समाज संगम यात्रा ! रासपची राष्ट्र यात्रा !!
![](https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEioRVUMInbaUfiy2T9tlvCH1cquvGtzy3edAKyWe_MyuNlWCcvqHXxN6YvJrNS_rETI1hsjG1-BICKOK8p2DUAG0gfsw2X7FR6EsuLlysyJNyfbeEUJqtRpF9vW6B9nCmDOvS7oLM3eQ_y_c3HVTCNRS-_738DvjkxGJtV1LEKK-v-uUQK3tFqCdVl-Rw=s320-rw)
सत्य काय आहे? सुख कशात आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न मानवाने सातत्याने केलेला आहे. 2000 कोटी वर्षापूर्वी बिंग बंग थिअरीद्वारे विश्वाची निर्मिती झाली. त्यातून असंख्य आकाशगंगा निर्माण झाल्या. आठ हजार कोटी सुर्यमंडळाची मिळून आपली आकाशगंगा आहे. आपल्या सूर्याची उत्पत्ती 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. सूर्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रह आणि उपग्रहात आपली पृथ्वी आहे. 51 कोटी चौरस कि.मी च्या भुक्षेत्रामध्ये भारताचे भूक्षेत्र 33 लाख चौ.कि.मी. आहे. पृथ्वीवर 150 कोटी वर्षापूर्वी जीवसृष्टीची सुरुवात झाली. 5 कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राण्याचा जन्म झाला 10 लाख ते पाच लाख वर्षांपूर्वी मानव प्राणी अस्तित्वात आला. त्यापैकी 1 लाख 85 वर्षे मानवप्राणी अश्म - लोह/ताम्र युगात जगत होता. तात्पर्य आजच्या मानवाचा इतिहास हा केवळ 10 ते 15 हजार वर्षाचा आहे. पैठण (महाराष्ट्र) बल्लारी (कर्नाटक) येथे आदीमानवाच्या अस्तित्वाचे जीवाश्म सापडले आहेत. नव पाषाण संस्कृतीचा उगम भारतातून इराण यूरोपमध्ये गेला, असे एक मत आहे. मानवामध्ये कृष्ण, पित आणि गौरवर्णीय असे तीन वर्ण प्रामुख्याने आढळतात. त्याचप्रमाणे चिनी, अरबी, द्रविडी, युरोपियन आणि इंडो-युरोपीयन असे सहा मूळ भाषा स्रोत सापडतात. क्रमाक्रमाने विकास होत मानव इथंपर्यंत पोहचला आहे.
भारत देश निसर्गदत्त साधन संपत्तीने जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. वर्णाने आणि संस्कृतीने संमिश्र बनलेला, परंतु अत्यंत प्राचीन संस्कृतीचा वारसा आजही जपणारा भारत हा कदाचित एकमेव देश असावा. अनेक आक्रमणे, संक्रमणे, यामधून हा संस्कृती संगम होत गेला, अर्वाचीन भारत बनत गेला. विविध जाती-जमाती धर्म, भाषा, विश्वास, रूढी, चालीरीती, देव, कल्पना, श्रद्धा, वेशभूषा यांचा संगम म्हणजे आपला भारत होय, जगातील प्राचीन-अर्वाचीन बदलांचा प्रभाव भारतीय संस्कृतीवर पडत गेला, असे असले तरी या भूमीतील सांस्कृतिक मूल्ये आजही अबाधित राहिली आहेत, म्हणूनच कवि इक्बाल म्हणतात 'हिंद की हस्ती, मिटाये नहीं मिटती' सहिष्णुता भारतीयत्वाचा आत्मा आहे, त्यामुळे 'लोकशाही' संकल्पनेचा जन्म भारतात झाला. राज्याचा त्याग करणाऱ्या बुद्धाचा जन्म येथे झाला. भव्य आणि बलशाली भारताचे स्वप्न धनगर बालक चंद्रगुप्त मौर्याने पाहिले. चंद्रगुप्त मौर्य भारताचा पहिला सम्राट बनला. शस्त्राचा त्याग करून शांती आणि प्रेम यांचा संदेश देणाऱ्या सम्राट अशोकाचा जन्मही याच देशात झाला. भारताचे विचारतत्व अशोकानेच विश्व धर्म बनवले. जगाच्या अर्ध्या अधिक भागावर आजही अशोका विजय'चा प्रभाव आहे. बलशाली भारताला आणि भारतीयाला कमजोर बनविणारे विषही भारतात आहे. भारतीय सहिष्णुतेला छेद देणारी ही उच्च-निचतेची, भेद-भावाची नीती इराणमधून भारतात आली, असे महात्मा फुले यांनी सर्वप्रथम दाखविले. त्यामुळे विविध जाती-जमाती, भाषा असूनही सहिष्णुतेद्वारे जगातील प्रगत ठरलेला देश आक्रसत गेला आणि जगातील सर्वात मागास देश बनला. परकियांच्या आक्रमणांचा शिकार-सावज बनला. संत रोहिदास, कबीर, तुकाराम, कनकदास, चोखा, नामदेव, सोयराबाई सारखे अनेक संत महात्मे, महापुरुष, यांनी समतेचा, प्रेमाचा विचार सांगून भारतीय समाज एक ठेवण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी भेद आणि विषमता पसरविणाऱ्या प्रवृत्तींवर बुद्ध आणि अशोका नंतर सर्वात मोठा प्रहार केला.
ग्लोबलायझेशनमुळे जगामध्ये घडलेल्या बदलांचा फायदा भारतात मिळत आहे. त्यामुळे एकीकडे अत्याधुनिक साधन-संपत्तीने समृद्ध Indian आणि दुसरीकडे या आधुनिकतेपासून कोसो दूर असलेला भारतीय असा आपला देश विभागला आहे, भारताला बलशाली बनविणे म्हणजे भारतीयांना बलशाली बनवणे होय. बहुसंख्य भारतीय दारिद्र्यरेषेखाली जगत असताना, त्यांचे प्रमाण वाढत असताना, जगातील सर्वात जास्त गरिबीचे प्रमाण भारतात असताना, भारत महासत्ता बनला, तरी त्याचा उपयोग कुणाला ? बहुसंख्याक भारतीय समाजाला जात- जमात, भाषा, प्रदेश यामध्ये विभागत भांडत ठेवत, हे प्रस्थापित राजकिय पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत. यामुळे राष्ट्र धोक्यात आले तरी यांना त्याची पर्वा नाही, अशावेळी राष्ट्रीय समाजाचा 'राष्ट्रवाद'च या देशात तारु शकतो, ही भूमिका घेऊन भारताच्या राजकिय पटलावर राष्ट्रीय समाज पक्ष चा 2003 साली जन्म झाला. प्रदेश,धर्म, वर्ण, वय, जात-भाषा यावर आधारित हा राष्ट्रवाद नाही. या देशातील सर्वांना सामावुन घेणारी सहिष्णुता ज्याचा आत्मा आहे, असा हा राष्ट्रवाद आहे. भारतामधील सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांना समान लेखणारा, सर्वांचा सन्मान करणारा हा राष्ट्रवाद आहे." संकुचित वृत्ती जोपासणाऱ्या, जाती-धर्म- भाषा, प्रांत यांचा सहारा घेऊन भेद पसरविणाऱ्या राष्ट्रघातकी प्रवृत्ती, नेतृत्व, संघटना आणि पक्ष यांच्याविरुद्ध असणाऱ्यांचा हा राष्ट्रवाद आहे, भाजप-आर.एस.एस. चे हिंदुत्व खोटे आहे. यांचे राष्ट्रीयत्व हे झुटे आहे. भाजप-आर.एस. एस बहुजन हिंदूंचा शत्रू आहे. भारताच्या एकतेला ते घातक आहेत. काँग्रेस भाजपचा पिता - निर्माता आहे. काँग्रेसनेच जात-धर्म आधारित राजकारण जन्माला घातले. भारतीय कम्युनिस्ट देखील भाजपचा सख्खा भाऊ आहे. हे तिन्ही पक्ष हिंदू समाजाचे मुख्य शत्रू आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाचेही ते शत्रू आहेत. काँग्रेसची सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) खोटी आहे. काँग्रेस मुळात ब्राह्मणांची पार्टी आहे. असे म्हणत छत्रपती शाहू यांनी काँग्रेस प्रवेशाची ऑफर नाकारली होती. यामुळेच यशवंतराव चव्हाण शेवटी अपमानित झाले होते आणि शरद पवार यांना काँग्रेसमधून तोंडघशी पडून बाहेर पडावे लागले. पंतप्रधानपद तर गेलेच पण सरदारपद तर टिकवून ठेवूया, या आशेने स्वाभिमानी राष्ट्रवादीला पवार साहेबांनी मॅडम काँग्रेसचा गुलाम केले. प्रबोधन ठाकरेंनी देवळाचा धर्म-धर्माचे देऊळ लिहिले. अनेक देव निर्माण करून भटांनी हिंदूंचे वाटोळे केले. सर्व हिंदू देव-देवतांना गावातील एका ठिकाणी आणून प्रदर्शन गृहात ठेवावे, असे सदर ग्रंथात प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचविले होते. शिवजयंतीद्वारे शक्ती, भक्तीचे भरविले जाणारे मेळावे रोखण्यासाठी आणि बहुजन हिंदू पासून जातीयवादी आणि कर्मठ वृत्तीमुळे अलग-अलग पडलेल्या भटांना, हिंदू समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी (शिवजयंतीला शह देण्यासाठी) टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. सन 1920 च्या दरम्यान महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आठवडाभर साजरी केली जात होती. