Saturday, July 31, 2021

गुजरातने मुंबईच्या जबड्यातून विमानतळ काढून नेलं, तिथं खान्देशच्या पाण्याचं काय घेऊन बसलात?

 🚨✈️गुजरातने मुंबईच्या जबड्यातून विमानतळ काढून नेलं,
 तिथं खान्देशच्या पाण्याचं काय घेऊन बसलात?


 महाराष्ट्र गुजराथ पेक्षा मोठा आहे, पण गुजराथी नेते मराठी नेत्यापेक्षा मोठे आहेत. कोणी काहीही बोललं तरी सत्य आहे ते आहेच. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी, अमित शहा हे ज्या ज्या काळात झाले, त्या त्या काळातील मराठी नेते यांची उंची गाठु शकले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर गुजराथने कुरघोडी केली आहे. त्यात प्रत्येक वेळी नुकसान खान्देशच झालं.

         मुंबईवर दावा करणाऱ्या गुजराथने मुंबई महाराष्ट्राला सोडली पण त्यासाठी मराठी माणसांना खूप मोठी किंमत मोजावी लागली. मुंबईसाठी 105 मराठी माणसे तर हुतात्मे झाले हे सत्य आहे पण अर्ध सत्य आहे. या व्यतिरिक्त अजून एक मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. याची चर्चा कधी कोणी करत नाही. कारण ही किंमत खान्देशी अहिर माणसाला मोजावी लागली आहे. त्यावर मराठी माणसे आणि मराठी मीडिया कायम मूग गिळून बसतो. 

        एक अण्णाभाऊ साठे यांनी *माझी मैना गावाकडे राहिली।* या लावणीत डांग गुजराथने घशात घातला एवढा एक उल्लेख सोडला तर इतर कोणीही या विषयावर ब्र शब्द बोलत नाही. कोणालाही त्याची खंत वाटत नाही. कारण ते असं समजतात की, जे नुकसान झालं ते खान्देशच आहे आपलं नाही. म्हणून ते फक्त निपाणी, खानापूर आणि बेळगावसाठी लढतात. 

*काय गमावल खान्देशने?*

          जल आणि वन समृद्ध डांग जिला, उकाई धरणात निझर, उच्छल हे दोन तालुके आणि नर्मदा सरोवरासाठी 37 गावे एवढं मोठं नुकसान खान्देशच झालं. शिवाय मध्यप्रदेश मध्ये अहिराणी भाषिक 87 गाव आणि तावडी बोली भाषेची 100 गाव गेली. त्यात खेतीया, पानसमेल, सेंधवा, नेफानगर आणि बऱ्हाणपूर ही मोठी शहर गेली. 

            आज हे सर्व सांगण्याच कारण म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबादला हलविण्याचे दिशेने पहिले पाऊल गुजराथ सरकारने दिल्लीच्या मदतीने टाकले आहे. या विरुद्ध मुंबईचे आणि दिल्लीचे मोठं मोठे मंत्री काहीच बोलत नाही. 

        मुंबई गुजराथला हवी आहे आणि ती नियोजन बद्ध पणे पळविण्याच्या ते एक एक प्रक्रिया पूर्ण करत आहे. मुंबई पळविणार म्हणजे, जमीन आणि इमारती महाराष्ट्रात राहतील पण उद्योग सर्व गुजराथमध्ये जातील. आजची मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे ते मुंबईच स्थान उद्या *अहमदाबाद किंवा डोला* सिटी यांच्याकडे जाऊन त्या देशाच्या आर्थिक राजधान्या असतील. विमानतळ मुंबईत राहिल पण आंतरराष्ट्रीय विमान वहातुक अहमदाबाद येथून सुरू होईल. मुंबईत फक्त डोमॅस्टिक प्रवासी वहातुक आणि 2/3 इकडच्या तिकडच्या देशात विमाने ये जा करतील. आता उशिरा अदानी ग्रुप ने खुलासा केला आहे की, *मुंबई विमानतळाचे कार्यालय अहमदाबादला हलविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.* मग अहमदाबाद विमानतळावर गुजराथी कसला गरबा खेळत होते? अदानी ग्रुप हा अडाणी ग्रुप आहे. म्हणून त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरी सुद्धा महाराष्ट्राने सावध राहील पाहिजे. 

         माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कामगार नेते दत्ता सामंत यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत मुंबईचा कापड उद्योग उध्वस्त झाला. इंदिराबाईंच्या राजवटीत दत्ता सामंत यांनी सुरू केलेला संप आज 40 वर्ष झाली तरी सुरूच आहे. गमतीची गोष्ट म्हणजे इंदिराबाई, तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले आणि दत्ता सामंत या तीघांच निधन झाल, मुंबईतील सर्व कापड गिरण्या नष्ट झाल्या गिरणी कामगार भिकेला लागला. त्यातले बरेच कामगार वृद्धापकाळाने वारले सुध्दा तरी संप सुरूच आहे. या सर्व धांदलीत सर्व कापड उद्योग नियोजन बद्ध पद्धतीने अहमदाबादला हलवण्यात आला. 

            डहाणू येथे पोस्टगार्ड प्रशिक्षण वर्ग विद्यालय मंजूर झाले होते. म्हणजे समुद्रावर गस्ती घालणारी पथक,  ते आता अहमदाबाद येथे हलविण्यात आले. आताचं हे विमानतळ कार्यालय गोंधळ, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय सुध्दा मुंबईतून अहमदाबादकडे नेणार असल्याचे बोलले जात आहे. *एका वेगळ्या अर्थाने याचा शेवटी परिणाम हाच होईल की, मुंबई गुजराथ मध्ये जाईल. म्हणजे मुंबईचा सांगाडा महाराष्ट्रात आणि मुंबईचा आत्मा गुजराथला अशी ही दूरगामी योजना आहे.*

            महाराष्ट्रात अनेक पक्ष संघटना, सामाजिक संघटना, कामगार संघटना आहेत.  त्यांचे नेते हुशार आणि आक्रमक आहेत. ते अशा घटनांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करतात. कृती करतात. तसे नेते आणि संघटना खान्देश मध्ये नाहीत. त्यामुळे गुजराथ महाराष्ट्र लुटायला जातो तेंव्हा जसे लढे उभारले जातात, तसे लढे गुजराथ खान्देश लूटतो तेंव्हा का उभे रहात नाहीत. कारण खान्देशी लोकांना या लुटुतील नुकसान, अनाचार आणि अन्याय लक्षात येत नाही. यांच्या स्वतःच्या संघटना नाहीत. आणि लढाऊ महाराष्ट्राला खान्देशची काही पडली नाही. 

           बऱ्याच वेळा असा संशय येतो की, खान्देशला महाराष्ट्राने विक्री काढला की काय! डांग दिला, उकाई, सरदार सरोवरात खान्देश बुडवला. आता ही 2009 ची घटना बघा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते आणि गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. केंद्रीय पाणी लवाद मंडळाने केमच्या डोंगरातील 47% पाणी महाराष्ट्राला दिले होते, तर 17% पाणी गुजराथला दिले होते. मुळातील हा पाणी वाटप करार रद्द करून चव्हाण-मोदी यांच्या 1995 च्या नव्या कारारानुसार 36% पाणी महाराष्ट्राला आणि 28% पाणी गुजराथला असे फेर वाटप करून घेतलं. म्हणजे नारपारच 11% पाणी गुजराथला देऊन टाकलं. *कशा बद्दल हे खान्देशच पाणी गुजराथला दिलं?* यात देण्याघेण्याचा नेमका काय व्यवहार झाला? हा व्यवहार शासकीय पातळीवर झाला की, वैयक्तीक पातळीवर झाला हे शोधून काढाव लागेल. कारण अशोक चव्हाण यांना आदर्श इमारत प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते. 

              गुजराथचा मुख्यमंत्री भाजपचा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग काँग्रेसचे म्हणजे अशोक चव्हाण यांच्यावर केंद्राचा दबाव येणही अशक्य!

मग 11% पाण्यावर उदक सोडण्याच कारण काय?

          काही देवाण घेवाण झालीन नसेल तर मग दुसरे कारण हे असू शकते की, धरण पाट बांधायचे तर त्याला खर्च येतो. मग जिथे धरणाचा लाभ खान्देशला फक्त होत असेल तर मग एवढा मोठा खर्च करण्यापेक्षा पाणी गुजराथला सोडून द्या. असा विचार तर महाराष्ट्राचे नेते करत नसतील?

*म्हणून तर हे पाणी अशोक चव्हाणानी गुजराथला दान तर केलं नसेल? अजून एक मजा नारपारच्या या पाणी वाटपाची चर्चा विधान सभेत होत असताना तिथे एकही खान्देशचा आमदार हजर नव्हता. रात्र झाली म्हणून हे सर्व घरी निघून गेले.*

         नर्मदा नदीच 11 tmc पाणी केंद्रीय लवादाने महाराष्ट्राला दिलं होतं. त्यातही 6 tmc पाणी महाराष्ट्राने गुजराथला देऊन टाकलं. खान्देशच्या हक्काच पाणी महाराष्ट्र गुजराथला खिरापत म्हणून का वाटप करत आहे? हे सर्व करताना तुम्ही खान्देशी माणसाला का विचारलं नाही? कोणाला विचारून तुम्ही हे करत आहात?

         करू द्या त्यांना काय करायच ते  करू द्या. पण आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळवायलाचं हवं. खान्देशवर घोर अन्याय करणारा हा करार रद्द करायला आपण भाग पाडू तरच खान्देश जिवंत राहील. नाही तर खान्देशच वाळवंट झाल्या शिवाय राहणार नाही. यातून वाचायचं असेल तर तापी-गिरणा खोऱ्यात एकसंघ पणे मोठा लढा उभा करावा लागेल. त्यासाठी रस्त्यात उतरावे लागेल. उत्तरमहाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने रणभेरी फुंकली आहे? तुम्ही सुध्दा मुठी आवळा, दंड थोपटा आणि आंदोलनात भाग घ्या!

