Monday, January 20, 2020

कृष्णेच्या तिरावरील वादळ : प्रवचनकार बापू बिरू वाटेगावकर

             आधुनिक महानायक 

        बापू बिरू वाटेगावकर(आप्पा)

"रंगा शिंद्यानं बोरगावात पोरीचं नरडं दाबून मारून टाकलं. पण त्याच्याविरुद्ध कुणी साक्ष देईना. भीत होते त्याला. तेव्हा चार मुली माझ्याकडे आल्या. म्हणाल्या आता आमचं काही खरं नाही. आम्ही देह कृष्णा-कोयनेला अर्पण करणार. तुम्हाला काही होत असलं तर बघा. तेव्हा मी कुऱ्हाड हातात घेतली अन् रंग्याचा कोथळा बाहेर काढला." - बापू बिरू वाटेगावकर
पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यात म्हणजे आताचा  सांगली जिल्ह्यात कृष्णा-वारणा खोऱ्यात बंदूक आणि कुऱ्हाडीच्या जोरावर गावगुंडावर दहशत निर्माण करणाऱ्या बापू-बिरू वाटेगावकर (अप्पा) यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे़.  कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या व्यक्तीला समाजमान्यता मिळण्यामागचे कारण काय होते़? कोण होता हा बापू-बिरू? कृष्णा-वारणेच्या खोऱ्यात अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या नायकांची इतिहासात कमतरता नाही. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर चर्चेत आलेले आणखी एक नाव म्हणजे 'बापू बिरू वाटेगावकर'. याचा संदर्भ कोणत्या लढ्याशी नसला तरी गावगाड्यात महिलांना, गोरगरीबाना नाडणाऱ्या आणि छळणाऱ्या विरोधात दरारा आणि धाक बापूंचा या भागावर एकेकाळी होता. 
बापूने गावगुंडांचा खातमा केला. २५ वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १२ खून केले. यांपैकी केवळ एका खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पोलिसांकडून खासगीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी केलेल्या खुनांची मोजदाद नाही. पुरावे आणि साक्षीदारही त्यांनी मागे ठेवले नाहीत. गावगुंडांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या बापूने शिक्षा भोगल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ‘अध्यात्मा’त रममाण होण्याचा प्रयत्न केला.  यात कायद्याच्या दृष्टीने बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) कायमच गुन्हेगार ठरतो, तर लोकांच्यादृष्टी तो रॉबिनहूडपेक्षा कमी नाही. आज सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा. कृष्णा नदीच्या खोऱ्यात बारमाही पाण्यामुळे ऊसासह नगदी पिकांची कमतरता नव्हती. जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथंपर्यंत ऊस. काही ठिकाणी बाभळीचे बन. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारने या परिसराला वेगळी ओळख निर्माण करून दिली. स्वातंत्र्यानंतर गावातील काही ठरावीक लोकांकडे कारभार आला. पैसा आणि सत्तेच्या जोरावर मातलेल्या काही धनदांडग्यांनी मनमानी सुरू केली. यातूनच गावगाड्यात गावगुंडांच्या गुन्हेगारी टोळ्या वाढल्या. बोरगाव हे वाळवा तालुक्यातील समृद्ध गाव. गावाच्या तिन्ही बाजूला कृष्णा नदीचा वेढा आणि सुपीक जमिमीनुळे बारमाही शेतं हिरवीगार. रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरचे मजूरही बोरगावसह आसपासच्या वाड्यावस्त्यात येऊन राहिले. गावगुंडांच्या दृष्टीने हे गरीब मजूर आयती शिकार ठरत होते. त्यांच्या कोंबड्या पळवणे, शेतशिवारातून बोकड, शेळ्या उचलणे असे प्रकार वाढत होते. याच्याविरोधात बोलायची सोय नव्हती. कुणी बोललाच तर त्याला धमकावून मारहाणही व्हायची. बोरगावचा रंगा शिंदे हा गावगुंडांच्या टोळीचा म्होरक्या होता. त्याचा उपद्रव इतका वाढली की, त्याने एक दिवस गावातील एका महिलेवर जबरदस्ती केली. पुढे महिलेला जिवंत जाळन्यापर्यंत मजल गेली. 
त्यावेळी बापू बिरू वाटेगावकर हा तरुण मेंढपाळ बोरगावच्या तालमीत घाम गाळत होता. लहानपणापासून कधीच शाळेचे तोंड पाहिले नाही, त्यामुळे अक्षरओळख असण्याचा संबंध नाही. आईवडिलांकडून मिळणारी तोंडी माहिती, ओव्या, कीर्तन आणि प्रवचन हेच त्याचे शिक्षणाचे साधन. घोंगडं खांद्यावर टाकून दिवसभर मेंढरांमागे हिंडने, पोटभर खाणे आणि पैलवानकी करणे एवढाच नित्यक्रम सुरू होता. रंगा शिंदेचे कारनामे रोज त्यांच्या कानावर येत होते, मात्र त्याचे गांभीर्य कळत नव्हते.  गणेशोत्सवात गावात मंडळासमोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता. रात्री ओव्या रंगात आल्या आणि रंगाने बायकांमध्ये शिरून दंगा सुरू केला. बायकांची पळापळ झाली. बापूनी रंगाला बाजूला घेऊन पान सुपारी दिली. ओव्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि काही वेळातच बापूनी चाकूने रंगाचा कोथळा बाहेर काढला. १९६६ मध्ये बापूच्या हातून हा पहिला खून झाला. यानंतर फरार झालेले बापू पोलिसांना २५ वर्षे सापडले नाहीत.

रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीत लोकांनी पुरणपोळीचे जेवण केल्याच्या आठवणी काही जुने लोक सांगतात. रंगाच्या भावाने बदला घेण्याची शपथ घेतली, मात्र बापुंनी त्यालाही संपवले. यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापुंना मारण्यासाठी बंदुकीचे लायसन मिळवले. याची माहिती मिळताच बापुंनी रंगाच्या मामाला ताकारीच्या बसस्टँडमध्ये गोळ्या घातल्या. सलग तीन खून केल्याने आसपासच्या परिसरात बापू बिरू वाटेगावकर नावाची दहशत निर्माण झाली. बापूविरोधात साक्ष देण्यासाठी कुणी धजत नव्हते, त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत. या काळात बापू बोरगाव, जुनेखेड, वाळवा, ताकारी, रेठरे हरणाक्ष, बिचूद, शिरटे, येडेमच्छिंद्र, खरातवाडी परिसरात दबा धरून बसले. लोकांनी शेतातल्या वस्तीवर त्यांच्या जेवणाची सोय केली. दरारा वाढेल तसे काही तरुण बापूकडे ओढले गेले. गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बापुंना होती. त्यामुळे अशा गावगुंडांना बापूने हेरून ठार केले. शेतात खड्डे काढून मृतदेहांची विल्हेवाट लावली. एकूण बारा खुनांची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र बापुंनी यापेक्षा जास्त खून केल्याची माहिती पोलिस खासगीत देतात. १२ खून करूनही बापुंना केवळ रंगा शिंदेच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली.  आपल्या नावाने कुणी लोकांना दमदाटी करून लूटमार करणे त्यांना पसंत नव्हते. यातून चार सहकाऱ्यांवर बापूने हल्ला केला. स्वत:च्या मुलालाही बापुंनी मारले. या साऱ्या घटना गेल्या चार-पाच वर्षांत बापू स्वत:च सार्वजनिक कार्यक्रमांतून सांगत असे.
सामान्यांसह पोलिसांशीही दोस्ती
खूनसत्र सुरू झाल्यानंतर बापू तब्बल २५ वर्षे पोलिसांना चकवा देत होते. या काळात त्यांना शेतकरी आणि मजुरांनीच तारले. जेवणाची शिदोरी शेतात पोहोच केली. पोलिसांच्या गाड्या पोहोचण्यापूर्वी बापुंना निरोप पोहोचायचे. शिवारातील मंदिरांमध्ये आसरा मिळाला. या काळात काही पोलिसांनीही बापूला मदत केली. बापुंना मिळालेली बंदूकही एका पोलिसाचीच होती. त्यांनी साताऱ्यातून बंदूक मिळवल्याचे पोलिस चौकशीत सांगितले होते. विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळ्याही