Sunday, October 24, 2021

ब्राम्हणांना नावे ठेऊन काही होणार नाही, राष्ट्रीय समाज ब्राम्हणवादापासून लांब : सिद्धप्पा अक्कीसागर

ब्राम्हणांना नावे ठेऊन काही होणार नाही,  राष्ट्रीय समाज  ब्राम्हणवादापासून लांब : सिद्धप्पा अक्कीसागर

भारतीय राज्यघटनेस पुष्पांजली वाहत वंदन करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करताना श्री. सिद्धप्पा अक्कीसागर, के. प्रसन्नाकुमार, गोविंदराम शूरनर व अन्य.

महात्मा फुले कर्मभूमी पुण्यात राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनची बैठक व यशवंत नायक वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

पुणे : राष्ट्र भारती द्वारा, आबासो पुकळे

दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी श्रीरूप, शिवशंभोनगर भाग ३ अ, कात्रज-कोंढवा रोड कात्रज पुणे येथे राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनतर्फे यशवंत नायक वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यशवंत नायक २७ वर्षे पूर्ण करून २८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाची सुरवात महामानव डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित भारतीय राज्य घटनेचे पूजन व   राज्यघटना भेट देऊन झाली. पुढे राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनसाठी काम करणाऱ्या शासकीय व निमशासकीय, खाजगी कर्मचारी  बांधवांचा परिचय करून देण्यात आला व मनोगत कार्यक्रम पार पडला.

मार्गदर्शन करताना रासेफचे अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर
यावेळी रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सिद्धप्पा एल अक्कीसागर म्हणाले, येथे यशवंत नायक आणि रासेफ आहेत. यशवंत नायक वर्धापनदिनानिमित्त याठिकाणी आलो आहोत. मी येथे दापोडी गावच्या बाजूला फुगेवाडी येथे शाळेत गेलो. मध्यप्रदेशात जबलपूरला जन्म झाला. मला मराठी येत नव्हते, शाळेत  शिकायला मी खूप हुशार. चिकित्सा करण्यासाठी जिज्ञासा असली पाहिजे, स्टॅंडर्ड शिकायचे ठरवले. खडकीमध्ये हायस्कूलला शिकलो. त्यावेळेस मला माझी जात माहीत नव्हती. सर्व जाती धर्मात मिसळलो, त्यांच्या सहवासात वाढलो. भारत इतिहास संशोधन मंडळात गो. ह खरे यायचे.  तेथील लोकांनी राष्ट्रीय समाजाला भटकवण्यासाठी खूप लिहिले आहे. तेथे त्यांच्या विचाराने लिहिले आहे. त्यांचा संदर्भ घेऊन लोक लिहत आहेत. जगात ज्यू लोक संघटित आणि ऑर्गनाइज आहेत. ब्राह्मणांना शिव्या घालून, नावे ठेऊन काही होणार नाही.  लेखनातले तंत्र ज्यू आणि ब्राह्मण शिकले. जर्मनीत ज्यू लोकांचे राज्य होते. विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास असला पाहिजे. आपला राष्ट्रीय समाज ब्राह्मणवादापासून लांब आहे. छत्रपतीचे राज्य चांगले होते, पण त्यांच्याभोवती बालाजी विश्वनाथ आल्यापासून बदल होत गेला. १९५० च्या पेन्शनरची नावे काढा. त्या काळात शरद पवारांना मराठा समाजातून आयएसएस मिळाला नाही.  आपल्याला समाजात, कुटुंबात, समाजात जगता आले पाहिजे.  गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघ स्थापन केला. पुढे त्याची काँग्रेस बनली. 

यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्रातील संघटन होते. समीर पेंडाम यांनी घोड्याचे चित्र रेखाटले होते. ब्राह्मणाकडे डबल स्टॅण्डर्ड आहे. लोकांकडून फालतू गोष्टी सोशल मीडियात टाकल्या जातात. २४ एप्रिल १९८८ ला यशवंत सेना स्थापन झाली  तर १९९० ला चंद्रभागेच्या तीरावर विलीन झाली. पाण्यात राहून माशाशी वैर करून चालणार नाही. आपली नोकरी सांभाळून काम केले पाहिजे. महादेव जानकरांनी काशीराम असल्याचे सिद्ध केले आहे. २००९पर्यंत अभिमन्यू सारखा 'राष्ट्रीय समाज पक्ष' एकटा लढला.  नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. जगात असे कुठे घडले नाही, नोकरी सोडल्यानंतर एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आपली शक्ती किती मोठी आहे, हे मी जाणतो. ११ लोकांना घेऊन काशीराम यांनी ०४ राज्यात पार्टी यशस्वी केली.