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामुळे शिवजयंती एक दिवसांवर आणली. शिवजयंतीपेक्षा भटांनी सत्यनारायण पुजा महत्वाची मनाली आणि मोठी केली. महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरु केली होती. पुणे आणि महाराष्ट्रभर गावगल्ली- बोळात शिवजयंती मोठ्या प्रमाणात सुरू झाली, तेव्हा बाळ टिळक अजून रांगत होते. नंतर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. राजा बळीच्या विजयासाठी घटस्थापना करून पाळली जाणारी 'नवरात्र' आणि त्यानंतर येणाऱ्या 'दसऱ्या'चाही अर्थ बदलत गेला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत एका बाजूला, टिळक एका बाजूला आणि मध्येच दहा दिवसाचा गणपती मांडला जाऊ लागला. 1894 साली फक्त तीन गणपती पुण्यात बसले होते. आता पुणे-मुंबई सहित संपूर्ण भारतात गणेशोत्सव साजरा होत आहे. परंतु शिवजयंती कधी साजरी करायची 'तिथी की तारीख' वादात सापडली.
भारतात 'राजतंत्र आणि गणतंत्र' या दोन राज्यपद्धती होत्या. गणतंत्रामध्ये अनेक जनपदे होती. जनपदाचा गणनायक गणपती निवडला व नेमला जात होता. त्यामुळेच सहिष्णुप्रवृत्तीचा प्रामाणिक देवभोळा हिंदू समाज गणेशोत्सव आनंदाने साजरा करू लागला. धकाधकीच्या जीवनात एकप्रकारे त्यामध्ये विरंगुळाही शोधू लागला. परंतु त्यामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा आपण पराभव करतोय, शिवरायांच्या वारशाशी द्रोह करतोय, प्रबोधनकारांच्या विचाराशी गद्दारी करतोय, हे तो विसरलाय हे सांगण्यासाठी मी लेखणी झीजवत आहे. कारण सत्य-असत्याशी मन केले गाव्ही, नाही मानियले बहुमता असे सांगून नाठाळांच्या माथी काठी हाणनाऱ्या संत तुकारामाचा मी वारकरी असल्याने सत्य सांगणे माझे कर्तव्य आहे. मी हिंदू आहे, हिंदुची अनेक दैव दैवते आहेत. मुस्लिमांना मारूतीला नैवेद्य देताना मी पाहिले आहे. अनेक हिंदू पिराला मानतात. माझी आई तर कोणतेही देऊळ दिसो, त्याला लवून नमस्कार करताना मी पहातो. मग ते चर्च असो, मंदिर असो, वा मस्जिद असो. आमचा हिंदू भारतीय समाज असा सहिष्णु होता. आजही आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न आज मोठया प्रमाणात होत आहे. या प्रवृत्तीनेच भारताची शकले केली. याप्रवृत्तीमूळे भारत कमजोर झाला. आक्रमणाला बळी पडला. याच प्रवृत्ती जाती, धर्म, भाषा, प्रांत यावरून निरर्थक वाद घालत आहेत. पेपरवाले, टीव्हीवाले त्याला वारेमाप प्रसिद्धी देत आहेत. 'नकली नेते आणि नकली प्रश्न यावर नकली चर्चा' घडवून भारतीय समाजाची - राष्ट्रीय समाजाची, विविध जाती धर्मीय भाषीय समाजाची अक्षरशः टिंगल-टवाळी करून दिशाभुल केली जात आहे, त्यांच्यात फूट पाडली जात आहे आणि हे सर्व हिंदूंना - प्रामुख्याने बहुसंख्यांक ओबीसींना भाजपकडे तर अल्पसंख्याक मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, दलितांना, काँग्रेसकडे, तसेच मराठी समाजाला शिवसेनेकडे , मनसेकडे वळवण्यासाठी केले जात आहे. त्याद्वारे सतेची खुर्ची आपल्याकडे मिळवण्यासाठी हे सर्व चालले आहे. यामुळे हे राष्ट्र दुबळे होत आहे, याचीही त्यांना पर्वा नाही. 