી પાર્ટી છેઃ સુશીલ શર્મા

વડોદરાઃ યશવંત નાયક બ્યુરો

મહારાષ્ટ્રમાં રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી ભાજપની સહયોગી પાર્ટી છે અને ભાજપ એક ધમકી આપનારી પાર્ટી છે. જ્યારે રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી લોકશાહીની હિમાયત કરતી પાર્ટી છે, ત્યારે ભારતીય જનતા પાર્ટીએ લોકોનો અનાદર કરવાનું કામ કર્યું છે, તેવી રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ગુજરાત રાજ્ય પ્રભારી સુશીલ શર્માએ ઝાટકણી કાઢી છે. શ્રી શર્માએ આ પ્રતિક્રિયા ત્યારે આપી જ્યારે તેઓ શાહરવાડી વિધાનસભા ક્ષેત્રમાં રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ઉમેદવાર નયના પરમારનું ઉમેદવારી પત્ર ભરવા આવ્યા હતા.

શર્માએ વધુમાં જણાવ્યું હતું કે લોકશાહીની ટીકા કરવા માટે રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી ગુજરાતમાં સ્વબળે ચૂંટણી લડી રહી છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીના ચૂંટણી મુદ્દાઓ જનહિતના છે. ભાજપ મૂડીવાદીઓનો પક્ષ છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી સામાન્ય લોકોની પાર્ટી છે. રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટી અસ્તિત્વની લડાઈ લડી રહી છે. પાદરા, કર્જત, વડોદરાના લોકોએ રાષ્ટ્રીય સમાજ પાર્ટીને સમર્થન અને આશીર્વાદ આપ્યા છે. લોકશાહીનું રક્ષણ કરવા માટે લોકોએ રાસપ જેવા વિરોધ પક્ષને પણ તક આપવી જોઈએ.

Saturday, November 12, 2022

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन प्रसंगी बोलताना महादेव जानकर, सिद्धप्पा अक्कीसागर, पंडित घोळवे, मोहनकुमार एम, लल्लन पाल व अन्य मान्यवर. 

राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात संत कनकदास यांना ५३५ व्या जयंती निमित्त अभिवादन

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

केंद्र व राज्यात रासपचे सरकार सत्तेत आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य कार्यालयात संत कनकदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री जानकर बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर होते. राष्ट्रीय संघटक पंडित घोळवे, राष्ट्रीय खजिनदार मोहनकुमार एम, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष लल्लन पाल, जिवाजी लेंगरे, विठ्ठल यमकर, प्रकाश डांगे, सुरेश येडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, आजचा दिवस हा भाग्याचा दिवस आहे. संत कनकदास एक महान व्यक्ती आहे. आज संत कनकदास यांची जयंती आहे, कर्नाटक राज्यात शासनातर्फे जयंती साजरी होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात संत कनकदास जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्र व देशात राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आल्यास संत कनकदास यांची शासकीय जयंती साजरी करू. संत कनकदास राष्ट्रीय संत होते.

श्री. जानकर पुढे म्हणाले, ज्या कागेनेली मध्ये संत कनकदास यांना संघर्ष करावा लागला, त्या भूमीत आज संत कनकदास यांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले, त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धन्यवाद. त्याकाळात दक्षिण भारतात संत कनकदास हे संत तुकाराम, संत कबीर, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे महान होते. केवळ हिंदूसाठी नव्हे तर संत कनकदास यांचे कार्य तमाम मानव जातीसाठी होते. 

सत्यशोधक, दंडनायक संत कनकदास यांच्या जीवनावर श्री. अक्कीसागर साहेब यांनी पुस्तक लिहले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते अभ्यासावे. संत कनकदास यांची जयंती महाराष्ट्र, उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे साजरी होत आहे. कर्नाटकात सर्वच राजकीय पक्ष तर्फे जयंती साजरी होत आहे.

