Thursday, July 4, 2024

महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती रामलीला मैदानात साजरी करणार : महादेव जानकर यांची घोषणा

महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती रामलीला मैदानात साजरी करणार : महादेव जानकर यांची घोषणा



दिल्लीत रासप तर्फे २९९ वी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी 


दिल्ली : यशवंत नायक ब्यूरो

महाराणी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती रामलीला मैदानात साजरी करणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे देशाची राजधानी दिल्ली महानगरात महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'डेल्टन हॉल द इंस्टीट्युशनल ऑफ इलेक्ट्रोनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजिनियर्स 2, इन्स्टिट्युशनल एरिया लोधी रोड नवी येथील सभगृहात दिनांक 31 मे रोजी सायंकाळी पाच वाजता जयंती सोहळा पार पडला.

जयंती सोहळ्याचे उद्धघाटन स्वामी श्री सिद्धरामानंद जी महाराज श्री कागीनेली कानकगुरू पीठ कर्नाटक, प्रमुख पाहुणे श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी सच्चिदानंद जी महाराज - श्री चित्रगुप्त पिठाधीश्वर वृंदावन मथुरा, विशेष पाहुणे डॉ. रत्नाकर गुट्टे - सदस्य महाराष्ट्र विधानसभा रासप, रामभाई पाल- समाजसेवक मुंबई, काशिनाथ शेवते - प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, अतरसिंह पाल - रासेफ अध्यक्ष दिल्ली, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महादेव जानकर - संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, एस. एल अक्कीसागर - रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष हे उपस्थित होते. जयंती सोहळ्यास देशभरातील सर्व राज्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते, अहिल्याबाई होळकर यांना माननारे देशभरातील अहिल्याप्रेमी उपस्थित होते.




महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, यावर्षी लोकसभा निवडणूक पार पडल्यामुळे छोट्या स्वरूपात अहिल्यादेवी जयंती साजरी करू, असे बोललो होतो, राजकीय नेत्यांना बोलण्यापेक्षा संत महात्मे यांना बोलावून त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा. मात्र आज दिल्लीत स्वामीजींच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे २९९ वी अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होत आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी देशभरातून लोक आलेले. स्वामीजींचे लाखो भक्त असतात. राजकीय नेत्यांना महत्वकांक्षा असते. नेत्यापेक्षा संत महात्मे मोठे असतात. येणारी तीनशे वी जयंती रामलीला मैदानावर होईल, अशी घोषणा महादेव जानकर यांनी केली असता उपस्थितांमधून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. रामलीला मैदानावर १० लाख लोक एकत्र केले जातील. अहिल्याबाईंची पहिली जयंती त्यांच्या जन्म गावात केली. राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा तेथेच झाली. धर्मकारणाबरोबर राजकरणही करता आले पाहिजे. दिल्ली लक्ष्य बनवून आपण लग्न करणार नाही, घरी जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. दिल्लीला जायचे पण स्वत: च्या हिंमतीवर जायचे आहे. आपण काँग्रेस, भाजप बरोबर जाता येईल, पण आपल्याला सिद्धरामय्या बनायचे नाही. मला या देशाचा मालक बनायचे आहे. सिद्धरामय्या चांगले नेते आहेत. मी ठरवले होते, नवी पायवाट करून स्वत:च्या हिंमतीवर दिल्लीला जायचे आहे. ज्या समाजाला दल नाही तो समाज बेदखल आहे. दखलपात्र होण्यासाठी स्वत:च दल असले पाहिजे. काहीतरी करावे लागेल, यासाठी स्वत:चा रस्ता तयार केला. परभणी लोकसभेत सर्व समाजाने मला मदत केली. इंडियातील सर्व समाजाचे लोक माझ्यासाठी मत मागण्यासाठी फिरत होते. जोपर्यंत तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहत नाही, तोपर्यंत तुमचे भले होणार नाही. महाराष्ट्रात विधानसभेला १०० जागांची तयारी केली तर ५० जागा विधानसभेला मिळतील. 1994 ला रामलीला मैदानात आलो होतो, पुढच्या अहिल्याबाई होळकर जयंतीला रामलीला मैदान भरले पाहिजे, यासाठी प्रयत्न करू. देशभरातून लोक येतील. चोंडीत महाराष्ट्र शासन जयंती साजरी करते, तसेच दिल्लीचे केंद्र सरकारही अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करेल. केवळ सामाजिक संघटन बनवून काही होणार नाही, राजकारण करायला शिकले पाहिजे. समाजाच्या शेकडो संघटना आहेत, पण शंभरही लोक एकत्र येत नाहीत. राजकीय प्रेरणा घेतली पाहिजे. जयंती सोहळ्यास देशभरातील रासपचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...