'राष्ट्रीय समाज' या देशाचा मूलनिवासी समाज आहे. तो जन्मतः राष्ट्रवादी समाज आहे, परंतु जात, धर्म, भाषा, याचा सहारा घेऊन राष्ट्रीय समाजाची दिशाभूल करून हे प्रस्थापित राजकीय पक्ष सत्ता काबीज करीत आले आहेत. या देशावर राष्ट्रीय समाजाची सत्ता आल्याशिवाय हे राष्ट्र खऱ्या अर्थाने बलशाली होणार नाही, हे ओळखून राष्ट्रीय समाजाची राष्ट्रीय समाज पार्टी आम्ही स्थापन केली आहे, राष्ट्रीय समाजामध्ये भाईचारा निर्माण करण्यासाठी समाज संगम राजयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजित समाज संगम राजयात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून फिरणार असून विविध जाती धर्म भाषा यांच्यामधील परस्पर बंधू भाव वाढवणे हा या समाज संगम राजयात्रेचा मुख्य उद्देश आहे. धनगर बालक चंद्रगुप्त मौर्याने बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहिले. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोकाने अफगाणिस्तान ते बंगाल, काश्मिर ते श्रीलंका असे विशाल आणि बलशाली राष्ट्र उभे केले. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजीराजे, टिपू सुलतान सारख्या अनेकांनी भारताचे 'स्व'राज्य राखण्याचे प्रयत्न केले. महाराणी अहिल्याबाई होळकर या पहिल्या भारतीय राजकर्त्या महिलेने विशाल भारतावर 30 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी 'संगोळी रायन्ना'ने वीरमरण पत्करले. रेवणसिद्दाने शिव मंत्र (कल्याणकारी) दिला. धर्म आणि समाज सांगितला संत बसवेश्वराने जातीभेद विरहीत समाज निर्माण केला. अशा अनेक मानवतावादी, राष्ट्रवादी राष्ट्रीय महापुरुषांनी हे राष्ट्र उभारले. मधल्या काळात भारतावर अनेक आक्रमणे झाली. मुठभर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केले. जात, धर्म, भाषा, प्रदेश यामध्ये भारताला आणि भारतीय समाजाला विभागले. स्वतंत्र भारतात देखील जात, धर्म, भाषा, प्रदेश यावरून भारतीय समाजाला विभागलेला ठेवण्याचे षडयंत्र राबीवले गेले, राबविले जात आहे. भारतात आणि जगात भयावह झालेल्या आतंकवादाचे मूळही या षडयंत्रात आहे. म्हणूनच बंधू भावाचा संदेश देणारी शिवनेरी (महाराष्ट्र) ते नंदगड (कर्नाटक) 'समाज संगम राजयात्रा' राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केली आहे. ही गंगोत्री घेऊन पुढील काळात देशभरातून ही समाज संगम राजयात्रा फिरविण्याचा संकल्प, राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे. त्यामुळे ही समाज संगम राजयात्रा रासपाची राष्ट्र यात्रा ठरणार आहे.
शिवराय जन्मक्षेत्र शिवनेरी (१६२७-१८६०): महा 'राष्ट्र' निर्माते छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवराज जन्मक्षेत्र 'शिवनेरी' पुणे येथून जलकुंभ घेऊन समाज संगम राज यात्रेचा प्रारंभ होणार आहे.
अहिल्या जन्मक्षेत्र चोंडी- (१७२५-१७९५) महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे चोंडी हे जन्मगाव. महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी भारताच्या विशाल भूप्रदेशावर ३० वर्ष राज्य केले. सर्वजण कल्याणकारी राजकारणाचा आदर्श जगाला दिला. प्रजा आणि राजा यांचा संबंध माता - पुत्रा समान असतो, असे राजमाता अहिल्यादेवी मानत असत. ३१ में २००३ साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना चोंडी येथे झाली. चोंडी गावातून सिना नदी वाहते. सिना नदीच्या पात्रातील पाणी धारण करणारे जलकुंभ घेऊन समाज संगम राजयात्रा पुढे वाटचाल करणार आहे.