त्यांना काही पोलिसांकडून मिळाल्या होत्या. या नेमक्या कुणाकडून मिळाल्या याबाबत मात्र अखेरपर्यंत मौन बाळगले. जेव्हा नाव सांगण्याची वेळ आली, तेव्हा त्याने आजारपणात मेलेल्या पोलिसाचे नाव सांगून वेळ मारून नेली. १९९० मध्ये बापुंना तत्कालीन पोलिस निरीक्षक मदन पाटील यांनी जुनेखेडच्या परिसरात बाभळीच्या बनात जेरबंद केले. कळंबा जेलमधील बापुंना पोलिस बंदोबस्तातून काढून पळवण्याचाही प्रयत्न झाला. सांगली कोर्टातील सुनावणी आटोपून कोल्हापूरला परतताना शिगावचा गुंड रवी कांबळे याने तमदलगेजवळ एसटी अडवून बापुंची सुटका केली होती. यानंतर काही वेळातच पोलिसांनी जत तालुक्यातील उमदीजवळ त्यांन जेरबंद केले. जन्मठेपेची शिक्षा भोगताना तुरुंगात चांगल्या वागणुकीचा फायदा मिळाला. रंगा शिंदेचा बंदोबस्त केल्यामुळे त्याला चार एकर जमीन मिळाली होती. अध्यात्माची गोडी याच काळात वाढल्याचे बापू नेहमी सांगत असे. शाहीर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्याने बापूंना जनमानसांत पोहोचवले. किंबहुना, बापूची प्रतिमा निर्माण केली.
अध्यात्मिक वृत्तीने बदलली प्रतिमा
फरार असलेल्या काळात एकदा बापू बहे-बोरगावच्या रामलिंग बेटावर गेला होते. सोबत चार साथीदार होते. मध्यरात्रीच्या सुमारास रामाचे दर्शन घेण्यासाठी पुजाऱ्याला उठवले. तेव्हा स्वामी जोगळेकर महाराज मंदिरात भेटले. जोगळेकर महाराजांनी बापूंना माळ दिली. 'मांसाहार मस्तीची वस्तू आहे. व्यसन सोड आणि पैशांचा मोह करू नको,' असा सल्ला त्यांनी दिला. यानंतर बापूंनी मांसाहार आणि व्यसन केलेच नाही. जन्मठेपेच्या काळात अध्यात्मिक वृत्ती आणखी वाढली. अभंग तोंडपाठ झाले. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची संगत सुटली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला होता. बापू बिरू प्रवचने देऊ लागले.  बापअन्यायविरोधत लढणारा ढाण्या वाघ, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. जनमाणसात गावगुंडांची दहशत असते, मात्र गावगुंडावर ज्यांची प्रचंड दहशत होती असे  बापू बिरू नावाने प्रसिद्ध असणारे "आधुनिक महानायक बापू बिरू वाटेगावकर" ९६ व्या वर्षी १६ जानेवारी २०१८ ला अर्थात" कृष्णेच्या तिरावरील वादळ अंनतात विलीन झाल. !!