शिक्षकांनी इतिहास भूगोल सोबत समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकवावा. राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान बनणार. जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. चार्वाक आणि बुद्ध ग्रेट माणसे आहेत. प्रत्येक माणसांमध्ये ऊर्जा आहे. आपल्याला सत्ता, संपत्ती सन्मानासाठी काम करायचेय. महामानव गौतम बुद्ध हा सर्वोत्तम माणूस आहे. महात्मा फुले यांच्या मार्गावरून बाबासाहेब आंबेडकर चालले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले. ज्यांचे कर्म चांगले त्यांचे फळही चांगले. ज्यांचे कर्म दगड ते दगडच राहणार. आपण धनगरवाड्याच्या बाहेर जायला पाहिजे. रासेफमध्ये ५० टक्के महिलांचा सहभाग हवा. रासेफमध्ये सर्वजाती धर्माच्या, प्रांताच्या लोकांना सहभागी करून घ्या. 

आपला माणूस शोधू नका, आपली संघटना शोधा कारण.. : प्रबोधनकार गोविंदराम शूरनर

मार्गदर्शन करताना प्रबोधनकार श्री. गोविंदराम शूरनर
श्री. शूरनर बैठकित मार्गदर्शन करताना म्हणाले, आपण काम करत आलो, पण कोणते काम?  करत आलो, याचा शोध घ्यावा लागेल. आमच्याकडे वाचन संस्कृती नाही. महात्मा फुले विचार स्वीकारले पाहिजे. नेटवर्क : 'नेट' म्हणजे जाळे, 'वर्क' म्हणजे काम. चार लोक असलेल्या अखिल भारतीय संघटना अलीकडे खूप वाढलेले आहेत. शालेय शिक्षण घेतलेले लोक 'पदवी'जीवी आणि 'पोट'जीवी बनलेले आहेत. संत गाडगेबाबा बुद्धीजिवी होते. बुध्दीजिविकडे समाजऋण फेडण्याची ताकद असली पाहिजे. 

समाजाच्या कल्याणासाठी समाजकार्य म्हणजे बुद्धिजीवी. सत्यशोधक बनायचे असेल तर 'फुलेवाद' वाचला पाहिजे. नकली भारतीय नाहीतर मला असली भारतीय बनायचे आहे, असे ठरवले पाहिजे. 'जय मल्हार' शब्द आम्हीच दिला. आपण जय भारत आहोत. 'बहाने'बाज समाज, 'गुलाम' समाज बनतो, 'गुलाम' समाज, 'लाचार' आणि 'विकाऊ' समाज बनतो. भावनिक कार्यकर्ता टिकू शकत नाही. त्याची गणना आयाराम गयाराममध्ये होते. आम्ही 'जोश'मध्ये राहतो. 'होश'मध्ये राहणारा कार्यकर्ता हारत नाही. बुद्धीला धार दिली पाहिजे. बुद्धीला धार द्यायची असेल, तर वाचलं पाहिजे. आरएसएस एका 'शब्दा'वर काम करते. त्यावरून 'देशावर राज्य' करते. वाचन संस्कृतीचा मुलगा अधिकारी बनतो. 'आपला माणूस शोधू नका, आपली संघटना शोधा, आपला माणूस शत्रुपक्षात असतो आणि त्यात आपण बळी जातो'. आपल्याला एकसघं विचार करायचा आहे, टीकाऊ समाज बनला पाहिजे, विकाऊ समाज नव्हे. 'संघटना मोठी असेल, तर नेता मोठा होत असतो'.  तुम्हाला समाजाला मोठे करायचे असेल, तर इमानइतबारे काम करावे लागेल.  '२०२४' ला आमची सत्ता आली पाहिजे, नाही आली तर, आमच्या इशारावर चालली पाहिजे. मी यशवंतसेना ते रासपपर्यंत संघटनेत वाहून घेतलं. मी माझं काम करत राहिलो, बोलघेवड्या लोकाकडे लक्ष दिले नाही. शिकलेले लोक लिहीत नाही, पण मी मात्र लिहिता झालो, अनेक पुस्तके लिहिली प्रबोधनाची.  श्री. शूरनर यांनी उपसथितांसमोर यशवंत नायकचे दैनिक व्हावे, यासाठी आकडेमोड करणारे गणित मांडले.