बसव पुण्यक्षेत्र कुडल संगम (११२५) महात्मा बसवेश्वराच्या कार्याने पुनीत झालेले हे क्षेत्र. येथे तीन नद्या एकत्र येतात, म्हणून याला महात्मा बसवेश्वर कुडल संगम म्हणतात. जाती भेद नाही, सर्व माणसे समाज एक आहे. असा संदेश देत एकात्म राष्ट्रीय समाज निर्माण करण्याचा प्रयत्न महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात केला होता. राजमाता अहिल्या जन्मक्षेत्रातील सिना नदीच्या जलकुंभात कुडल संगमाच्या मलप्रभा-कृष्णा-भीमा नदीच्या पवित्र जलाचा संगम करण्यात येईल. याप्रकारे उत्तर-दक्षिण भारताच्या सिना, चंद्रभागा, कृष्णा, मलप्रभा नद्यांच्या पवित्र जलाचा जलकुंभ घेऊन 'समाज संगम राजयात्रा' नंदगड बेळगावकडे वाटचाल करील.
संगोळी रायन्ना स्मृती क्षेत्र नंदगड (१७९४-१८३१) हा देश भारतीयांचा असून उपऱ्या ब्रिटिशांना येथे राज्य करण्याचा अधिकार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या संगोळी रायन्नाने ब्रिटिशांविरुद्ध देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी लढत-लढत २६ जानेवारी१८३१ रोजी वीरमरण स्वीकारले. ब्रिटिशांनी संगोळी रायन्नांना राजद्रोहाच्या आरोपाखाली नंदगड बेळगाव येथे फासावर चढवले. संगोळी रायन्ना, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, नोवसाजी नाईक, हुतात्मा भांगरे, भगत सिंग या सर्वांनी देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करले. परंतु या सच्च्या भूमिपुत्रांचे वारसदार स्वतंत्र भारतात सत्तेवर न आल्यामुळे भारतात प्रचंड भ्रष्टाचार, विषमता आणि अराजकता निर्माण झाली. गोऱ्या ब्रिटिशांच्या या निमगोऱ्या वारसदारांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय समता, न्याय याची आश्वासन देणारी भारताची आदर्श राज्यघटना राबविली नाही, त्यामुळे गेल्या ६० वर्षात स्वतंत्र आणि लोकशाही भारतात गरीब अधिक गरीब बनले आणि श्रीमंत अधिक श्रीमंत बनत गेले. विज्ञान व विकासाचा फायदा बहुसंख्याक (90 %) राष्ट्रीय समाजाला मिळाला नाही. विविध नद्यांचा मिळून जसा महासागर बनतो त्याप्रमाणे विविध जाती, धर्म,भाषीय, समुदायांचा संगम घडवून राष्ट्रीय समाजाचा विशाल आणि बलशाली महासागर निर्माण करण्याचा संकल्प घेऊन रासपाने समाज संगम राजयात्रेचे आयोजन केले आहे. विविध जाती, धर्म, भाषिक, समुदायाचा एकात्म राष्ट्रवादच या देशाला तारू शकणार आहे. चोंडी (सिना), पंढरपूर (चंद्रभागा), विजापूर (भीमा), कुडल संगम (मलप्रभा-कृष्णा), आदी नद्यांच्या पवित्र आणि शक्तीदायी पाण्याचा जलकुंभ घेऊन ही समाज संगम राजयात्रा नंदगड-बेळगाव येथे पोहोचणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या संगोळी रायन्नाचा राज्याभिषेक समारोह, पवित्र जलकुंभाद्वारे विशाल राष्ट्रीय समाजाच्या साक्षीने, भारताच्या जेष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. नालायक राज्यकर्त्यांना बदलुन, लायक आणि खऱ्या वारसदारांना विविध राज्यात आणि केंद्रात राजसत्तेवर बसविण्याची शपथ यावेळी संगोळी रायन्नाच्या पवित्र समाधीला साक्षी ठेऊन घेतली जाणार आहे.
निमंत्रक :
मान्य - महादेव जानकर
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष
शब्दांकन: सिद्धसागर
एस एल अक्कीसागर
साभार: यशवंत नायक ऑक्टोबर 2008 मधून पुनर्रसंपादित आणि प्रकाशित - सिद्धसागर