Wednesday, January 15, 2020

मकर संक्रांत, पोंगल, बिहू शुभेच्छ्या.


सूर्य के दक्षिणायन से उत्तरायण होने पर...
भारतवर्ष के उजाले में वृद्धि के प्रतीक पर्व...
"मकर संक्रान्ति" पर आपका जीवन भी अत्यन्त प्रकाशमान हों...
आप स्वस्थ रहें... प्रसन्न रहें... और सूर्य की भांति अपने प्रकाश से विश्व को आलोकित करें...!
ऐसी शुभेच्छा के साथ पोंगल.. विहू.. खिचड़ी.. सागर मेला.. पतंगतोत्सव.. माघी.. लोहड़ी... मकर संक्रान्ति पर्व  की हार्दिक मंगलकामनाएं...!!
आबासो पुकळे
🌻🌾🌾🌾🪁🐂🪁🌾🌾🌾🌻

Tuesday, January 14, 2020

अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर महानाट्य

महानाट्यातुन पंधराशे विद्यार्थिनींनी घडविले अहिल्याबाई होळकरांचे जीवनदर्शन


पुण्यात अहिल्याबाई होळकर यांचे स्फूर्तिदायी जीवनचरित्र महानाट्यातून पाहायला मिळाले. सुमारे दोन तास चाललेल्या या महानाट्याचे ‘शिवधनुष्य’च जणू अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी समर्थपणे पेलले. क्षणोक्षणी अंगावर रोमांच उभारणारे ‘महाश्‍वेता’ हे नाट्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलमधील बत्तीस शिक्षिका आणि सुमारे दीड हजार विद्यार्थिनींनी मंगळवारी दिनांक. २४ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे ‘महाश्‍वेता’ हे महानाट्य साकारले. होळकर कुटुंबाने सन १९३९ मध्ये शनिवारपेठेतला होळकरवाडा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला होता. सोसायटीने या ठिकाणी अहिल्यादेवी प्रशाला ही मुलींसाठीची शाळा सुरू केली. या वास्तूच्या सहस्रचंद्रदर्शन वर्षानिमित्त महानाट्य सादर केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे होते. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार रामहरी रूपनवर, पीएमपीच्या नयना गुंडे, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, संचालक मिलिंद कांबळे, डॉ. सविता केळकर, शाळा प्रमुख स्नेहल कुलकर्णी, दर्शना कोकरे, पर्यवेक्षिका अनघा डांगे, कार्याध्यक्षा ज्योत्स्ना कांबळे, उपकार्याध्यक्षा दीपा अभ्यंकर, अर्चना पंच, विद्यार्थिनी प्रतिनिधी गीता मालुसरे उपस्थित होते. अहल्यादेवींचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

महानाट्यातील महत्त्वाचे प्रसंग

'अहिल्यादेवींचा विवाह, सती जाण्याचा प्रसंग, सात-बारा उतारा सुरुवात, महिला फौजेची निर्मिती, तोफा निर्मिती कारखाना, मनुष्यहानी न होता जिंकलेल्या लढाया, समाजासाठी रोजगार आणि उद्योगनिर्मिती, दानधर्म आदी साकारले.



Sunday, January 12, 2020

राष्ट्रीय युवा दिन- स्वामी विवेकानंद जयंती अभिवादन

गौतमाचा बुद्धवाद, येशूचा ममतावाद, पैगंबराचा समतावाद मिळून तयार होणारा मानवतावाद, हाच माझा खरा धर्म आहे, हिंदू धर्म आहे. असे मत मांडून हिंदू समाज जागरणाद्वारे, 'राष्ट्र जागरण करण्याचा प्रयत्न करणारे स्वामी विवेकानंद यांना १२ जानेवारी जयंती दिनानिमित्त विनम्र जय मल्हार ..! 

"मानवाचे अंतिम लक्ष्य ज्ञान आहे". "युवकानों, उठा जगे व्हा ! ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका" - स्वामी विवेकानंद
राष्ट्रीय युवा दिनाच्या भारतीय युवकांना लाख लाख शुभेच्छा...! 

- आबासो पुकळे, १२ जानेवारी २०२०.

राजमाता जिजाऊ जयंती अभिवादन

स्वत्व आणि स्वाभिमानाचे बाळकडू पाजून 'छत्रपति शिवराया' द्वारे मर्द मावळ्यांच्या साथीने हिंदुस्थानात राष्ट्रीय समाजाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना ४२२ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र जय मल्हार ..!



- आबासो पुकळे, १२ जानेवारी २०२०.

