संपूर्ण समाजाची माफी मागावी अन्यथा एकता कपुरला मुंबईत फिरू देणार नाही ; यशवंत सेना सरसेनापतीनीं खडसावले
मुंबई : भारतातील पहिल्या आदर्श महिला राज्यकर्त्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर करत अपमानजनक चित्रीकरण केल्याने संपूर्ण हिंदुस्थानात रोष व्यक्त करण्यात येत आहे. आज मुंबई शहरात यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे यांच्या नेतृत्वात यशवंत सैनिकानी एकता कपुरच्या बंगल्याला लक्ष्य करुन जोरदार निशाना साधला आहे. सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी तीव्र शब्दात एकता कपूर व बालाजी फिल्मला खडसावले आहे. हिंदुस्थानात हजारो मंदिर उभरणाऱ्या अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करण्यापेक्षा एकता कपुरने तीच्या आईचे नाव वेबसीरिज मध्ये वापरावे. संपूर्ण समाजाची माफ़ी मागावी, अन्यथा एकता कपुरला मुंबईत फिरू देणार नसल्याचा इशारा श्री. गडदे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment