Friday, June 7, 2019

सत्यशोधक, दंडनायक संत कनकदास

संत कनकदास जयंती दिना’निमित्त...

राष्ट्रीय समाजातील एका महान पण दुर्लक्षित असलेल्या / ठेवलेल्या संत कनकदासांची जयंती आज सोमवार दि.06/11/2017  रोजी आहे... दक्षिण भारतात संत महात्मा बसवेश्वरानंतर संत कनकदासांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.... संत तुकाराम महाराज प्रमाणे संत कनकदासांनी ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ कार्यासाठी आपले जीवन अर्पण केलेले  होते... कनकदासांची कीर्तने हे आट, आडी, जपे, त्रिपुरा, एका, त्रिविड, चप्पू, मटे आदि. तालामध्ये कन्नड भाषेत गायली जातात... मोहन तरंगणी, नल चरित्र , भारत कथा अमृत यांसारखी अनेक सुंदर काव्ये, संत कनकदासांनी लिहली व गायिली आहेत... राणा प्रताप सिंगाने कनकदासांच्या स्मरणार्थ 'कनकवृंदावन' बांधले  असे सांगितले जाते... संत कनकदासांच्या साहित्यावर अनेकांनी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवलेली आहेत... अनेक कनकपीठे तयार करण्यात आलेली आहेत.... जात / पंथ /  धर्म या पलीकडे जावून सर्व थरातील लोक हे कनकदासांच्या साहित्याकडे आकर्षित झालेले दिसतात.... श्रीकृष्णाचे भक्त असलेले संत कनकदासांनी भारतातील जातीभेदाबद्दल, उच्च वर्णीय मानसिकतेवर जबरदस्त हल्ले त्याकाळी केले होते.....श्रीकृष्णदेवरायाने या महान संत कनकदासांची आठवण म्हणून कनकगोपूर बांधले होते... परंतु मागे काही वर्षापूर्वी संत कनकदासांचे स्मारक 'कनकगोपूर'चा काही कर्मठ पुरोहितांनी विध्वंस केले होते... 7 जानेवारी 2005 रोजी कनकगोपूर विध्वंस निषेधार्थ धनगर / कुरुबा / कुरुमा / पाल / रबारी आदी. भारतभरातील मेषपालक / Shepherds सहित तमाम बहुजन / राष्ट्रीय समाजाने कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळूरू  येथे एका विराट मोर्चाचे आयोजन केले होते. रासप राष्ट्रीय अध्यक्ष व मंत्री महादेवजी जानकर, सध्याचे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैयाजी सहित तमाम देशभरातील राष्ट्रीय समाजातील  विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या मोर्चात सहभागी होऊन आणि तीव्र रोष व्यक्त करित  विध्वंसकांनात्वरित अटक करून 'कनक गोपूर' जैसे थे बांधून देण्याची मागणी त्यावेळी शासनाकडे केली होती... अनेक वर्षापासून धनगर (कुरुबा) तसेच विविध बहुजन / राष्ट्रीय समाज संघटनेनी संत कनकदासांची जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने केल्याने आज गेली काही वर्षे कर्नाटक राज्य शासनाने कनकदास जयंती दिन हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केलेला आहे.... कर्नाटक राज्य सरकार’तर्फे संत कनकदास जयंतीपर अनेक राज्यभर कार्यक्रम आयोजित केले जातात.... अनेक शाळा - कॉलेज मध्ये जयंतीपर कार्यक्रम आयोजित केले जाते....
संत कनकदास सांगतात,
कशासाठी, कशासाठी टिचभर पोटासाठी

धडुतं नि भाकरीच्या कोरभर घासासाठी

हातामधे एकतारी, गोड वाजे तानपुरा

वारवधूसारखेच नाचणे हे पोटासाठी

जटाधारी साधू, जोगी, जंगम हे, संन्यासी

नाना वेश घेतलेले पोटासाठी, पोटासाठी.



ढोंगबाजीवर, यंत्रवत / औपचारिक कर्मकांडावर हल्ला करित, वरवरच्या शुद्ध - अशुद्ध्तेपेक्षा धर्माच्या 'मुळ' आत्मस्वरूपाला जाणून त्यानुसार आचरण करा...असा उपदेश संत कनकदास हे कर्मठ पुरोहित वर्गाला करतात आणि आपल्या ते किर्तनातून  विचारतात कि,

✨ कुळ - कुलीन म्हणून का मिरवीतो ?
मुळ कुळाचे कोणी का जाणतो ?
आणि ठामपणे सांगतात...
शुद्धी - शुद्धी असे , सारखे का घोकता ?
शुद्धीचा अर्थ, तुम्ही न जाणता !! ✨

संत कनकदास विचारतात...
✨ सांगा, जात कोणती सत्याला ?
पूजेसाठी वाहिले पद्मनाभाला, कमळांचा जन्म चिखलातला !
दुध पूर्णान्न जगताला , मांस-रुधीरातून जन्म झाला !
कस्तुरीचा जन्म कोठून झाला ?
सांगा, जात कोणती हरीला ? सांगा, जात कोणती आत्म्याला?
सत्याबोध होते जयाला मनी वसे हरी तयाला, सांगा जात कसली साधूला ? ✨

महाज्ञानी, विद्वान, भाष्यविंद, साहित्यिक, संगीतज्ञ असलेले असलेल्या संत कनकदासांचा एक धनगर / शुद्र / दास...म्हणुन व्यासमठात / शिक्षण मंदिरात / ज्ञान केंद्रात अपमान त्यावेळी केला होता...

✨ संत संगाचा आनंद मिळता, तिर्थक्षेत्रांची भटकंती कशाला !
सत्यबोध झाले मनाला,  दुःख कशाचे असेल तयाला !!

मना चिंता ग्रस्त होवु नकोस, मना शांत हो... मना स्थिर हो !
सर्वांभुती ईश्वर, सर्वांचे रक्षण करील, मना या बद्दल तु निश्चिंत हो !!

हा-तो ? माझे हित करील, यावर विसंबुनहि राहु नको !
पित्यावर विसंबुन राहिला, प्रल्हाद हि फसला गेला !!

कागिनेलीच्या आदी केशवाकडे पुर्ण विश्वास जयाचे !
तया मिळेल... अक्षत धन - अनंत काळाचे...!!✨
- संत कनकदास 
-६-११- २०१७
📒 माहिति संदर्भ : 
लेखक/कवी श्री.एस.एल. अक्कीसागर यांच्या सत्यशोधक - दंडनायक
संत कनकदास’ 
पुस्तिके’मधून साभार...

Kanakdasa asks people to submit themselves to God`s Service, which means SERVICE TO SOCIETY AND HUMANITY.
- Late Sri Sri Sri Beerendra Keshava Tarakanandpuri Swami, Kaginele Gurupeeth

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...