Saturday, January 11, 2020

साहित्यिक ना. धो. महानोर यांना धमकी


विलिंग्डन कॉलेजला १०० वर्ष पूर्ण

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयास १०० वर्ष पूर्ण झाली.



दिनांक २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेले डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि श्री. महादेव बल्लाळ नामजोशी या थोर राष्ट्रपुरूषांनी राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षण प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन १८८० साली पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व १८८४ साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. छत्रपती शाह महाराज हे संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते. छत्रपतींच्या पाठींब्याचा हा वारसा त्यांचे वंशज आजसुध्दा पुढे चालवीत आहेत. महाविद्यालयाने आजवरच्या ९९ वर्षांच्या वाटचालीत सहस्रावधी विद्यार्थी-विद्यार्थिनीना उत्कृष्ट अशा उच्च शिक्षणाची व त्यादारे आपले जीवन उजळून टाकण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. महाविद्यालयाच्या नामवंत माजी विद्यार्थ्यांमध्ये भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. बी. डी. जत्ती, पाँडेचेरी प्रदेशाचे माजी लेप्टनंट गव्हर्नर मा. बिडेश कुलकर्णी, माजी पर्यटन व नागरी विमान वहन मंत्री डॉ. सरोजिनी महिषी, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी अध्यक्ष व रोजगार हमी योजनेचेजनक कै. वि. स. पागे, 

माजी खासदार आबासाहेब कुलकर्णी, निवृत्त एअर चिफ मार्शल व्ही. व्ही. मालसे, प्रसिध्द साहित्यिक पद्मविभूषण पु. ल. देशपांडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर, इंटेल आर्किटेक्चरल ग्रुप, अमेरिका या संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उपेंद्र कुलकर्णी, सांगलीचे विद्यमान खासदार मा. संजयकाका पाटील तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक अधिकारी यांचा समावेश आहे. महाविद्यालयास भेटी दिलेल्या थोर व्यक्तींमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, नोबेल परोतोषिक विजेते डॉ. सी . व्ही.  रामण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री  यशवंतराव चव्हाण, माजी राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल अदि आहेत.

Saturday, January 4, 2020

१९७४ मध्ये ३ बहादूर मेंढपाळ राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपतींच्या हस्ते १९७४ मध्ये ३ बहादूर मेंढपाळ राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित

दिनांक १९ डिसेंबर १९७४ च्या मध्यरात्री २ वाजता श्री. जीवनजी देवासी, श्री सूरजमलजी देवासी आणि शैतानजी देवासी या तीन राजस्थानी मेंढपाळानी मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात मानगढ़ जंगलात लपुन बसलेल्या सशस्त्र डाकूंचा अड्डा उद्ध्वस्त करुन मुसक्या आवळल्या होत्या. म्हणून त्यांना दिनांक ९ एप्रिल १९७७ रोजी  राष्ट्रपति बी डी जत्ती यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित केले.



श्री जीवन, पुत्र श्री बिजा जी रेवाड़ी, ग्राम शेरगढ़, पुलिस चौकी मसूदा, जिला अजमेर, (राजस्थान) १९ दिसम्बर, १९७४ की रात को करीब २ बजे श्री बसना पूत्र मन्द्र राम रेवाड़ा, ग्राम वसना, जिला उदयपूर (राजस्थान) ने पुलिस चौकी मानगढ़, जिला सागर में रिपोर्ट की कि रात को तीन सशस्त्र डाकू आये और उन्होंने उसके तीन चरवाहे साथियो को उनके गाँव देवाल के कैम्प में पकड़ा और बन्दूक दिखाकर उनसे ५,००० रुपये को मांग की। जब उन्होंने अपनी असमर्थता व्यक्त की तो डाक उन्हें नजदीक के देवाल जंगल में ले गये। स्टेशन अफसर और अंचल निरीक्षक मौजूदा जवानों के साथ रैवाड़ियों (राजस्थान के भेड़ चरवाहे) के कैम्प में गये जहां उन्हें मालूम हुआ कि बदमाशों ने सूरजमल, जीवन और शैतान का अपहरण कर लिया है।

पुलिस दल जब देवाल गांव की ओर जा रहा था तो डाकुओं ने झाड़ियों के पीछे से उस पर गोली चलाई और तीनों व्यक्तियों को घसीटते हुए जंगल में भाग निकले। यद्यपि अपहृत व्यक्तियों को कैद किया गया था फिर भी उन्होंने अापस में डाकुओं पर काबू पाने और उनके हथियार छीनने की योजना बनाई। इस प्रकार ये तीनों व्यक्तितोनों डाकुनों पर झपटे, उन्होंने उनके हथियारों को छीना, उन्हें जमीन पर पटका और दिसम्बर की कड़ाके की
समय केवल शारीरिक बल से उन्हें चट्टानों और झाड़ियों पर पटकना शुरू कर दिया। डाकुओं के सिर और चेहरे पर चोटें आई। इस बीच अपहृत व्यक्तियों ने अपनी पगड़ियां उतार कर बदमाशों के हाथ बांधे और मदद के लिये अपने अन्य साथियों को आवाज दी । अन्य रैवाड़ियों के साथ पुलिस दल घटनास्थल पर पहुंचा
और उसने तीनों डाकूयों को उनके हथियार तथा गोलाबारूद सहित अपने कब्जे में ले लिया। इनमें से एक डाकू दो वर्षों से फरार था और उसकी गिरफ्तारी के लिये 1,000 रुपये का पुरस्कार रखा गया था।

इस कार्रवाई में श्री जीवन ने बड़ी सूझबूझ, कुशलता और अदम्य साहस का परिचय दिया

आज आप के सामने मै देवासी  समाज के तिन शूरवीरो के बारे में जानकारी प्रस्तुत कर  रहा हूँ !जरूर पढ़े और शेयर करे   श्री जीवन जी पुत्र श्री  बीजाराम जी देवासी ,श्री सूरजमल जी  देवासी पुत्र श्री बीजाराम जी देवासी गांव शेरगढ़ (मसूदा)अजमेर एंव  श्री शैतान जी देवासी  पुत्र श्री सरकार जी देवासी गांव  पालड़ी (आसीन) भीलवाड़ा ने  इनामी हत्यारबन्ध  #डाकुओं ने 5000 रूपये की फिरोती मांगी देवासियो ने  फिरोती देने से मना कर दिया तभ डाकुओ ने इन तीनो का  बन्दूको के बल पर अफरण कर लिया  जब पुलिस ने छुड़ाने की कोशिस की तो डाकुओ ने उन पर भी फायर खोल दिए ,  इन तीनो शुर वीरो को लगा की अभ इनको कोई नही बचा सकता हो उस सर्दी की ठंडी रात्रि को खुद ने ही अपनी सूझबूझ  से डाकुओ के हत्यार छीनकर  सिर्फ अपने शरीक बल से पिट पीटकर अधमरा करने के बाद अपने दूसरे साथियो और पुलिस को   बुलाकर गिरफ्तार करवाया उन डाकुओ में से एक डाकू पर 1000 रुपये की  इनामी राशि भी थी ये घटना 19 दिसम्बर 1974 मानगढ़ (सागर) मध्यप्रदेश की हे।।

1. इसलिए श्री जीवन जी  देवासी , श्री सूरजमल जी देवासी और शैतान जी देवासी को  भारत के आदरणीय  रास्ट्रपति  श्री बसप्पा दनप्पा जत्ती जीने सन्मानित किया।


Friday, January 3, 2020

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त विनम्र जय मल्हार !


