Thursday, June 11, 2020

माणदेशी धनगरी घोड़दळ : भीमथडी तट्ट

माणदेशी धनगरी घोड़दळ : भीमथडी तट्ट

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ....!

वरील गीताचे बोल ऐतिहासिक भीमथडी घोड्यांची टाप दिल्लीपर्यंत जाते. वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या नद्या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या  होत्या व महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्या आहेत. महाराष्ट्रीयनांनी  दिल्ली जिंकून भीमथडी घोड्यांना यमुना नदीचे पाणी पाजले आहे.  महाराष्ट्रीयनांना स्फुर्ती देणारे गीत आहे.  


पण हे भीमथडी तट्ट काय आहे?

भीमकाय ताकदीचे घोड़े हेच भीमथडीचे तट्ट आहेत.  भीमा नदीचे खोऱ्यातील घोडे अर्थात भीमथडीचे तट्ट आहे. काहींनी असा दावा केला की, भीमथडीचे तट्ट नामशेष झाले आहे. परंतु हे 'भीमथडीचे तट्ट' जतन करण्याचे काम धनगर मेंढपाळानी केले आहे. आजही भीमथडी तट्ट धनगर मेंढपाळाकडे आहे.  प्रत्येक मेंढपाळ बांधव या भीमथडी तट्टाना व शेळ्या मेंढ्यांना सोबत घेऊन कोणत्याही मुलखात 'भीमचाल चालतात.  भीमथडी लष्करी घोडे जतन करून धनगरांनी शिवरायांच्या इतिहासाला जागविले आहे. 
छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्तेनंतर महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेब बादशहाची धुळदान उडवणाऱ्या सेनापती संताजी घोरपडे यांचा 'लष्करी तळ' हा माणदेशात असायचा. जखमी सैन्यावर वनऔषधांपचार केला जायचा. याच माणदेशात स्वराज्य रक्षणासाठी संताजी घोरपडे यांना येथील धनगरी घोडदळाची मोठी ताकद मिळाली होती. "सेनापती संताजी घोरपडे यांनी माणदेशी धनगरी घोड़दळाच्या बळावर दिल्लीपर्यंत मजल मारली होती", असे म्हसवड येथील इतिहासकार बाळासाहेब माने यांनी मत मांडले आहे. त्यांनी संताजी सोबत १० हजार धनगरी घोडदळ होते अशी नोंद केली आहे.  तर नुकतेच प्रकाशझोतात आलेले "सरंजामी  मरहट्टे" या ऐतिहासिक ग्रंथाचे लेखक संतोष पिंगळे यांनी धनगर घोड़दळा चा उल्लेख केला आहे.  'मराठी साम्राज्याची छोटी बखर' यात माणदेशी धनगर सैन्याची माहिती दिली आहे. धनगर समाजाचे पराक्रमी सरदार नेमाजीराजे शिंदे यांनी भीमथडी तट्टाच्या टापा उत्तरेत घुमवत सर्वप्रथम नर्मदा नदी पार करून भीमपराक्रम केला होता. अफजल खानाच्या 'प्रतापगड स्वारी' वेळी छत्रपति शिवरायांचे सख्खे मेव्हणे बजाजी निंबाळकर यांना अफजल खानाने पकड़ले होते, शिवाय  सुंता करुन ठार करण्याची धमकी दिली होती. परंतु त्यावेळी ६० हजार होन दंड भरून माणदेशातील धनगर समाजाचे मातब्बर सरदार नाईकजीराजे पांढरे यांनी जामीन राहून बजाजी निंबाळकरांची सुटका केली होती. 

धनगरी घोडदळ हे इतिहासात प्रसिद्ध होते. परंतु काळाच्या ओघात भीमथडी तट्ट मोठ्या संख्येने नष्ट होत असताना, धनगर मेंढपाळानी हिंमतीने लष्करी भीमथडी तट्ट सांभाळले आहे. हेही नसे थोडके. 

(चित्रफीत- श्री क्षेत्र सिध्दनाथ गड, पुकळेवाडी ता- माण दि. ८ जून २०२०)
- आबासो पुकळे, सदस्य- मरहट्टी संशोधन व विकास मंडळ.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...