१७ जुन २०१५ रोजी आबासो पुकळे यांनी प्रसिद्ध केलेला लेख.
माणदेशाच्या दुःखाचे मुळ कारण म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. प्राचीन काळापासून कमी-अधिक संपूर्ण माणदेशात पाऊस पडत आलेला आहे. कधी कधी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला होता, असे इतिहासात दाखले मिळतात. माणदेश गरीब व मागासलेल्या भागाचे मूळ कारण आहे कमी प्रर्जन्यमान. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजंदारीवर अवलंबून असलेले उद्योग, त्यातच अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. तेव्हा या सर्व प्रश्नावर एकमेव तोडगा म्हणजे मुळचा "माणदेश" जिल्ह्याची निर्मिती झाली पाहीजे. लवकरच शासनाकडून माणदेशाचा सर्व्हे करून त्वरीत विधानसभेत मंजुरी करवून जिल्ह्यातील सर्व कामास गती आणणे आवश्यक आहे.
माणदेश जिल्हा निर्माण करण्यासाठी माणदेश हितचिंतकांद्वारे राजकीय पातळीवर या प्रश्नाची सोडवडणूक जाणिव व प्रयत्नपूर्वक करून घेतली पाहीजे. हीच माणदेशातील तमाम जनतेची अपेक्षा आहे. माणदेशात संत चोखामेळा, दामाजी पंत, श्रीधरस्वामी नाझरेकर, गोंदवलेकर महाराज, नायाप्पा गवळी, इत्यादी संतमहात्म्यांच्या पदस्पर्शाने भूमी पुनित झाली आहे.
माणदेशातील तमाम बुद्धिवादी, न्यायाधीश, वकील, शिक्षण तज्ञ, डाॅक्टर्स, लेखक, शेतकरी, कामकरी, प्राचार्य, प्राध्यापक, विचारवंत, शिक्षक, तरूण, सुशिक्षित वर्ग, श्रमिक, मेंढपाळ तमाम जनता यांनी एकजूटीची वज्रमुठ उगारून 'माणदेश जिल्हा' निर्माण करण्यासाठी जनआंदोलनद्वारे शासनकर्त्यांविरुद्ध सार्वजनिक, सार्वहीत कार्यासाठी जनआंदोलनाद्वारे उठाव केला पाहीजे. द्रोही शासनकर्त्याना गाव बंदी केली पाहीजे. याचा विचार तरूण पिढीने आवश्यक करावा. तेव्हाच माणदेश जिल्ह्याची निर्मीती तातडीने होईल अन्यथा नाही.
जमिनीतील 'वैशिष्ट्यपूर्ण थराला माण' नाव मिळाले. ज्या भागात 'माण' जमिनीत सापडते तो माणदेश व माणदेशातून वाहणारी नदी ती माण नदी. माण नावाचे गाव माणदेशात कधिही नव्हते व नाही.
पश्चिम-उत्तर दिशांनी सर्व बाजूंनी शंभू महादेवाचे उंचच उंच डोंगर, उत्तर दिशाकडे उंच डोंगररांगेत शिखर शिंगणापूरचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर, त्या पलीकडे निरा नदी चे खोरे, सुमारे चार हजार फुट खोल दर्र्या सलग पन्नास ते साठ मैल लांब प्रदेश उघड्या डोळ्यांनी बघीतल्यासारखा दिसतो. पुढे त्याच डोंगररांगेतून पूर्वेस जस जसे जावे तसे भिमा खोरे दिसते. आता पश्चिम दक्षिण दिशांकडे देखील उंचच उंच डोंगर असून त्या पलीकडे येरळा नदीचे खोरे दिसते. दक्षिण बाजूस भिवघाट व तसेच पूर्वेस डोंगरराजीतून खाली उतरले असता जत तालुक्याच्या सीमा, पलीकडे दोड्डा नाला खोरे दिसते. आता पश्चिम ते पूर्व भूभाग माण नदी ज्या कुळकजाई ता.माण सिताबाई डोंगरातून उगम पावून पूर्वेस सरकोलीजवळ भीमा नदीस मिळते. हा प्रवास 116.8 कि.मी. व दक्षिणोत्तर भूभाग 91.2 कि.मी. असून हा संपूर्ण माणदेश आहे. माणदेशात यावयाचे तर खिंडीशिवाय रस्सा नाही.
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' . सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे बोलतात. प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही इतिहासकारांच मत आहे.
