रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग|
अंतर्बाह्य जग आणि मन ||
युद्धात जय अत्याचार होतो जो युद्धात सावध असतो त्याचा जय होतो, याच्या उलट जोडीदार बेसावध राहतो त्याचा पराजय हा ठेरलेलाच असतो. यासंदर्भात आपण जर आपल्या जीवनाकडे पाहिले व सिंहावलोकन केले तर आपल्याला असे आढळून येईल की, ज्या ज्या वेळी आपण काही कारणामुळे बेसावध राहिलो, त्या त्या वेळी आपल्याला जीवनात अपयश आले. सामान्य माणसाचे असेच आहे, बेसावधपणे जीवन जगणे हे जणू त्याच्या रक्तातच भिणून गेले आहे, बेसावधपणा जून माणसाचा स्वभावच झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे संसारात त्याला ठाई ठाई ठेचा खाव्या लागून, बनाना पत्ती तोंड द्यावे लागून दुःखात सागरात बुडून जावे लागते.
सामान्यपणे सामान्य माणसे खालील ठिकाणी बेसावध असतात असे आढळून येते १) संतती २)संपत्ती ३)संगती ४)आरोग्य ५)ईश्वर.
No comments:
Post a Comment