Wednesday, September 25, 2019

माणदेशाला पाऊसाने झोडपले.

३ वर्षानंतर माणदेशाला सर्वदूर पाऊसाने झोडपले.

दुथडी भरुन वाहणारे माणगंगा नदीचे पात्र

ऐन पाऊसाळ्यात माण तालुक्यात ८ गावे व ४२ वाड्यावस्त्यांवर शासकिय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. काही भागात शेतकर्‍यांची जनावरे छावणीवर होती.  तर काही पशुपालक मेंढपाळ गावाकडे परतले नव्हते. 'आज येईल, उद्या येईल' या पावसाच्या प्रतीक्षेवर आस लावून बसलेल्या माणदेशी जनतेला पावसाने सतत हुलकावणीच दिली. पूर्ण गणेशोत्सव कोरडा गेल्याने दुष्काळाचे ढग गडद होऊ लागले होते. मात्र, गत आठवडाभरापासून माणच्या पूर्वेकडे म्हसवडसह परिसरात पावसाने सुरवात केली. त्यानंतर हा पाऊस गोंदवले, दहिवडी, मलवडी असा पश्‍चिमेकडे सरकला. काल मंगळवारी मध्यरात्री ११ पासून मेघराजाने माणदेशात बरसायला सुरुवात केली अन्, तो पहाटे ३. ३० वाजताच  थांबला. रात्रीचा पाऊस माण तालुक्यात सर्वदूर झाला. दहिवडी, मलवडी, सत्रेवाडी, कुकुडवाड, पुकळेवाडी, विरळी, म्हसवड, भाटकी, वरकुटे मलवडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. कुळकजाई ता- माण येथील सितामाईच्या डोंगरात उगम पावणाऱ्या फलटणमधील बाणगंगा आणि माण तालुक्यातील माणगंगा नदीचे पात्र भरुन वाहु लागलेय. खटाव तालुक्यात येरळा नदीचे पात्र पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे. काल मंगळवारी रात्रीनंतर फलटण आणि माण, खटाव तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. परतीच्या पावसामुळे दुष्काळी भागातील बळीराजाला काहीसा दिलासा मिळालाय. कायम दुष्काळी भाग असलेल्या या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय.  रात्रीपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातल्या लोकांना दिलासा मिळालाय.

म्हसवड बसथानकासमोर ढालेमामा  कॉम्पलेक्स च्या तळघरात शिरलेले पाणी

 माणगंगा नदीला पूर आल्यानंतर नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुळकोटी येथील महिलांनी या पाण्याची पूजा करून ओटी भरली. तर दिवड येथील म्हसोबा मंदिरातही पाणी शिरले असून देव ही पाण्यात आहेत. माण तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कुळकजाई ते राजेवाडी असा या नदीचा प्रवाह माण तालुक्यात असून, या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे सुमारे २० बंधारे आहेत. शिरताव गावाच्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय. तर कुकुडवाड - कारंडेवाडी दरम्यान येणाऱ्या भाकरेवाडी पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतुक थांबली होती. जोरदारपणे बरसलेल्या पाऊसामुळे शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. शेतात बांधलेल्या मोठमोठया तालींची पडझडही झाली आहे. पुकळेवाडी सारख्या गावात असा पाऊस ७० वर्षानंतर पहिल्यांदाच झाला आहे, तर काही वयोवृद्ध नागरिक म्हणाले आसा पाऊस झालेला आयुष्पायात पाहिलाच नाही. मध्यरात्रीच्या पाऊसाने  पुकळेवाडीचा तलाव पूर्णक्षमतेने भरुन वाहिला तर श्रमदानावेळी तलावालाची खोली वाढवताना निघालेला गाळ हा तलावाच्या भरावाच्यापाठिमागे टाकलेला होता.  तो गाळ आता वाहून गेला आहे. तर गावाला पाणीपुरवठा करणारी कुपनलिका या गाळात बुजली आहे. तलावाकाठी शेतजमिन असणार्‍या शिवाजी जोतिराम पुकळे यांच्या रानातील माती वाहिल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. भराव भरुन चढावर घर बांधण्याच्या स्पर्धेमुळे गावात कमी उंचीचा पाया असलेल्या बांधवांच्या घरात डोंगरावरुन  आलेला पाण्याचा लोंढा थेट घरात शिरल्याने धान्य तसेच संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. पुकळेवाडी परिसरातील सर्व ओढे, नाले, ओहोळ प्रवाहित झाले आहेत. पुकळेवाडी रस्त्याला जोडणारा  व शेळकेवस्तीला जाणारा पुल वाहून गेल्याने काही काळ रहदारी खंडीत झाली. कुकुडवाडमध्येही पाऊसाने चांगलेच झोडपले आहे.