एक व्हा।नेक व्हा।

हर जोर जुल्मकी टक्कर मे,

संघर्ष हमारा नारा हैं।

                               बापू हटकर

          कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ.

🌊💦🌊💦🌊💦🌊💦🌊💦🌊💦

ऋषितुल्य ज्येष्ठ नेते गणपतरावजी देशमुख काळाच्या पडद्याआड

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री 9:15 च्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

 ते 94 वर्षांचे होते. देशमुख यांनी  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११वेळा   विक्रमी विजय मिळविला आहे.

२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. 

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

 गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

Tuesday, July 27, 2021

कारगिल युद्धाचा उपेक्षित नायक :

कारगिल युद्ध : सलाम हमारे जाँबाज़ हिरो गडरिया चरवाहा ताशी नामग्याल को भी..

2 May1999 में बटालिक सेक्टर की गारकौन गाँव के उंचाई पर सबसे पहले पाकिस्तानी घुसपैठिये देखने वाले ताशी नामगयाल हि थे. ताशी नामगयाल ने ही भारतीय सेना को पाकिस्तानी सैनिकों व घूसपैठियों की सर्वप्रथम खबर देकर सतर्क किया था...





माणदेशी खिल्लार

 




Tuesday, July 20, 2021

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे



 पंढरपूर दि. 20 –  पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

             आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.    

 आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष  असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.      

मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा  (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला

      पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

महापुजेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले तर सुत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.

Monday, July 5, 2021

ओबिसी आरक्षणासाठी रासपचा राज्यभर चक्काजाम

ओबिसी आरक्षणासाठी रासपचा राज्यभर चक्काजाम
रासपचा आक्रमक पवित्रा; पोलीस बळाचा वापर करून ठिकठिकाणी आंदोलकांना घेतले ताब्यात



यशवंत नायक ब्यूरो : प्रा. आबासो पुकळे

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने आज दिनांक ४ जुलै २०२१ रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन, जेलभरो आंदोलन केले.  मुंबई मानखुर्द येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महादेव जानकर यांनी यूपीए आणि संपुआ सरकारला खडसावत ओबीसींची जनगणना करण्याविषयी सुनावले तसेच न्याय मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा दिला. नवी मंबई येथे कळंबोली जि- रायगड येथे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर यांच्या उपस्थितीत पुणे - मुंबई जलद दृतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आण्णासो रुपनवर, भगवान ढेबे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.  दहिसर नाका येथे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, स्वप्नील ठावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, यावेळी पालघर येथेही आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


सातारा येथे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच श्रीकांत देवकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, परंतु रासप कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन केले.  कोल्हापूर येथे पुणे - बंगळूर महामार्ग अडवून धरणाऱ्या रासप कार्यकर्त्यांना पोलिसी बळाचा वापर करत ताब्यात घेतले. येथे युवा नेते अजितकुमार पाटील, विशाल सरगर यांनी महामार्गावर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सांगली येथे लक्ष्मण सरगर यांच्यासह रासप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणे येथे कात्रज चौकात राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार हमसे डरते है! पोलीस को आगे करते है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र होते. यावेळी ओबीसींना न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडू, मंत्र्यांना झोडून काढू असा इशारा, दोडतले यांच्याकडून देण्यात आला.


सोलापूरात मडकेवस्ती येथे रासपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. येथे सुनील बंडगर, ज्ञानेश्वर सलगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  आंदोलनस्थळी पोहचण्यास मज्जाव करणाऱ्या कार्यकर्त्यानी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात ठिय्या दिला. अहमदनगर येथे पुणे महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन छेडण्यात आले, माणिकराव दांगडे यांनी आपली भूमिका मांडली. ओमप्रकाश चितलकर यांच्या नेतृत्वात जालना येथे आक्रमक आंदोलन करण्यात आले. बीड येथे सोलापूर - धुळे महामार्ग रोखल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. परभणी येथे प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात बहुसंख्य आंदोलक रस्त्यावर आले.  हिंगोलीत पंढरीनाथ ढाले यांनी आंदोलनात जनावरांना उतरवले होते.  

चेतन आगलावे यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे बसस्थानक चौकात रास्ता रोको करण्यात आला. वाशीम येथे पुसद मार्गावर चक्काजाम करण्यात आला. यावेळी दीपक तिरके यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रीय समाज पक्ष उस्मानाबाद जिल्ह्याच्यावतीने  सोलापूर -औरंगाबाद हायवे आडवला , पक्षाच्या  पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. लातूर येथे प्रा. विष्णू गोरे, दादासाहेब करपे यांच्या नेतृत्वात महाराणी अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. बदलापूर जि- ठाणे येथे रुपेश थोरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...