Saturday, April 30, 2022

बाबा केरू प्रथम पुण्यस्मरण

 आण्णांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन..!



आण्णांचे शालेय शिक्षण झाले नव्हते, पण एखाद्या कसलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरला लाजवेल इतके तांत्रिक ज्ञान त्यांच्याकडे होते. गरिबीमुळे लहानपणी दुसऱ्याच्या घरी चाकरीने राहावे लागले. कष्टाच्या बुध्दीच्या जोरावर त्यांनी आपल्या घरच्या परिस्थितीला बदलवले होते. ऐन उमेदीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला. १९९० ते २००५ च्या काळात कुकुडवाड ते म्हसवड, दहीवडी पर्यंत बाबा पाटील नावाचे वादळ निर्माण झाले होते. त्यांच्या नावाचे तालुक्यात एक पर्व सुरू झाले. आण्णांना वादळी जीवन जगावे लागले. आर्थिक हानीलाही सामोरे जावं लागलं. त्यांच्या बुध्दीचातुर्याचा लोकांना हेवा वाटायचा. पडत्या काळात सर्वसामान्यांना केलेल्या मदतीमुळे जनसामान्यांच्या मनावर त्यांच्या आठवणी कोरल्या गेल्यात. इतक्या लवकर आण्णा आम्हाला सोडून जातील हे पचवणे जड जातय. आण्णांच्या अकाली निधनामुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...