'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे. देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.
म्हसवड इतिहास प्रसिद्ध प्राचीन गाव आहे. त्याठीकाणी माणगंगा नदीकाठी , उत्तरेस बाजीराव धुहाळांनी इ.स दहाव्या शतकात श्री.सिद्धनाथ जोगेश्वरी मंदीर बांधले. श्री सिध्दनाथ जोगेश्वरी शंकर पार्वतीची रूपे आहेत. मानाड्क राजाचा नातू गरूड राजा राज्य करीत असताना म्हसवडच्या सिध्दनाथ मंदिरात परंपरागत पांढरा हत्ती होता. तो वारला. गरूड राजाने परांड्याच्या किल्ल्यातून प्रचंड मोठा दगड आणून मेलेल्या हत्तीची प्रतिकृती घडवली. तोच हा सुंदर देखणा हत्ती.
माणदेशातील इतिहास कालीन घटना-
भिल्लणाचा नातू सिंघण (1120 ते 1247) हा शिवभक्त राजा होता. त्याने शिखर शिंगणापुर हे गाव शंभू महादेवाच्या मंदिराजवळ वसविले.1187 साली कलचुरी राजाचा पराभव करून माणदेशावर भिल्लणदेव यादवाने यादवांची राजवट चालू केली.
इ.स.1209 साली म्हसवड चे सरदार माने यांनी पन्हाळा किल्ला घेतला व कसबा बीडवर आक्रमण केले.
इ.स.1659 साली छ.शिवाजीराजे व सरदार रथाजी माने यांची गुप्त बैठक शिखर शिंगणापुरचे पूर्वेस दोन कि.मी.अंतरावर गुप्त लिंगाच्या देवळात झाली.
इ.स.1667 रथाजी माने यांचा विजापूरच्या अदिलशहाच्या सरदाराकडून फसवून वध केला.
इ.स.1693 मार्च नागोजी माने विदर्भाकडे स्वारीस गेले.
इ.स.8 एप्रिल 1697 सेनापती संताजी घोरपडेचा म्हसवड येथे मुक्काम होता.
इ.स.16 जून 1697 सेनापती संताजी घोरपडे व पुतळाबाई कारखेलच्या(ता-माण) रानात मृत्यूमुखी पडले.
माणदेशात ब्रिटिशाविरूध्द बाज्या बैज्याचे माणदेशी बंड.
तुकाराम पुकळे यांचा सातारा, माढा व धुळे येथे नाना पाटिल यांच्या प्रतिसरकारात सहभाग.
माणदेशात 16 व्या व 17 व्या शतकात औरंगजेबाच्या माणदेशात लष्करी छावण्या. औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्ष होता.13 वर्ष म्हसवड पासून 12 ते 45 मैल एवढ्या अंतरावर खवसपूर, ब्रम्हपूरी, अकलूग येथे होत्या.
1-10-1700 माण नदीला अचानक महापूर आला. छावणीची वाताहत झाली. औरंगजेब पाण्यातून निघताना खडकावर आपटला. गुडघा मोडले व पुढचे दात पडले. (माण नदिने औरंगजेबाला शिक्षा दिली).
माणगंगा नदीला एकूण 63 ओढे, नाले, उपनद्यांचा संगम होऊन भिमा नदीस मिळते. माणदेशाचा प्रदेश 74` 22 मी.30` सें ते 75`,30 मी.पूर्व रेखांशावर आहे. त्याचा अक्षांश 17` उत्तर अक्षांश ते 17`,51 मी, 41` सें.उत्तर अक्षांश आहे. माणदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार 116.8 किलोमीटर व दक्षिणोत्तर विस्तार 91.2 किलोमीटर असा आहे. माणदेशाचे क्षेत्रफळ 48,700 चौ. किलोमीटर आहे. सध्या माणदेशात सातारा, सांगली व सोलापूर अशा तीन जिल्ह्यांच्या सिमा हद्दीवर आहे. माणदेशात माण, आटपाडी हे पूर्ण तालुके, सांगोला तालुक्यातील 81 गावे, मंगळवेढा तालुक्यातील 22 गावे, पंढरपूर तालुक्यातील माण नदीच्या काठावरची 12 गावे, जत तालुक्यातील 31 गावे व कवठेमंहकाळ तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. असा आहे हा माणदेश. !
- आबासो पुकळे
मु.पुकळेवाडी ता-माण जि-सातारा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...
No comments:
Post a Comment