श्री. एस एल अक्कीसागर म्हणाले, संगोळी रायन्ना, संत कंनकदास यांचे कार्य मर्यादित क्षेत्रात दडपले होते, मात्र त्यांचे कार्य देशपातळीवर घेऊन जाण्याचं कार्य महादेव जानकर यांनी सातत्याने केले आहे.

Friday, November 11, 2022

राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपचा युवा चेहरा

राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपचा युवा चेहरा 

पाटण/गुजरात : यशवंत नायक ब्यूरो

गुजरात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने 16- राधनपुर विधानसभा मतदारसंघात युवा नेता किशनजी ठाकोर यांना उमेदवारी देऊन काँग्रेस व भाजप समोर आव्हान उभे केले आहे. किशनजी ठाकोर हे राष्ट्रीय समाज पक्ष गुजरात युवक आघाडीचे नेते आहेत. 

वाहेदपुर गावचे रहिवासी असलेले किशनजी ठाकोर विधानसभा मतदार क्षेत्रातील युवकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.  गेल्या एक महिन्यापासून त्यांनी मतदार क्षेत्रात जनसंपर्क वाढवला आहे. गुजरात राज्य ठाकोर समाज युवा संघटनेचे पदाधिकारी आहेत. राधनपुर विधानसभा मतदार संघात रासपच्या उमेदवारांमुळे निवडणुक चुरशीची होईल, स्थानिक पत्रकार दिनेश पटेल सांगतात.

Thursday, November 10, 2022

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार संघात रासपचे उमेदवार नागराजभाई जापडा

वडोदरा : यशवंत नायक ब्यूरो

सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जामनगर ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रात नागराजभाई जापडा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात येण्यापूर्वी नागराजभाई जापडा हे भारतीय जनता पार्टीचे जामनगर जिल्हा पदाधिकारी होते.  काही दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडून स्वतःच्या गावात राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा उघडून पक्षात प्रवेश केला. जापडा यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी गुजरात राज्य समन्वयक जतीन शेठ यांनी प्रयत्न केले. श्री जापडा यांनी त्यांचे सरपंच असलेले भाऊ लखनभाई जापडा यांच्यासह यशवंत नायक ब्यूरोशी वडोदरा येथे खास भेट घेऊन चर्चा केली. नागराजभाई जापडा यशवंत नायक ब्यूरोशी संपर्कात आहेत.  राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे असली नेतृत्व असून, या देशात नकली नेतृत्वाचा ऊत आला आहे, अशा नकली नेतृत्वापासून सावध राहिले पाहिजे, असे मत यशवंत नायक ब्यूरोशी बोलताना व्यक्त केले




Wednesday, November 2, 2022

आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र : डॉ. ए. व्ही. यादव

आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र : डॉ. ए. व्ही. यादव

कुकुडवाड : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, आयटी नंतर फार्मा क्षेत्र देशाला परकीय चलन मिळवून देणारे क्षेत्र असल्याचे मत डॉ. ए. व्ही. यादव यांनी व्यक्त केले. दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, म्हसवड येथे डॉ. ए. व्ही. यादव यांनी सदिच्छा भेट दिली व 'बी. फार्मसी'च्या विद्यार्थ्यांना "करिअर अपॉरचुनिटिज अफ्टर बी. फार्मसी" या विषयावर मार्गदर्शन केले.