या बैठकीत अन्य मान्यवरांनी व्यक्त केलेले मत पुढीप्रमाणे...

श्री. सतीश नाजरकर : बुद्धिजीवी वर्ग या राष्ट्राचा पाया बनला पाहिजे.  संघटनेशिवाय या देशात काहीही घडणार नाही. ४० च्या आतील लोकांना रासेफमध्ये जोडायचे आहे. आमची संघटना लेचीपेची असणार नाही. रासेफचे संघटन सत्य आणि असत्य ओळखून, 'सत्या'च्या बाजूने लढणारे असेल.

सौ. पूनम राजगे ताई : आज आमच्या घरी अक्कीसागर साहेब व सर्वांचे स्वागत. आमच्या घरी ज्ञानी लोक आले. ज्ञानी लोकांना आमच्या परिवाराचे सहकार्य लाभेल. रासेफचे चांगले सामाजिक काम आहे. आम्हाला पुस्तकांची भेट दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद.


श्री. संभाजी हुलगे : मुंबईच्या ऑफिसमधून यशवंत नायकचे कार्यालय बाहेर काढा. यशवंत नायकचे सभासद वाढवावे, अन्यथा यशवंत नायकचे दैनिकाचे स्वप्न अधुरे राहील. अक्कीसागर साहेबांना रासेफचे काम करू द्या.

श्री. राजेंद्र कोकरे : आपण विचारांचे प्रचारक आहोत. यशवंत नायक आपला नायक आहे. कार्यक्रम राबवताना सर्वांनी मिळून खर्च केला पाहिजे.

श्री. संतोष कोकरे : रासेफच्या माध्यमातून यशवंत नायकला मदत करायची. यशवंत नायकमुळे आपला वाचक वर्ग तयार झाला. यशवंत नायक वर्धानदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.

श्री. कालिदास गाढवे : आताच्या पिढीला चळवळ माहीत नाही. गावात आता पुढाऱ्याच फार चालत नाही. व्यक्तीला कालमर्यादा असते, विचारला कालमर्यादा नसते.

श्री.महावीर सरक : रासेफला आर्थिक मदत करावी. आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लोकांनी राज्यघटनेतील किमान मूलभूत हक्क वाचले तर कोणताही माणूस निर्भयपने जगू शकतो.

श्री. पी. बी. पांढरे : आजचा कार्यक्रम म्हणजे ज्योत स्नेहाची आणि प्रेमाची उजाळत आहे. नव्यानेच मी रासेफमध्ये कामाला सुरुवात केली आहे.






बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. एस एल अक्कीसागर साहेब- राष्ट्रीय अध्यक्ष रासेफ, उद्धघाटक के. प्रसन्नाकुमार (केरळ), थोर विचारवंत, प्रबोधनकार श्री. गोविंदराम शूरनर-सल्लागार रासेफ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचलन रासेफचे सचिव श्री. जयसिंग राजगे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री. भिवा राजगे सर यांच्या परिवारातर्फे हॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. या बैठकीत राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष एस. एन. नाजरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर रासेफचे सहसचिव पी. बी. पांढरे यांनी आभार मानले. यावेळी अप्पासाहेब जानकर, श्री. मदनेश्वर शूरनर, श्री. शहाजी भाळे, श्री. नितीन शेंडगे, श्री. किरणराव सोनवलकर,  श्री. संजय येलवांते, श्री. डी. आर. गडदे, हनुमंत भिसे, श्री. जे. एस. राजगे, कुमार शरद दडस, श्री. अण्णासाहेब अनुसे व अन्य ४०हून अधिक कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यावेळी पुस्तके विक्रीस उपलब्ध होती.

