Tuesday, June 18, 2019

लढा टेंभूच्या पाण्याचा पुकळेवाडी ग्रामस्थांचा

टेंभू योजनेचे पाणी द्या ; अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार : पुकळेवाडी ग्रामस्थ 
टेंभू योजनेतून पाणी मिळावे यासाठी एकवटलेले पुकळेवाडी ग्रामस्थ.


पुकळेवाडी ग्रामस्थांच्यावतीने दि. १५ जून २०१९ रोजी टेंभू योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी श्री. सिध्दनाथ मंदिरासमोर ग्रामसभेचे आयोजन केले होते. जोपर्यंत टेंभू योजनेचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या ठराव पुकळेवाडी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पुकळेवाडी गावामध्ये पुकळेवाडी व शेळकेवस्तीसह  इतर छोट्या मोठ्या वस्त्या आहेत. पुकळेवाडी ग‍ावात पशुपालकांची संख्या मोठी असून, सततच्या दुष्काळामुळे येथील मेंढपाळांनी चारा पाण्याच्या शोधात स्थलांतर केले आहे. गेली सलग तीन वर्षापासून गावास शासकिय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दक्षिण माण मधिल पुकळेवाडी, मानेवाडी, कुकुडवाड, शिवाजीनगर, भाकरेवाडी, कारंडेवाडी, धनवडेवाडी, मस्करवाडी, नंदीनगर व आगासवाडी या वाड्यांनी एकत्र येत दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचा लढा उभा केला आहे. पाणी मिळावे यासाठी विविध गावात ग्रामसभा घेण्यात येत आहेत. टेंभूचे पाणी पिण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा निर्धार पुकळेवाडी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.
पुकळेवाडी परिसरातील भौगोलिक व ऐतिहासिक स्थान दर्शवणारी खुण.

पुकळेवाडी परिसरातील भौगोलिक व ऐतिहासिक स्थान दर्शवणारी खुण.
पुकळेवाडी परिसरात डोंगर रागांनी तयार झालेली नैसर्गिक द्रोणी.
टेंभू योजनेचे पाणी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी व विरळी परिसरात पोहचले आहे. तसेच उरमोडी योजनेचे पाणी कुकुडवाडपासून १३०० मीटर अंतरावरून प्रवाहित झाले आहे. परंतु कुकुडवाड व परिसरातील इतर वाड्या  पाण्यापासून वंचित राहिल्या असून, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.  त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी कुकुडवाड परिसरात सोडण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षापासून येथील नागरिकांमधून होत आहे.आगामी काळात पाण्याच्या लढा अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

"बंदिस्त पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेचे पाणी जिरे पठारावर भवानी मंदिरापर्यंत आणून ते पाणी कुकुडवाड परिसर व कलेढोण परिसरातील गावांना उपलब्ध करुन देण्यात यावे"
- महादेव पुकळे, ग्रामस्थ पुकळेवाडी.





दुष्काळामुळे घोड्याच्या पाठीवर संसार लादून स्थालंतर करताना मेंढपाळ कुटुंब.

पाण्याअभावी वाळून गेलेले पीक, बाटकाची वैरण.

शेळ्या मेंढ्यांना चारा नसल्याने बाभळीच्या झाडाचा पाला पाडताना मेंढपाळ. 


दिनांक २६ऑगस्ट २०१८ रोजी पुकळेवाडीच्या  शिवारात पाण्याचा तळ गाठलेली विहिर



-आबासो पुकळे, १८-०६-२०१९

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...