श्री. यादव पुढे म्हणाले, फार्मसी हे यंग फिल्ड असून सर्वात फास्ट वाढत आहे. महाविद्यालयीन शिक्षणापासून ते आजपर्यंत फार्मा क्षेत्रात झालेले बदल विद्यार्थ्यांशी शेअर केले. तसेच फार्मा अपेक्स बॉडीकडून आजपर्यंत गव्हरमेंट क्षेत्रात आपलं हवं तेवढं वजन वाढवता आल नाही, याची खंत व्यक्त केली. खरंतर फार्मा क्षेत्र देशात आयटी क्षेत्रानंतर सगळ्यात जास्त परकीय चलन भारताला मिळवून देतय पण डॉक्टर, नर्स, टेक्नीसियन च्या तुलनेत फार्मासिस्टच महत्व तेवढं वाढलं नाही. तसेच कोरोना नंतर थोडाफार बदल निश्चित झाला असला, तरी विकसित राष्ट्रांच्या तुलनेत आपला फार्मासिस्ट पेशंट काऊनसेलिंग मध्ये खूप कमी पडत असल्याचेही सांगितले. विकसित राष्ट्रात डॉक्टरांकडून दिलेल प्रिसक्रीपशन अगोदर फार्मासिस्टकडे जात, त्यावर पेशंटला सर्व माहिती दिली जाते व नंतर औषध चेक करून दिली जात. आपल्या देशात फक्त हिंदू फार्मसी, गोवा याठिकाणी पेशंट काऊनसेलिंग चांगल्या प्रमाणत केले जाते, हे प्रमाण भारतात वाढणे अपेक्षित आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी झाल्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर, क्लिनिकल रिसर्च, प्रोडक्शन, सरकारी संधी याबद्दल मार्गदर्शन केले. अतिशय ग्रामीण भागात महाविद्यालय सुरू केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले व सिद्धनाथाच्या नगरीत मुलांना फार्मसी शिक्षणाची दारे खुली केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भास्कर बनगर, रिसर्च डायरेक्टर डॉ. सुहित गिल्डा, प्रा. एन. व्ही. पिंपोडकर, आयक्यूएसी हेड प्रा. नामदेव शिंदे व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. महेश माने, सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद माने, उपाध्यक्ष श्री. बाळकृष्ण लेंगरे, संस्थापक सचिव प्रा. दादासाहेब कोडलकर, सहसचिव डॉ. वैभव माने व खजिनदार श्री. योगिराज लेंगरे यांनी शुभेच्छा दिल्या.



Tuesday, November 1, 2022

भु कैलास गिरी झाली हुलजंती नगरी...

 भु कैलास गिरी

 झाली हुलजंती नगरी...

भारताचा सांस्कृतिक इतिहास आपण समजून घेतला तर आपणास लक्षात येईल भारत ही भूमी रत्नाची खाण आहे. इथे अनेक संत, महंत, साधू, शरण अनेक पंथ उदयास आले. त्यामध्ये महानुभव, वैष्णव, शाक्त देवी, वारकरी असे पुष्कळ पंथ मानणारी लोक इथे आहेत.

      पंथाची सरळ सोपी व्याख्या करायची झाल्यास, ज्याच्या त्याच्या आराध्य दैवताला एक सर्वसामान्य जनमानसात प्रतिष्ठेचे स्थान निर्माण करून देणे. शिवाय जीवन जगण्याच्या पद्धती ज्या त्या पंथा प्रमाणे आचरणे. इष्ट देवता यांच्या पूजा पद्धती आपापल्या रीतीने परंपरा अशा धार्मिक कार्याचा प्रचार प्रसार करणे. त्यासाठी वेगवेगळी पुराण ग्रंथसंपदा अनेक प्रचार प्रसाराची माध्यम तयार करून जनमानसाच्या मनावर बिंबवणे हेच त्या साधकांचे किंवा अनुयायांचे काम असते. 

भारतामध्ये देखील असे अनेक वेगवेगळे पंथ असतील पण त्याची एकच सोज्वळ वाट आहे.ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला वाईट प्रवृत्ती पासून दूर करणे आणि त्याला भक्ती मार्गाला लावणे हेच सर्व सांप्रदायांनी केले आहे. माणसा माणसांमध्ये प्रेम, जिव्हाळा, नैतिकता प्रामाणिकपणा, भक्ती-भाव, एकाग्रता अशा अनेक मूल्यांचे अवलोकन करण्यासाठीच मुळात ह्या भक्ती प्रचार प्रसाराचे कार्य आहे.