‘शूद्रांना सांगण्याजोगा। आहे शिक्षणमार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व। पशुत्व हाटते पहा’ ‘विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तो मानती जन’‘उठा बंधूंनो अतिशूद्रांनो, जागे होऊन उठा परंपरेचि गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा बंधूंनो, शिकण्यासाठी उठा’-सवित्रीबाई फुले

विद्येची स्फूर्तिनायिका सावित्रिबाई फुले 


सवित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ चा. जन्मगांव सातारा जिल्ह्यातील नायगांव ता- खंडाळा होय. वयाच्या ९ व्या वर्षी १८४० मध्ये महात्मा फुले यांच्याशी विवाह झाला. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांना घरीच शिक्षण देऊन साक्षर बनविले. ज्यावेळी १८४८ ला पुण्यातल्या बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, त्यावेळी त्या शिक्षिका होत्या. पूर्णवेळ विनावेतन सेवाभावी वृत्तीने शाळेत त्या शिकवत. सनातनी वृत्तीच्या लोकांच्या टिकेला, विरोधाला, दगड शेणफेकिला न घबरता त्यांनी आपले अध्यापनाचे कार्य चालूच ठेवले. 



१८४८ ते १८५२ पर्यंत पुणे परिसरात २० शाळांची सुरुवात करुन आधुनिक भारताच्या इतिहासात अजोड़ असे कार्य करणारे फुले दांपत्य श्रेष्ठ आहे. खरी विद्येची देवता मानायची असेल तर ती सावित्रीबाई फुले होय. 
८ मार्च हा आतंरराष्ट्रीय महिला दिन पाळला जातो. मात्र ज्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे ब्राम्हण, बहुजन तळागळातील स्त्री मनुस्मृतिच्या अतिभयंकर जाचातुन सर्वकष गुलामीच्या बेड्या तोड़ू शकली. ज्या रुढि, परंपरानी स्त्रीला उपेक्षित ठेवले. त्यविरुद्ध पहिले बंड करुन ज्ञान देऊन बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या सावित्रीबाई फुले ग्रेट आहेत. 
सत्य हे महान असते व महानतेत सुंदरता असते. विद्येची स्फूर्तिनायिका क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले याच होय.  सत्य आणि खरा इतिहास ग्राह्य धरला पाहिजे.  आज प्रत्येक स्त्री केवळ सावित्रीबाईच्या सर्वागींण योगदानामुळेच विकसित होउ शकली. हा सत्य इतिहास कोणी विसरु शकत नाही. फक्त सावित्रीबाई फुले जयंती साजरी करुन समारंभापुरती मर्यादित न ठेवता सर्वसमावेशक विचार करुन फुले दांपत्याच्या मानवतावादी विचारांची चर्चासत्रे, परायणे घेऊन गावागावात, घराघरात पोहचवले पाहिजेत. विद्येची स्फूर्तिनायिका 'सरस्वती' नसून सावित्रीबाई याच आहेत असे ठणकावून सांगितले पाहिजे. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. 
विद्येच्या कल्पोकल्पित देवीने (सरस्वतीने) एकाही स्त्रीला शिक्षण दिले नाही. एकही शाळा काढली नाही व तिने शिक्षण दिले नाही. तीचे शिक्षण किती? हेही माहित नाही. मात्र धर्मवाद्यांच्या गौड़बंगालने तिला विद्येचा मुकूट घालून दिला.  याउलट, सावित्रीबाई नी संपूर्ण भारतीय स्त्रीला शिक्षणाच्या अलंकारने सुसंस्कृत सुशोभित केले.  एखादी स्त्री आज चार ओळी लिहू शकते.  हे सर्व कशामुळे साध्य झाले? तर स्त्री शक्तिमुळे आणि स्त्रीशक्ति कशामुळे वृधिंगत झाली तर स्त्री शिक्षणामुळे, शिक्षण कोणी दिले.  तर सवित्रीबाईंनी दिलेल्या योगदानामुळे स्त्री शक्तिचा सर्वांगीण विकास झाला. 'महात्मा जोतिबा फुले' आणि 'सावित्रीबाई फुले' यांनी भिडे वाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. सध्या या ऐतीहासिक वास्तुची दुरावस्था झाली आहे.  ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्याचे अद्यापही योग्य प्रकारे जतन होत नसून, भिडे वाड्याला लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे आणि त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हायलाच हवे.
- आबासो पुकळे, मुंबई 
३ जानेवारी २०२०.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...