Friday, October 22, 2021

माणचे पंधरा सुपूत्र देशसेवेसाठी शहीद

 माणचे पंधरा सुपूत्र देशसेवेसाठी शहीद



भारत मातेची सेवा करत असताना माण तालुक्यातीचे शहीद सचिन काटे यांच्यासह आजवर पंधरा सुपूत्र शहीद झाले असून शहीद सचिन काटे यांच्या अगोदर झालेले पंधरा शहिद जवान


१) नामदेव देवकर ( मोही ) 

२) सोपान जगदाळे (शिरवली)  

३) सदाशिव जगदाळे (बिदाल) 

४) श्रीपती खाडे (पळशी) 

५) शिवाजी जगदाळे (बिदाल)  

६) गजानन वाघमारे (राणंद) 

७) आनंदराव पिसाळ (स्वुरुपखानवाडी) 

८) सलीम हवालदार (दहिवडी)  

९) अर्जुन माळवे (पळशी) 

१०) दिनकर नाळे (दहिवडी) 

११) निलेश जाधव (लोधवडे)  

१२) दत्तात्रय सत्रे (सत्रेवाडी) 

१३) सुनिल सुर्यवंशी (मस्करवाडी)

१४) चंद्रकांत गंलडे (जाशी)

१५) सचिन काटे (मोही) 


हे पंधरा जवान शहीद झाले आहेत. या सर्व शहीद जवानांचे बलीदान कदापी व्यर्थ जाणार नाहीत. माण तालूक्याला तालुक्यातील तरुणाईला कायम देशसेवेची , राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणार आहे.

           *देशाच्या रक्षणासाठी शहिद जवान सचिन काटे यांच्या पुर्वी सन २०१६ साली माणच्या दोन सुपूत्रांनी बलिदान दिले. दि.६ फेब्रुवारी २०१६ रोजी मस्करवाडीचा शहीद जवान सुनील सुर्यवंशी हा सियाचीन येथे तैनात असताना हिमस्खलनात कामी आला , तर दि.१८ सप्टेंबर २०१६ रोजी जाशी येथील शहीद जवान चंद्रकांत गंलडे हे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झाले*.

भटके विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षनासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने कोकण विभागीय आुक्तांकडे सोपवले निवेदन

भटके विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षनासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने कोकण विभागीय आुक्तांकडे सोपवले निवेदन

कोकण विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांना निवेदन सादर करताना कोकण रासप प्रांत प्रभारी श्री. भगवान ढेबे, सौ. मनीषाताई ठाकूर, श्री. मुकेश भगत

बेलापूर : राष्ट्र भारती द्वारा

भटके विमुक्तांच्या  पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तात्काळ दुरुस्ती करावी व पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात प्रलंबित याचिका क्रमांक 38306/2017 च्या दिनांक 21/10/ 2021च्या सुनावणीसाठी निष्णात व ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कोकण विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी कोकण रासपचे अध्यक्ष श्री. भगवानराव ढेबे, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. मनिषाताई ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष श्री मुकेश भगत, श्रीरंग वळकुंडे, श्री.नंदकुमार बंडगर, श्री. सुदाम कचरे व अन्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, भटके विमुक्त विमुक्तांचे आरक्षण संदर्भात  मा. सर्वोच्च न्यायालयात दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले असुन, त्यात भटके विमुक्तांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे असंविधानिक आहे, असे नमूद केले आहे.  महाराष्ट्र शासनाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अतिशय घातक असुन, भटक्या-विमुक्तांना सामाजिक जीवनातून  पूर्णपणे उठविण्याचा प्रयत्न आहे. भटके-विमुक्त प्रवर्गाला पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे असंवैधानिक आहे, ही शासनाची भूमिका म्हणजे भटके विमुक्तांचे सगळेच आरक्षण संपविन्याचा प्रयत्न आहे, की काय? या चिंतेने संपूर्ण भटके विमुक्तांना ग्रासले आहे. भटक्या विमुक्तांचे आरक्षण नष्ट करण्याचा हा शासनाचा कट तर नाही ना अशी चिंता महाराष्ट्रातील तमाम विमुक्त भटक्या समाजाला सतावत आहे. 

महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मा.सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली  quantifible data सादर करण्यासाठी समिती गठित केली होती. या समितीने  कार्यक्षेत्राबाहेर जाऊन भटक्या विमूक्तांचे आरक्षण अंसविधानिक असल्याचे म्हटले आहे. या समितीला असा निर्णय घेण्याचा अधिकार नसतांना या समितीने कार्यक्षेत्राबाहेर जाऊन बेकायदेशीर निर्णय घेतला आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर पणे एका समाजाला खूष करण्यासाठी मागासवर्गियांचे पदोन्नतीतील 33% आरक्षण दिनांक 7/5/2021च्या शासन निर्णयानुसार रद्द करुन पदोन्नतीची रिक्तपदे खुल्या प्रवर्गातून भरणे सुरु करुन मागासवर्गियांचे संविधानिक हक्क डावलले आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ उद्देशालाच तिलांजली देण्याचा प्रकार याद्वारे शासनाकडून होतांना दिसतो आहे. असा कोणताही प्रकार भटक्या विमुक्तांकडून खपवून घेतला जाणार नाही.

आपण वेळीच दखल घेऊन विमुक्त भटक्यांच्या पदोन्नतीतील आरक्षण संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आवश्यक ती दुरुस्ती करून, भटके विमुक्तांचे पदोन्नतीतील आरक्षण कायम कसे राहील याची तजवीज करावी, अन्यथा या जमातीकडे लढण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही याची जाणीव ठेवावी. त्यामुळे या प्रतिज्ञापत्रात तात्काळ आवश्यक ती दुरुस्ती करावी व २१ ऑक्टोबर २१ च्या आत मा. सर्वोच्च न्यायालयात दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच प्रलंबित याचिका क्र.28306/2017 या  याचिकेच्या दि, 21/10/2021च्या अंतिम सुनावणीसाठी तिन निष्णात वकीलांची नियुक्ती करावी व मागासवर्गियांना न्याय द्यावा.

10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची संधी

10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृध्दी खाते उघडण्याची संधी

सातारा : सातारा डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयतनशील आहे. सातारा पोस्ट ऑफिसद्वारे आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी  मुलींचे “सुकन्या समृध्दी खाते” उघडण्यासाठी  विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या गावापर्यंत पाहोचून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व मुलींचे सुकन्या समृध्दी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे डाक विभागाच्या प्रमुख अपराजिता म्रिधा यांनी सांगितले. 

  भारत सरकार मार्फत उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली व सर्वात जास्त व्याजदर असणारी ही योजना आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गैर सरकारी संस्था, खाजगी संस्था पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व 10 वर्षाखालील मुलींचे सुकन्या खाते उघडु शकतात. सुकन्या समृध्दी  या योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हेल्प लाईन नं. 8275700654 असुन अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट आफिसमध्ये संपर्क करावा असेही श्रीमती म्रिधा यांनी सांगितले. 


ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट

ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट

ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळासोबत साधला संवाद

मुंबई, २१ ऑक्टोबर

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची अखिल भारतीय ओबीसी कामगार महासंघाचे महासचिव जी. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली. 

या शिष्टमंडळामध्ये एअर इंडिया ओबीसी असोसिएशनचे अध्यक्ष आणि ,ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनचे सचिव प्रदीप ढोबळे, युनियन बँक ऑफ इंडिया ओबीसी असोसिएशनचे विवेक कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी देखील उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांचे शासकीय निवासस्थान रामटेक याठिकाणी झालेल्या या भेटीत ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने श्री भुजबळ यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले. यामध्ये यामध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी, आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकणे,  क्रीमी लेयरची अट काढून टाकणे अश्या काही प्रमुख मागण्या होत्या. यामध्ये तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार हे विविध पातळ्यांवर आपली लढाई लढत आहे त्यामुळे या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे राज्य सरकार आहे. आपण या गोष्टींसाठी योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांना  तामिळनाडूच्या आरक्षणा संदर्भातील  "69% आरक्षण कायदा" हे पुस्तक भेट दिले.

Saturday, October 9, 2021

अहमदाबाद गुजरात मे शेफर्ड इंडिया इंटरनेशनल का 06 वा वार्षिक समेलन संपन्न

अहमदाबाद गुजरात मे शेफर्ड इंडिया इंटरनेशनल का 06 वा  वार्षिक समेलन  संपन्न

अहमदाबाद - गुजरात : यशवंत नायक ब्यूरो

गांधी जयंती के अवसरपर 2 अक्तूबर के दिन अहमदाबाद गुजरात मे शेफर्ड इंडिया इंटरनेशनल का 06 वा वार्षिक समेलन हर्षोल्लास से  संपन्न हुआ। इस संमेलन में राष्ट्रीय व प्रांतीय शेफर्ड समाज तथा  सामाजिक तथा राजनीतिक पार्टियों के नेताओ ने शिरकत की। 












शेफर्ड इंडिया इंटरनेशनल  के संस्थापक अध्यक्ष श्री एच  विश्वनाथ जी, सांसद डॉ. श्री विकास महात्मे, श्री एच एम रेवन्ना - पूर्व मंत्री कर्नाटक, कर्नाटक विधायक श्री बंडाप्पा काशेम्पूर, श्री लालजी भाई  देसाई CWC Member, श्री लखाभाई भरवाड़, श्री जेठाभाई भरवाड - डिप्टी स्पीकर , श्री राजकुमार पाल विधायक  प्रतापगढ उत्तर प्रदेश, सागर जी रायक्का (भूतपूर्व सांसद), श्री हरीभाई जी भरवाड अध्यक्ष शेफर्ड इंडिया इंटरनेशनल गुजरात, राष्ट्रीय समाज पार्टी के पूर्व अध्यक्ष तथा संस्थापक (एसआईआय) श्री एस एल अक्कीसागर जी, श्री ब्रह्म प्रकाश पल, श्री राजेंड पाल हरियाणा, श्री श्रावण वाकसे महाराष्ट्र, भगतसिंह बघेल उत्तर प्रदेश, गणेश जी हाके भाजपा प्रवक्ता महाराष्ट,  निहारिका खोंडले, श्रीमती ज्येष्ट सामाजिक नेता गुंडेराव  बनसोडे, शिक्षा क्षेत्र महानुभाव श्री हुलिनायकर, श्री उधगई सेनगुत्तवन तमिलनाडु, श्री वेदप्रकाश जी, वीरभद्रय्या जी,  जेष्ठ पत्रकार श्री गोविंदाभाई रबारी, रासपा पूर्व राष्टीय महासचिव श्री कुमार सुशील, श्री सूरज हेगड़े, निति अवोग के अधिकारी डॉ मुनिराज, श्री शिवराय जोगिन,  तथा अन्य महानुभाव की प्रमुख उपस्थिति थी.  राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिलनाडु, तेलंगाना, आंध्र प्रदेश राज्य के शेफर्ड प्रतिनिधि आए थे. श्री सागर रायकाजी ने स्वागत किया, श्री. विश्वनाथजी ने प्रस्तावना रखी. श्री अक्कीसागर, श्री लालजीभाई, श्री काशेमपुर, श्री जेठाभाई, श्री हाके जी, श्री महात्मे जी, श्री महंत जी ने विचार रखे. संघटन की ओरसे भारत सरकार को निवेदन हेतु अनेक प्रस्ताव मंजूर किये गए । शेफर्ड समाज के लिए कमीशन का गठन,  जाती जनगणना, चारण जमीन आबंटन, आर्थिक विकास व व्यापार ये प्रमुख थे। शेफर्ड समाज के अनेक संग़ठन के प्रतिनिधि उपस्थित थे। गुजारात पाल महासभा के नेमसिंह बघेल, सदाशिव पाल, रविकांत बघेल, रामबचन पाल अन्य जनगण उपस्थित थे।