अशाच प्रकारे महाराष्ट्र कर्नाटक ,आंध्र,तेलंगणा अशा प्रकारे अनेक राज्यात ज्या एका विशाल हालमताची व्याप्ती आहे. अशाच हालमतामधल्या वीर आणि पवाड पुरुष श्री महालिंगरायाच्या यात्रेच्या निमित्ताने हा सगळा प्रपंच....

ज्याप्रमाणे पंजाब पर्यंत संत नामदेवांनी भक्तीची पताका नेली. शिवाय गुरु ग्रंथ साहेब मध्ये त्यांच्या ओव्यांची दखल घेण्यात आली.भक्तीला कशाचीच सीमा नसते.अगदी त्याच नियमाप्रमाणे महाराष्ट्र पुण्यभूमी बारामती स्थानी जन्म घेऊन अनेक चमत्कार करत करत तर लोकांना भक्ती मार्गाला लावत,आपल्या पदस्पर्शाने अनेक भूभाग हिंडून मुक्या गाईंचे पालन करून जगासाठी कसे जगावे? परमार्थ कसा करावा ? याचे उत्तर द्यायचे झाले तर महालिंगरायाच्या चरीत्राकडे आपणा सर्वास डोळसपणे पहावे लागेल. 

बारामतीचे मासाळ घराणे त्या मासाळ घराण्यामध्ये या महालिंगरायाचे जनन झाले. वडील तुकाराया चुलते सोमराया आई अमृताबाई व चुलती कनुबाई ज्येष्ठ बंधू जकराया असा इतका मोठा परिवार असताना त्यांनी आपल्या इष्ट दैवतासाठी परभागाला पर मुलखाला येऊन गुरुभक्तीची पताका रोवली.

      वडडी वालग शिवस्थान जगात मिरवून अखिल मानवासाठी भक्ती मार्ग खुला केला. पुढे गुरु बिरोबा व महालिंगराया यांची भेट डोणज तळ्यामध्ये झाली. शिरडोण मठामध्ये महालिंगरायानी त्यांची विधिवत स्थापना करून गुरुभक्तीचे पोवाडे गायले. 

      गुरु बिरोबांनी महालिंगरायास अवघड अनेक गोष्टी सांगितल्या त्यामध्ये वाघिणीचे दूध आणणे न बेडकाने शिवलेले पाणी व बिन किटकाचे फुल अशा अनेक प्रकारे गुरु बिरोबाने महालिंगरायांची भक्ती पाहिली व खऱ्या सोन्याला खस लावला. त्यातून महालिंगराया आपल्या गुरुच्या प्रत्येक परीक्षेत उतरत गेले आणि गुरुभक्तीचा जणू जगाला महिमा दाखवला.

            शेळ्या मेंढ्या राखून जगाला त्यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला.चरित्र नायक महालिंगराया सरते शेवटी भुकैलास हुलजंती येथील बाभळी बनात जगाचे कल्याण करत संजीवन समाधीस्त झाले.

          महालिंगरायांची गुरूभक्ती इतकी अघाद व अपार होते की, प्रत्यक्ष शिवपार्वती यांना त्यांच्या पंच शिखराला मुंडास (पेरावा) अत्यानंदाने करत आहेत. त्याचीच खून म्हणून दरवर्षी दिवाळीच्या अमावस्याच्या रात्री बारा वाजता अजूनही प्रत्यक्ष शिव-पार्वती येऊन महालिंगरायांच्या पंच शिखराला आहेर करतात व मूक भाकणूकेची मोहोर उमटवतात. ही प्रथा शेकडो वर्षापासून सुरू आहे.

     महालिंगरायांच्या चरित्रामधून चमत्कार न पाहता गुरुभक्तीसाठी केलेले कष्ट, कोनूर मठात कुटील सिद्ध भक्तांचे केलेले गर्वहरण,सदाशिव बबलाद येथे नावाड्याचे गर्वहरण, तर मुक्या शेळ्या-मेंढ्या वरती प्रेम करायला लावले. अशा अनेक मूल्यामधून महालिंगरायांचे चरित्र सूर्यासारखे तळपत राहते यात तिळमात्र शंका नाही.