माणदेशाला वॉटर कप स्पर्धेचा फायदा...
गेल्या तीन वर्षांत माण तालुक्यामध्ये वॉटर कप स्पर्धेचे मोठे काम झाले आहे. गाव शिवार, माळरानावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. त्यातच आता दोन वर्षांनंतर चांगला पाऊस बरसत असल्याने डीपसीसीटी, नालाबांध, बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा शेतीसाठी फायदा होणार आहे.

पुकळेवाडी तलाव

पुकळेवाडी 

माणगंगा नदी
पुकळेवाडी 



माणगंगा नदी 


पुकळेवाडी 
पुकळेवाडी 

पुकळेवाडी 

पुकळेवाडी 


माणदेशाच्या सिमेवर असणारे  शैक्षणिक केंद्र देवापुरातील विद्यालयास सुट्टी देण्यात आली.

शेतीचे नुकसान 
चीरनाळ अर्थात शिर नावाच्या शिवारात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.



मेंढपाळांच्या मुलखातील मरणवाटा


  • भारत हा पशुपालकांचा देश आहे. मेंढपाळांच्या जीवनात घडलेल्या घटनांचा, दैनिकांत, समाज माध्यमातून व प्रत्यक्ष पाहिलेलेल्या घटनांचा, माहितीचा संग्रह करण्याचा प्रयत्न केला आहे. मेंढपाळ सर्वांना माहित आहे, परंतु मेंढपाळांना प्रत्यक्ष रानामाळात भटकाताना ज्या मरण यातना भोगाव्या लागतात याबद्दल फारसे कोणी बोलत नाही.  मेंढपाळ आपल्या मेंढ्यासह मुळगावातून चारा-पाणी शोधत स्थंलातंर करत असतो. खरेतर मेंढपाळ ज्या प्रदेशात जातो, तो त्यांचा मुलुख असतो. माझ्या लहाणपणी घरी मेंढरं होती. पुढे मेंढर विकून वडिल गावीच शेती करु लागले. परंतु गावातील कित्येक कुटुंबे मेंढपाळ व्यवसायामुळे विस्थापित होताना डोळ्यांदेखत पाहत होतो. मेंढपाळांना परमुलूखात माणसातील पशुंचा खुप त्रास सहन करावा लागतो. कित्येक मेंढपाळांना जायबंदी व्हावे लागले. नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो.  कुठेना कुठे रोज  ह्रदयद्रावक घटना घडत असतात पण ९९ % घटनांची नोंदच होत नाही. दखल घेतली जात नाही. आपला प्रदेश सोडून जगण्यासाठी परमुलखात गेलेल्या मेंढपाळांच्या मुलखात मरण यातना सहन कराव्या लागतात. अशाच काहि घटना मेंढपाळांच्या मुलखातील मरणवाटा याद्वारे वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी देत आहे,  मेंढपाळांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे हा मुख्य हेतु आहे.  वाचकांनी प्रतिक्रिया जरुर लिहाव्यात.

- आबासो पुकळे.


Sunday, September 22, 2019

भारतातील मेंढपाळ संबधी बातम्या, पत्रके, फोटो, प्रसंग.

भारतातील






























दुष्काळी स्थितीत कुटुंबासह भटकंती करणाºया एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतातील पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. ही घटना  वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शिवारात घडली. सिंधू सुभाष कोरडकर, असे बाळाला जन्म देणा-या मातेचे नाव  आहे.



१२ ऑगस्ट २०१९  मेंढपाळास मारहाण, रासपचा सोलापुर महामर्गावर रास्ता रोको
#अमानुष_कृत्याचा_जाहीर_निषेध
 इंदापुर शहरा नजीक मेंढपाळ बापू रामा मदने व त्यांची पत्नी बायडाबाय बापू मदने या दोघांना अमानुष हाणमार करण्यात आली आहे ,इंदापुर नगरपरिषद चे कॉग्रेस चे नगरसेवक जावेद शेख  यांनी ही मारहाण केली आहे  , मारहाण इतकी भयानक आहे की मेंढपाळ हा अजुन हि बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना पुणे जिल्हा उप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ,
आणि याची रितसर तक्रार इंदापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे 
 इंदापुर तालुका रासप याच्या कडून सोलापूर हायवे अडवुन रास्ता रोको  करण्यात आला आहे ,आहे तरी अमानुष मारहाण करणारा नगरसेवक शेख याच्यावर कडक कारवाई झाली नाही तर इंदापुर तालुका रासप मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करणार अशी माहिती किरण गोफणे रासप पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,सतीश शिंगाडे तालुका अध्यक्ष रासप ,जोतिराम गावडे पाटील रासप युवक तालुका अध्यक्ष, अभिजीत भाळे रासप इंदापुर तालुका कार्य अध्यक्ष हे घटना ठिकाणी उपस्तितीत राहून मदत कार्य करत आहेत





चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...