चारण जमीन और शेफर्डस इंडिया इंटरनेशनल

गांधी जयंती के अवसरपर 2 अक्तूबर के दिन अहमदाबाद मे (Shepherds India  internationa)l शेफर्डस इंडिया इंटरनेशनल का छठा स्थापना दिवस पर संमेलन सभा संपन्न हुआ।  एक समाज, एक झंडा,  एक अजेन्डा और एक प्रतीक -आदर्श को लेकर  संपूर्ण भारत की शेफर्ड कम्युनिटी को एक छत्र तले *(Umbrella)* लाने की कोशिश की जा रही है। संस्थापक अध्यक्ष श्री एच. विश्वनाथ - भूतपूर्व मंत्री कर्नाटक  के नेतृत्व में ये संगठन कार्य कर रहा है।  एच. एम. रेवण्णा जी (भूतपूर्व मंत्री कर्नाटक), सागर जी रायक्का (भूतपूर्व सांसद), हरीभाईजी भरवाड अध्यक्ष गुजरात तथा अन्य राज्यों के प्रतिनिधि शामिल इस सभा मे थे। संस्थापक सदस्य के नाते मैं भी उपस्थित था। अपनी बात भी मैंने वहा रखी। इस मीटिंग की रिपोर्ट भी सलग्न है। इस मीटिंग में कुछ प्रस्ताव केंद्र तथा राज्य सरकार को निवेदन - मांग स्वरूप देने के लिए मंजूर किए गए। जिसमे पशुपालन और पशुपालक  के लिए चारण जमीन - गोचर जमीन को आरक्षित रखने का प्रस्ताव भी मंजूर हुआ। गोचर जमीन को लेकर एक बड़ा आंदोलन देश मे होता रहा है । गुजरात इसमें अग्रेसर रहा है। गौचर - गुर्जरों की भूमि के रूप में गुजरात को जाना पहेचाना जाता है। गुजरात  गुजरात तथा देश मे महारानी अहिल्याबाई होल्कर के राज से या,  कहे तो कृष्ण काल से चारण जमीन पशुपालक के लिए आरक्षित रहा है। शायद इसलिए *सब भूमि गोपाल की* ऐसा कहा जाता है। मुम्बई हाईकोर्ट में वकील रहे स्वर्गीय मगनभाई रबारी तथा राजस्थान के श्री उमेदसिंग रबारी इनका बहोत बडा योगदान इस क्षेत्र में रहा है। पत्रिका यशवंत नायक जुलाई 2005 मे कुमार सुदर्शन लिखित  *गुजरात मध्ये गैचर बचाओ आंदोलन* और जुलाई 2007 मे एस एल अक्कीसागर लिखित *गायरान विना गोरक्षण कसे होणार ?* ये 2 न्यूज साथ मे भेज रहे है। जिनके द्वारा गोचर बचाओ आन्दोलन को किस तरह इस देश की सरकार ने रोन्ध डाला, ये हम देख सकते है समझ सकते है। शिमोगा में आयोजित गौमाता कार्यक्रम को हमारे मित्र स्व. मगनभाई रबारी गए थे, जिनको हमारे मित्र डॉ जे पी बघेल गौचर आंदोलन के भीष्म पितामह मानते है। उस सभा मे बोलने का मौका उन्हे दिया नही गया, तो उन्होंने स्वयम पत्रकर परिषद बुलाकर अपनी बात को रखा। अनेक कन्नड़ पत्रिकाओं में उसके समाचार आये। मैंने उसका मराठी अनुवाद कर के अपनी पत्रिका यशवंत नायक में डाला। कृपया उसे पढ़े। उसमे स्व. मगनभाई कहते है की शिमोगा के गौमाता बचाओ कार्यक्रम में एक भी गोपालक नहीं था। देश की सारी जमीन कॉर्पोरेट सेक्टर के पूंजीपतियों के कब्जे में दे गई हैं। विदेश को मांस सप्लाय करने वाले, देश के 10 बडे व्यापारियों में एक भी मुस्लिम नही है, ये बात मुझे उमेदसिंग रबारी बता रहे थे। शेफर्ड समाज के राजनेता तथा समाजसेवी चोला पहने हुए नेताओं पर रोष जताते हुये उमेदसिंग जी मुझे निराश और चिंतित लगे। शेफर्डस इंडिया इंटरनेशनल ने पहल किया है। लालजीभाई देसाई का इस क्षेत्र में देश - विदेश में काम हो रहा है, आप बता रहे थे। तब मुझे स्वर्गीय मगनभाई रबारी की याद आयी।
इस माध्यम से उनके स्मृति को श्राद्धसुमन अर्पण करते इस पोस्ट को आप से शेअर कर रहा हूं। उसे पढ़े, फॉरवर्ड करे उसपर चर्चा करें, जागृत बने। इसी उम्मीद के साथ....
*शेफर्डस जागो !*
*पशुपालक जागो !!*

एस एल अक्कीसागर
सदस्य, शेफर्डस इंडिया इंटरनेशनल


चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...