Sunday, January 16, 2022

आजपासून रासपच्या समाज संगम राजयात्रेस पुण्यातून सुरुवात

आजपासून रासपच्या समाज संगम राजयात्रेस पुण्यातून सुरुवात

मुंबई/राष्ट्र भारती द्वारा

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रत्येकवर्षी कर्नाटक राज्यात नंदगड, बेळगाव येथे  क्रांतिकारक संगोळी रायन्ना राष्ट्रीय राज्याभिषेक वर्शिकोत्सवाचे आयोजन केले जाते.  आज पुण्यातून समाज संगम राजयात्रेस प्रारंभ होणार आहे.

राष्ट्रवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेकाचे २०२२ हे १४ वे वर्ष आहे. यावर्षी पुनः समाज संगम यात्रेचे रासपने आयोजन केले असून, ही यात्रा आधुनिक सामाजिक भारताचे आद्य  निर्माते महात्मा जोतीराव फुले यांची जन्म तथा पुण्यभूमी पुणे येथून आज १६ जानेवारी रोजी प्रस्थान करून 26 जानेवारी २०२२ रोजी संगोळी रायन्ना पुण्यभूमी नंदगड बेळगाव येथे पोहोचणार आहे. दरम्यान महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटक दैवत महात्मा बसवेश्वर यांच्यासहित यात्रेदरम्यान येणाऱ्या महापुरुषाच्या जन्मस्थळ, शक्तीस्थळ, ऊर्जास्थळ यांना अभिवादन करीत, ही यात्रा जनतेत जाणार आहे. समाज संगम - बंधुत्व याचा संदेश देणार आहे. तमाम भारतीय समाजाने कोरोना नियमांचे पालन करीत त्यात सहभागी व्हावे अशी नम्र विनंती  व आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीने केले आहे. 

महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यकारिणी द्वारे वरील राजयात्रेचे आयोजन व नियोजन केले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून जाणारी समाज संगम राजयात्रा, रासपाची राष्ट्रयात्रा ठरणार आहे, असे मत रासपचे बुजुर्ग नेतृत्व श्री. एस एल अक्कीसागर यांनी व्यक्त केले आहे.


दरम्यान आज सकाळी राष्ट्रीय समाज पक्ष कनेक्ट इंडीया स्वराज रॕली अंतर्गत समाज संगम यात्रेची सुरवात  महात्मा फुले वाडा येथून राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय महासाचिव श्री कुमार सुशीलजी , श्री. बाळासाहेबजी लेंगरे मामा, रासप महाराष्ट्र मुख्यमहासचिव श्री बालासाहेबजी दोडतले यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी दत्ताजी ढाकणे,  विनायकजी रूपनवर, अंकुशजी देवडकर, अॕड संजयजी माने , सचिन गुरव व इतर उपस्थित होते.  तसेच समाज संगम यात्रा भिमा कोरेगाव येथे पोहचली. येथील विजयी स्तंभाचे दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय महासचिव श्री कुमार सुशील , श्री. बाळासाहेबजी लेंगरे मामा,रासप महाराष्ट्र मुख्य महासचिव मश्री बालासाहेबजी दोडतले, शिवाजी कुराडे, दत्ताजी ढाकणे व इतर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...