      आयुष्यभर आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणी मधून ओविकार मंडळी अशा महालिंगरायाच्या कथा गात चिरंतर ठेवल्या आहेत.त्यामूळे या वीर पुरुषांचा इतिहास आपणास समजत आहे. यांच्यामुळे भक्तीला उधाण येते आणि असा चरित्र नायक आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.

      एक महान चरित्र नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. पण त्याची दखल कोणतेच माध्यम म्हणावे त्या ताकतीने अजूनही घेत नाही ही शोकांतिका आहे.

          गेली दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा मोठ्या प्रमाणात भरली नव्हती. पण कोरोना रोगाचा प्रभाव कमी झाल्यामुळे त्याच उत्साहाने ही यात्रा 24 ते 26 ऑक्टोबर 2022 दरम्यान पार पडत आहे. या यात्रेसाठी अनेक गावच्या पालख्या येतात.लाखों लोक एकत्र येतात, भंडारा, लोकर, खोबरे, खारीक याची मुक्त हस्ताने उधळण करतात.सुख दुःखाच्या गोष्टी वाटून घेतात.असाच भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडतो.

   *हुलीजयंती....*

आपल्या गुरुसाठी महालिंगरायांनी अपार कष्ट घेतले शिवाय गुरु बिरोबा चरणी महालिंगराया सदैव भक्तीपूर्वक तत्पर असायचे.एके दिवशी गुरूंनी आपणास वाघणीचे दूध खायला मागितले. तेव्हा महालिंगरायानी मोठ्या कष्टातून सकाळच्या न्याहारीला निंबाळ-वार्ती डोंगरातून वाघिणीचे दूध घेऊन आले आणि गुरुचरणी अर्पण केले .त्याच स्मृतिसाठी नारायणपूर गावाचे नामकरण हुलीजयंती असे केले.

   *जतचे डफळे सरकार*

              संस्थानिकांच्या काळामध्ये सध्याचे हुलजंती हे गाव जत संस्थांनात होतें. त्या संस्थानाचे राजे डफळे सरकार होते .त्यावेळी डफळे सरकारांना वाटले की, शिव पार्वती मुंडास बांधण्यासाठी येत नाहीत. हीच लोक मुंडास बांधतात आणि देवाने बांधले म्हणून सांगतात. त्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी म्हणून त्यांनी प्रत्यक्ष आपल्या शिपायांचा पारा तेथे रात्रभर लावला.पण दिलेल्या वराप्रमाणे प्रत्यक्ष शिव-पार्वती मुंडास करून कैलासाला गेले. त्याचवेळी मात्र डफळे सरकार यांच्या शिपायांच्या डोळ्यांवर अंधारी आली.आपली चूक त्यांना कळून चुकली. त्यांनी मोठ्या तळमळीने, भक्तीने महालिंगरायांची क्षमा मागितली . तेव्हापासून यात्रेचे वेळी जत संस्थानिकाकडून पहिला नैवेद्य येण्याची प्रथा सुरू झाली .

तर विजापूरचे वर्षातून तीन वेळा फुल बाशिंग हुलजंती बनामध्ये येत असते.

    अशी या हुलजंती गावची ओळख आहे . तर आपण सुद्धा एकदा या यात्रेला येऊन महालिंगरायाचे दर्शन घ्यावे आणि आपले जीवन सार्थकी लावावे.

*या या अमावस्याच्या राती*

*शिव पार्वती येती*

*भूकैलास हुलजंती होई*

*जन्माला येऊनि मुंडास एकदा पाही...*

    

     *✍🏻सागर माने*

*संचालक:श्री हालमत सांप्रदाय मंडळ;कुपवाड,सांगली*

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...